Pages

वाचावीत अशी पुस्तके लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वाचावीत अशी पुस्तके लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

वाचण्यासारखं काही

  इकिगाई....

                    


                    वाचक हो चांगली पुस्तके जीवन घडवतात. जीवनात परिवर्तन आणतात. पण अशी पुस्तके शोधणे थोडे अवघड असते. एकतर माणसाकडे हल्ली वेळ कमी असतो. म्हणजे अगदी आजारी पडेपर्यंत वेळच नसतो. पण हॉस्पीटलमध्ये मात्र वेळ जात नसतो. असो. आज मी तुम्हाला एका आरोग्य बरोबर जीवनाची सांगड घालणाऱ्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे. काही लोकांनी ते पुस्तक वाचलेही असेल, संग्रही ठेवले असेल. पण ज्यांनी अजून वाचले नसेल अगर माहित नसेल त्यांच्यासाठी थोडसं.....
त्या पुस्तकाचे नाव आहे इकिगाई......
                     हा एक जापनीज शब्द आहे. हे पुस्तक म्हणजे कथा, कादंबऱ्या प्रमाणे काल्पनिक नसून अनुभव व अभ्यासाच्या आधारे जापनीज लोकांच्या जीवनाचे गुपीत आहे. लेखकाने इकिगाई या जपानी शब्दाचा अर्थ शब्दकोशा प्रमाणे न सांगता सतत व्यस्त राहण्यामध्ये आदंन. त्याचा अर्थ जीवनाचा हेतू उमगणे व साध्य करणे असा केला आहे. प्रत्येक माणसाचा या मानवी जीवनात येण्याचा काहीतरी कारण/हेतू असतो. त्याने तो शोधायचा असतो. काहींना आपला इकिगाई सापडतो तर काही जण द्विधा अवस्थेत असतात. पण तुम्ही म्हणाल इकिगाई शोधून करायच काय?
                     जपान मध्यल्या ओकिनोवा या बेटावरील असणाऱ्या गावात दर 1 लाख लोकसंखे पैकी 24.55 टक्के लोक हे 100 पेक्षा जास्त वयोगटातील आहेत. आणि हे प्रमाण जागतिक वयोमानाच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. ते पण ठणठणीत अवस्थेत. जपानी शब्दकोषात निवृती हा शब्दच नाही. म्हणजे इथले लोक शेवटपर्यंत आपल्या आवडीच्या कामात व्यस्त असतात. तिथल्या लोकांमध्ये गंभीर आजारांचे प्रमाण कमी आहे. आहे की नाही आश्चर्य. काय आहे त्यांची रहस्य. जाणून घ्या. आपल्या प्रियजनांना सांगा. त्याचे अनुकरण करा. आणि आपल्या मित्रांनाही सुचवा.

IKIGAI BOOK

(Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)




बुधवार, १० एप्रिल, २०१९

वाचन का आवश्यक आहे !


वाचन का आवश्यक आहे !

एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा !

श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.

जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्‍हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईलमुळे.

पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे.

वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस Adicted होतो.

टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो.

वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.

वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत. या उलट जास्त टी.व्ही. मोबाईल वापरणारेच विविध रोगांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे.

टी.व्ही मोबाईलमुळे मन शांतीचा भंग होतो तर वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते.

वाचन करणारा माणूस लवकर झोपतो लवकर उठतो. टी.व्ही मोबाईल चक्कर मध्ये अडकणारे उशिरा झोपतात नी उशिराच उठतात. परिणामी शरीर संपदेसह श्रीमंतीही नष्ट होते. लवकर निजे लवकर उठे अशी एक म्हण प्रचलित आहे.

वाचन करणारा पुढे उद्योजक होतो तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो.

वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो तर वाचन टाळणारा बारा तास काम करून गरिबीतच मरतो.

काही महाभाग तर नोकरी लागली की, जगातील मी एकटाच सिकंदर, आता मलाच सारे काही कळते, अशा  नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात.

वाचनामुळे माणूस नम्र होतो तर टी.व्ही मुळे माणूस भांडखोर नी मोबाईलमुळे आत्मकेंद्री होतो.

जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन.

आपल्या आयुष्यात दोन गोष्टींचा प्रभाव पडतो एक मित्र आणि एक पुस्तक, पुस्तकालाच आपला मित्र बनवा.

टी.व्ही बघणारे प्रवास करतात, तर वाचन करणारे ध्येय गाठतात. टी.व्ही मोबाईलमुळे थकवा येतो तर वाचनामुळे तरतरी.

जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते. वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते.

तुमच्या ध्येयावरून तुमची लायकी पारखली जाते आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते.

ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं.

जगात जेवढे  लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातुन संपत्ती निर्माण होत असते.





सोमवार, ३ जुलै, २०१७

वाचावीत अशी पुस्तके

प्रोत्साहनपर पुस्तके 

मी नोकरी करीत होतो तेंव्हा आठवतंय ..... रविवारची संध्याकाळ आली कि सोमवारच्या त्या लांब लांब सावल्या मनात शिरु लागत आणि रविवार मजेचा ताबा घेत. मग थिएटर मध्ये सिनेमा बघताना, समुद्राच्या वाळूवर मुलाशी खेळताना पोटातली ती सुनामीची लाट हळू हळू आक्राळ विक्राळ होत जायची. मग लक्षात यायचं आपले खांदे पडलेत,आवाज धीमा झालाय, श्वास स्लो झालाय. त्याच मनःस्थितीत झोपी जायचो आणि सोमवारी सकाळी मोबाईलचा गजर स्नूझ करीत झोपून राहायचो. मग नंतर कळलं मी एकटाच नाही. इंग्रजीमध्ये याला मंडे ब्लूएज सिन्ड्रोम म्हणतात नाही म्हणायला  हे थोडं दिलासादायक होत. 

  • नवीन काळे

अप्रतिम पुस्तक, अनुभवाच्या आधारे मांडलेले विचार जरूर संग्रही 




(Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)

अतिशय प्रोत्साहनपर व आपले ध्येय कसे गाठावे याचे मार्गदर्शन करनारे पुस्तक. जॅक कॅनफिल्ड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मोटिवेशनल गुरु आहेत. त्यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलर आहेत. स्वतःच्या अनुभवाच्या आधारे यशाचा फॉर्मुला पुस्तक रूपाने उपलब्ध




(Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)



आज आपण एका अशा संघर्षाची ओळख करून घेणार आहोत जी तुम्हाला ते पुस्तक वाचल्या नंतरच कळेल. होय !
 तुमच्या पोटात भूक असेल, डोक्यात कसलीही लाज नसेल आणि तुमच्या मनगटात जिद्द असेल , तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकता अगदी कुठल्याही .........
       हे वाक्य आहे कामत रेस्टॉरंट ची चैन काढणाऱ्या श्री विठ्ठल कामात यांच्या इडली ऑर्किड आणि मी या सुप्रसिद्ध पुस्तकातील . हे पुस्तक नुसते एकदा वाचून संपत नाही तर आपल्याला प्रेरणा देत राहते. अनेकदा वाचूनही दरवेळी नवीन काहीतरी गवसते. कधी उदास वाटत असल्यास, निरुत्साही असल्यास, अपयश आल्यास हे पुस्तक मार्गदर्शकाची काम करते. उत्साह वाढवते, जगायला शिकवते. हे केवळ काल्पनिक रचलेले पुस्तक नसून विठ्ठल कामात यांना त्यांच्या जीवनात आलेल्या बऱ्या वाईट अनुभवांचे सुरस कथन आहे. आपल्याला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल.


(Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)

 


वीणा गवाणकर लिखित एक होता कार्व्हर . खरोखरच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जगावं कस हे शिकवते पुस्तक. 


(Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)


माणसाच मन हा खरा कल्पवृक्षच आहे. सार काही देणारा !यश, सुख,आरोग्य, नवनिर्मिती, सृजन रंजन इतकाच काय पण दुःख, आजार, विनाश , अपघात , नुकसान, दुर्दैव हे सार काही प्रथम मनाच्या सृष्टीत जन्माला येत आणि नंतरच अस्तित्व धारण करते.
           तुमच मनच तुमच्या जीवनातील प्रत्येक वस्तू , व्यक्ती, परिस्थिती, आकर्षित करत. या मनाच्या शक्तीनं म्हणूनच चमत्कार घडू शकतात. मनाच्या शक्तीद्वारे जे नको ते टाळता येते आणि हव ते मिळवता येत. मग ते व्यक्ती, परिस्थिती, वस्तू, स्वगुण यापैकी काहीही असो. तुमची समस्या वैयक्तिक, कौटुंबिक,  आर्थिक-कोणतीही असो.
आपल्या मेंदूचे प्रोग्रामिंग कसे असते, कसे बदलावे व कसे करावे याचे मार्गदर्शन आपल्याला या पुढील पुस्तकातून मिळेल. पुस्तकांच्या लेखिका डॉ. रमा मराठे ह्या विख्यात डॉक्टर, माजसोपचार तज्ज्ञ, लेखिका व कवयत्री आहेत.


(Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)






A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा