Pages

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

सोशल मिडीया आणि आपण: ‘लाईक्स’ च्या दुनियेत हरवलेले आपले ‘लाईफ!’

 सोशल मिडीया आणि आपण: लाईक्स च्या दुनियेत हरवलेले आपले लाईफ!’

social media


           रस्त्याने जाता जाता एक मोबाईलचे स्क्रीन गार्ड विकणारा फेरीवाला दिसला. त्याच्याकडे सद्या कोणीही गिऱ्हाईक नव्हते. आजुबाजूला लोक येत जात होते. तो खाली मान घालून बसला होता. मोबाईलमधील रीळ बघण्यात दंग होता. पुढे बघितल तर भाजीवाला भाजी गिऱ्हाईकाला भाजी पिशवीत भरता भरता भाजीवर ठेवलेल्या मोबाईलमध्ये रीळ बघत आहे. गिऱ्हाईकाला पटकन पळवण्याच्या मानसीकतेत. मनात विचार आला काय हे वेड लावून ठेवलंय संगळयांना. खऱ्याखुऱ्या जगापेक्षा त्यातील माणसापेक्षा आजकाल आपल्याला आभारी जगच अधिक प्यारे झालेय का?

             लहान मुलांपासून तर आजी आजोबां पर्यंत जो तो गुंतलेला. आजच्या डिजीटल युगात आपली सकाळ सुर्योदयाने कमी आणि व्हाटस्अप नोटीफीकेशनने जास्त होते. डोळे उघडल्या उघडल्या आपण देवाचे दर्शन घेतो की नाही माहित नाही पण मोबाईलचे दर्शन मात्र नक्की घेतो.

सोशल मिडीयाने जग जवळ आणले हे जरी खरे असले, तरी आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला विसरत चाललो आहेात का? हा विचार करण्याची आता वेळ आली आहे.

1.      स्टेटसच्या नादात स्थिती विसरलो का? status

हल्ली एखादया छान हॉटेलमध्ये गेल्यावर पदाथ जिभेला लागण्यापूर्वी तो कॅमेऱ्यात कैद होतो. चव कशी आहे यापेक्षा फोटोला लाईक्स किती मिळतील, यातच आजचा आनंद सामावलेला दिसतो. तीच गत एखादया सुंदर ठिकाणी गेल्यावर तिथला आनंद उपभोगण्यापेक्षा फोटो आणि रीळमध्येच सगळे अडकलेले. आपण नक्की कोणासाठी जगतोय? स्वत:साठी की फॉलोअर्सना दाखवण्यासाठी?

2.      स्क्रॉलींगचे चक्रव्युह- scrolling

फक्त 5 मिनीटे रील बघतो असे म्हणून आपण मोबाईल हातात घेतो आणि कधी तासभर निघून जातो, हे कळतही नाही. प्रत्येकाला आयुष्य हे वेगवेगळे दिलेले आहे. जेवढे काही आयुष्य आहे त्यातील सुंदर क्षण अनुभवण्यापेक्षा हया आभासी जगासाठी आपण आपला वेळ फुकट घालवत आहोत याची जाणीवही नसते. हे एक असे चक्रव्युह आहे ज्यातून बाहेर पडणे प्रत्येकाला कठीण जात आहे. यामुळे आपली एकाग्रता कमी होत चालली आहे आणि कामाचा वेगही मंदावला आहे.

3.      तुलना: दु:खाचे मुळ कारण

दुसऱ्याचे फिरण्याचे फोटो, नवीन गाडी किंवा महागडे कपडे बघून आपल्याला वाटू लागते की आपलेच आयुष्य किती नीरस आहे. पण लक्षात ठेवा, सोशल मिडीयावर प्रत्येकजण फक्त त्याचे बेस्ट व्हर्जन दाखवत असतो, पडद्यामागचा संघर्ष आणि दु:ख कोणीच पोस्ट करत नाही. सोशल मिडीयावर दाखविलेले व्हिडीओ खरच सगळे सत्य असतात का? मुळात व्हिडीओ का पोस्ट केला आहे? खरचं काहीतरी द्यायला की काहीतरी कमवायला?

4.    डिजीटल डिटॉक्सची गरज

मोबाईल पूर्णपणे सोडून द्या असे कोणीच म्हणणार नाही. पण दिवसाला काही वेळ नो गॅजेट झोन असायला हवा. कितीही म्हटले तरी जगा बरोबर जावंच लागतं. पण काही प्रमाणात आटोक्यात ठेवू शकतो ना. हे जग सोडण्यापूर्वी जे जे काही पहायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे तो कधी घेणार. सतत मोबाईल वापरामुळे झोप अशांत होते. त्यामुळे काही सवयी आपल्याला लावून घ्याव्यात.

·         जेवताना मोबाईल बाजूला ठेवा

·         झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास स्क्रीन बंद करा

·         आभासी मित्रांपेक्षा प्रत्यक्ष भेटणाऱ्या मित्रांना वेळ द्या

 

निष्कर्ष : social media

सोशल मिडीया हे एक उत्तम साधन आहे, जर ते मर्यादित वापरले तर! आपण सोशल मिडीयाचे मालक व्हायचे की गुलाम, हे आपल्याच हातात आहे. मोबाईल लॉक करा, बाहेर पडा आणि खऱ्या जगाचा आनंद घ्या. कारण खऱ्या आयुष्यात फिल्टर्स नसतात, पण तरीही ते खूप सुंदर असते!

 तुम्ही दिवसातला किती वेळ सोशल मिडीयावर घालवता? कमेंटसमध्ये नक्की सांगा.

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६

अलार्मशी ‘कुस्ती’ की ‘मैत्री’ ? सकाळी लवकर उठण्याच्या 5 भन्नाट टिप्स!

 अलार्मशी कुस्ती की मैत्री’ ? सकाळी लवकर उठण्याच्या 5 भन्नाट टिप्स!

good morning
#marathitips #tipsoftheday 

                     “उद्यापासून पक्का 5 वाजता उठायचं! 

किंवा दरवर्षी अखेर संकल्प सोडतो, नविन वर्षात लवकर उठून व्यायाम सुरु करायचा. असं म्हणून आपण रात्री झोपतो. पण सकाळी 5 वाजता जेंव्हा अलार्म वाजतो, तेंव्हा आपलं मन आपल्याला हळूच सांगतं, अरे अजून 5 मिनिटं झोपला तर काय बिघडणार आहे? आणि ती 5 मिनीटं कधी 1 तासात बदलतात, हे आपल्याला कळतही नाही.

जर तुम्हीही अवस्था अशीच होत असेल, तर हे काही सोपे आणि प्रॅक्टिकलउपाय नक्की वापरून पहा:

1. अलार्म घडयाळ हाताच्या अंतराबाहेरठेवा

बहुतेक लोक मोबाईल उशीपाशी घेऊन झोपतात. अलार्म वाजला की डोळे न उघडता तो Snooze करणं सोपं जातं. त्याऐवजी, मोबाईल किंवा घडयाळ खोलीच्या अशा कोपऱ्यात ठेवा जिथे पोहचण्यासाठी तुम्हाला अंथरुणातून उठावं लागेल. एकदा का पाय जमिनीला टेकले की झोप उघडण्यास मदत होते.

2. रात्रीचं जेवण आणि स्क्रीन टाईम

लवकर उठण्याचं रहस्य रात्रीच्या सवयीत दडलं आहे. हल्ली लोकांची दिवसाची सुरुवात आणि शेटव हा मोबाईलच्या वापरानेच होतो.

·         रात्रीचं जेवण हलकं आणि झोपण्याच्या किमान 2-3 तास आधी घ्या.

·         झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल बाजूला ठेवा. मोबाईलचा निळा प्रकाश (Blue Light)  तुमची झोप पळवतो. त्याऐवजी एखादं पुस्तक वाचा. प्रेरणात्मक अथवा आरोग्याशी निगडीत पुस्तके ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यातील तमुच्या आवडीनुसार विकत घेऊन वाचू शकता. 


3. का उठायचंय?’ याचं कारण स्पष्ट ठेवा

उठल्यावर नक्की काय करायचं आहे, हे रात्रीच ठरवा. जर तुमच्याकडे काही ठोस कारण नसेल (उदा. व्यायामाला जाणं, वाचन करणं किंवा शांतपणे चहा पिणं), तर तुमचं मन तुम्हाला पुन्हा झोपायला प्रवृत्त करेल. सकाळी उठल्यावर मिळणारा तो मी-टाईम’ (Me-Time) खूप सुखावह असतो.

4. खिडकीचे पडदे थोडे उघडे ठेवा

सकाळचा नैसर्गिक प्रकाश जेंव्हा खोलीत येतो, तेंव्हा आपल्या शरीराला आपोआप जाग येण्याचे संकेत मिळतात. सूर्याची पहिली किरणं तुमच्या चेहऱ्यावर पडली की उठणं अधिक सोपं आणि उत्साहवर्धक होतं.

5. स्वत:लाशिक्षा नाही, बक्षीस द्या.

सकाळी लवकर उठणं ही शिक्षा समजू नका, बक्षीस द्या

सकाळी लवकर उठणं ही शिक्षा समजू नका, आज मी लवकर उठलो तर स्वत:ला आवडणारा नाश्ता करेन किंवा छान गाणी ऐकेन असं स्वत:ला सांगा, सकारात्मक विचारांनी उठल्यास दिवसभर उत्साह टिकून राहतो.

थोडक्यात काय तर...

सकाळी लवकर उठणं ही एक सवय आहे, जी लागायला थोडा वेळ लागतो. पहिल्याच दिवशी यशस्वी झाला नाहीत तरी हरकत नाही, पण प्रयत्न सोडू नका, कारण, जो लवकर उठतो, तो जगाच्या दोन पावले पुढे असतो!

तुमचा अलार्म किती किती वेळा ‘Snooze’ होतो? कमेंटसमध्ये नक्की सांगा !


रत्नदुर्ग किल्ला व त्यावरील शिवसृष्टी रत्नागिरी जिल्हयात पर्यटनासाठी एक छान स्पॉट

  रत्नदुर्ग किल्ला व त्यावरील शिवसृष्टी रत्नागिरी जिल्हयात पर्यटनासाठी   एक छान स्पॉट     Ratnadurg Fort, Bhagvati port, Ratnagiri        ...

आणखी पहा