Pages

सोमवार, १६ मार्च, २०२६

कोकण रेल्वे मार्गावर खास उन्हाळयासाठी कोकणात समर स्पेशल konkan railway summer special

 कोकण रेल्वे मार्गावर खास उन्हाळयासाठी कोकणात समर स्पेशल गाडयांचे वेळापत्रक

konkan railway summer special


कोकणात जाण्यासाठी झालेली गर्दी लक्षात घेता अखेर कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष उन्हाळी गाडी जाहीर केली आहे. कोकण रेल्वेवर धावणार विकली स्पेशल गाडी. उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी तसेच पर्यटकांसाठी कोकण रेल्वेने आणखी एका विशेष उन्हाळी गाडीची घोषणा केली आहे.

गाडी क्र.01106 ही गाडी आठवडयातून एकदा पनवेल ते मडगाव धावणार आहे. दि.17.05.2026 पासून ही गाडी दर रविवारी मडगाव येथून दुपारी 4.30 वा. सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे 04.00 वा पनवेल येथे पोहोचेल.

गाडी क्र.01105 ही गाडी दि.18.05.2026 पासून ही गाडी दर सोमवारी पनवेल येथून पहाटे 5.45 वा. सुटेल. ती त्याच दिवशी सायंकाळी 6.10 मि. मडगाव येथे पोहोचेल.

या गाडीला थांबे – माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली,  विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम व करमाळी

या गाडीला एकूण  23 डबे आहेत. Three Tier AC - 03 Coaches, Sleeper - 11 Coaches, General - 07 Coaches






रविवार, १५ मार्च, २०२६

मनातलं गाव

 मनातलं गाव

मनातलं गाव


सद्या इराण, इस्त्राईल व अमेरिका अण्वस्त्र युध्द सुरु आहे. शहरांमध्ये गॅस सिलेंडर तुटवडा झाल्याच्या बातम्या सतत चॅनेलवर सुरु आहेत. सोशल मिडीयावर मिम्स टाकल्या जात आहेत. अनेक हॉटेल बंद करावे लागले आहेत. तसेच उर्वरित बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काहीजण चुलीचा पर्याय म्हणून वापर करु लागले आहेत. अक्षरश: टाळेबंदी होण्याची वेळ आली असल्याचे संकेत मिळत आहेत.

            छोटया मोठया शहरांमध्ये हाहाकार उडाला आहे. सिलेंडर मिळाला नाही तर काय करायचे या विचाराने पहाटे ऊठून गॅस एजन्सी समोर रांगा लावून लोक उभे आहेत. काही ठिकाणी रांगा लावूनही सिलेंडर मिळत नसल्याने लोकांमध्ये आपापसात तंटे होताना दिसत आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी चुली पेटवायला सुरुवात केली. पण मोठमोठया सोसायटया आणि उच्चतम इमारती यांचे काय?

              हीच परिस्थीती कोरोनामध्ये आली होती. आपण कितीही विकासाची फुशारकी मारली तरीही परावलंबी आहोत हे वेळोवेळी सिध्द होत आहे. पैसा कमवण्यासाठी कितीही धावपळ केली तरी थकलेल्या जीवाला निवांतपणा हा गावातच मिळतो. ज्यांनी जन्मत: गावचं पाहिले नाही त्यांना नाही कळणार. पण ज्यांनी गावाचं जीवन अनुभवले आहे, त्यांना हयाची जाणीव आहे.

                तिकडे कोकणासारख्या हिरवळीत ग्रामीण जीवन मात्र नित्यनियमाने सुरु आहे. पुर्वीही होतं आताही आहे आणि पुढेही राहील. कारण कोकणातील खेडी स्वयंपुर्ण आहेत. म्हणजे इथे गरजा कमी आहेत. ग्रामीण भागातल्या जनतेची स्पर्धा इतर जगाशी नाही. पोट भरण्यापुरते जेवण मिळतंय तेही स्वत: पिकवलेलं. वेगवेगळया ऋतुत तयार होणारा रानमेवा अर्धे पोट भरतो. मग अगदी नदी किंवा समुद्रातील मासे असोत किंवा जंगलातील करवंद, जांभूळ, आंबा, फणस, अळू, कण्हेरी, अटकं, नीवं अशी कितीतरी नावे आहेत.

               रानाता लाकूटफाटा आहे. मॉलची गरजच नाही.  गरजा सिमीत पण निसर्गाशी संलग्न. त्यामुळे अजुनही डोंगराळ भागात डॉक्टरांचे दवाखाने नाहीत. चायनीज, बेकरी पदार्थ, बाहेरचे जेवण, वातानुकुलीत एंत्रे, महागडे कपडे, श्रीमंतीचे प्रदर्शन, फुशारकी, हया गोष्टींना इथे थारा नाही. इथे फक्त निसर्गाच्या संपर्कात निसर्गाशी जुळवून घेत जीवन जगता येतं. खरचं जगता येत.

पृथ्वी गोलच का आहे? – विज्ञान, इतिहास आणि काही आश्चर्यकारक तथ्ये

  पृथ्वी गोलच का आहे? – विज्ञान, इतिहास आणि काही आश्चर्यकारक तथ्ये "पृथ्वी सपाट असती तर काय झालं असतं?" हा प्रश्न कधीतरी प्रत्ये...

आणखी पहा