खिडकी
©राधिका कुलकर्णी.
खिडकी म्हणले की डोकवणे आलेच.
सहज स्वाभाविक गूण च आहे मानवी मनाचा काही उघडे दिसले की त्यात
वाकून बघायचेच.
घराला खिडकीची योजना का?
तर, घरात हवा खेळती रहावी.घरातले वातावरण शुद्ध आणि प्रसन्न व्हावे.
पण खिडकीचे ईतकेच उपयोग नाहीएत.लोकांनी सोयी सवडी आणि गरजे नूसार
ह्याचे अनेक फायदे शोधून काढलेत.
म्हणून तर गाणे पण फेमस झालेय जून्या काळात..
"शाम ढले खिडकी तले
तूम सिटी बजाना छोड दो।"
प्रेमी युगूलांनी तर ह्या खिडकीचा किती विविध रूपांनी फायदा घेतलाय
ते तर आपण चित्रपटांमधून आणि कित्येकदा प्रत्यक्षदर्शी ही बघितलेच असेल.
खिडकीतून चिठ्ठ्या पोहोचवणे,दार उघडे असूनही गुपचूप तासनतास खिडकीतून
गप्पा मारणे तर मैत्रीची पर्वणीच.
"घे ग ,तूझी दूधाची पिशवी बाहेरच टाकून गेला बघ दूधवाला"
असे सांगत खिडकीतून जाता जाता शेजारधर्म पाळणारीआईची प्रेमळ मैत्रिणही ह्याच खिडकीचा
वापर करते.
कधी चाळीतील घरांमधे पाहूणे अचानक आले आणि दूध,चहा पावडर किंवा
साखर संपली तर त्यांना नकऴत रसद पूरवठ्याची हमखास सोय म्हणजे हिच खिडकी.
पण काय हो हीच खिडकी जर आपल्या शरीरावर असती तर!!
म्हणजे ,
उदा: जर एखाद्या जाड्याच्या ऋदयाला ही खिडकी असती तर,त्याला दिसले
असते ना की त्याच्या अवास्तव पसरलेल्या देहाला रक्त पुरवठा करता करता बिचाऱ्या ऋदयाची
किती त्रेधा उडतीय.ते शीव्या घालून धापा टाकत सांगेल 'अरे, जरा ह्या देहाला आवर घाल
...
किती उधळलाएस चौखूर गूरा सारखा.
आता तू जर वेळेवर थांबला नाहीस ना तर मीच थांबेन एक दिवशी'
जर हिच खिडकी एखाद्याच्या पोटावर असती तर!!
अरेरे..!!तीथली गटार बघून तर आपणच आपल्या नाकावर हात ठेवला असता.
स्वत:च माजवलेल्या घाणीची किळस करून तोंड फिरवले असते.
मग कळले असते की बकबका अद्वा-तद्वा चरून आपणच आपल्या शरीराची
काय दुर्दशा करून ठेवलीय ते.
कदाचीत ते पाहून तरी आरोग्याचे महत्त्व पटून लोक "नियमीत
व्यायाम आणि संतूलीत आहार"
ह्या संकल्पनेला राबवते झाले असते.
वरून नूसते सुंदर दिसणारे शरीर आतूनही स्वच्छ आणि सूंदर राखण्यासाठी
लोकांनी प्रयत्न केले असते नाही का!!
तशीच एक खिडकी मनाला ही असती तर !!!
अंतरंगात प्रत्येका विषयी वर्षानूवर्ष जपून पाळून ठेवली आसूया,अढी,राग,संताप,लोभ,
मोह,मत्सर,द्वेष इर्षा षऽरिपूं मूळे ते किती मलीन आणि काळे कभीन्न झालेय हे दिसले असते.
कदाचित ते अंतरंग रडताना दिसले असते.म्हणाले असते,"अरे
,चढाओढीच्या स्पर्धेत पळता पळता माझी काय वाईट अवस्था करून ठेवलीएस तू "
का? कशासाठी?
शेवटी काय नेणारेस सोबत?
मग का एवढी आसक्ती मोह अन् मायेची भूक तूला?
तूझ्या आसूरी भूकेला कोंबून कोंबून मी पार मरून गेलोय रे.!
गुदमरतोय माझा आत्मा.
माझी ह्यातून सोडवणूक कर.माझी ही अमानूष पिळवणूक थांबव रे मनुष्या
थांबव. !!"
नाहीतर एक दिवस तो असेल की मी उरणार नाही.
मी नसेल तर तू ही नसशील.असून नसल्या सारखा भीक मागशील मन:शांती
साठी, पण ती ही मिळणार नाही आणि तडफडून मरशील तूझ्या सहीत मीही..
म्हणून एकदा फक्त एकदा तरी ह्या खिडकीत वाकून बघ.ऽऽ
एकदाच बघ !!!?
©राधिका कुलकर्णी..
( थोडेसे मनातले )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा