Pages

सोमवार, १५ एप्रिल, २०१९

निसर्ग काय सांगतो



कोण बरोबर आणि कोण चूक हे कसं ठरवायचं?

वाद घालणं हे आयुष्यच 1 अंग आहे. आयुष्यात 1 दा पण वाद न घातलेला माणूस नसेल. आई वडील ,भाऊ बहीण ,नवरा बायको, सासू सून ,नणंद भावजय ,मालक नोकर, शेजारी पाजारी, नातेवाईक. असा वाद कोणाशीही होऊ शकतो. वाद माणूस कशा साठी घालतो तर त्याला स्वतःला त्याच अस्तित्व साबीत करायचं असत.
खूप वेळा वाद इतके विकोपाला गेलेले असतात की कोणीही माघार घेताना दिसत नाही. मोठी माणसं तर आजकाल  अस बोलताना दिसतात की कोण बरोबर आणि कोण चूक हे कोण ठरवणार . तस पण इथे लोकशाही आहे आणि संविधान प्रत्येकाला त्याचे अधिकार देतो . आजकाल स्त्री आणि पुरुष असा भेद केलेला बायकांना नाही आवडत . प्रत्येकांनीच आपापली आपल्याला योग्य आणि सोईस्कर पद्धत अवलंबलेली आहे.
1 पिढी नेहमी दुसऱ्या पिढीला नाव ठेवताना दिसते. सध्या तर नवीन पिढी बरोबर जुळवून घेताना मोठ्यांची फारच दमछाक होताना दिसतीये. त्यातून अनेक वेळा वादाचे प्रसंग येतात.
कधी कपडे घालण्या वरून वाद होतात, तर कधी खान्यावरून होतात तर कधी राहण्यावरून होतात.
कधी कधी काही गोष्टींचं समर्थन केलं जातं. आणि आम्हीच कसे बरोबर आहोत हे सांगितलं जातं. काही वाद हे तात्विक असतात, काही गहन असतात, काही अस्तित्वा साठी असतात, काही दुसऱ्या साठी असतात, आणि काही विनाकारण असतात जे असमंजस पणाचा आविष्कार असतात, काही विकोपाला जाणारे, काही आयुष्यभर तोंड न पाहणारे, काही ती व्यक्ती समोर आली की डोक्यात तिडीक आणणारे तर काही पोटात सुरा खुपवासावा असे वाटणारे वाद असतात.  काही वाद आयुष्यातून उठवतात आणि काही आयुष्य पण संपवतात.

पण मग याला करायचं काय ????? यात कोण बरोबर आणि कोण चूक हे कसं ठरवायचं ?साधी साधी जगण्याची सूत्र बरोबर आहेत की नाही हे कसं जाण्याचं?.....

खरचं बघायला गेलं तर हे प्रश्न खूप अवघड आहेत. एखादी गोष्ट चूक की बरोबर आहे हे बघायला रोज कोणता तराजू मिळणार आपल्याला . आपण मीच कसा बरोबर आहे हे सांगण्यात आपली इतकी शक्ती घालवलेली असते की आपण चूक आहोत हे आपल्या कधी कधी लक्षातच येत नाही.
 पण एक गोष्ट खरी  सांगू का ....... तर आपण चूक कि बरोबर याच उत्तर काही दिवसांनी काळच आपल्याला देत असतो.  पण तितके दिवस आपण थांबायचं का?
तर त्याच उत्तर नाही अस आहे ........
भांडण तर होतच राहणार .पण आपण ज्या साठी भांडत आहोत ती गोष्ट निसर्गाला धरून आहे की नाही ते बघणं जास्त महत्वाचं आहे.
आपण जगताना निसर्ग काय सांगतोय . तो कस जगायला शिकवतोय याच्या मुळाशी जाण महत्वाचं आहे. कारण निसर्ग हा मोठ्ठा जज्ज आहे. तुम्ही चूक आहे की बरोबर हे तोच ठरवू शकतो. तुम्ही जगताना चुकलात तर त्याची शिक्षा तो तुम्हाला नक्कीच देतो. निसर्गा सारखा मोठा समीक्षक कोणीही नाही. तुम्ही निसर्गाला धरून राहिलात तर तुमची जीत हि ठरलेली आहे. तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध राहिलात तर तुमची हार हि निश्चित आहे.... चुकीचा वाद समोरच्या बरोबर असलेल्या माणसाला एखाद वेळेस नामोहरम करून तुम्हाला जिंकण्याचा आनंद देईलही पण निसर्ग तुम्हाला नंतर हारवेल हे नक्की. तस तर प्रत्येक व्यक्तीला ती चूक आहे की बरोबर हे तिच्या अंतरातम्याला माहीत असत....
पण हा उपाय जर प्रत्येकांनी अवलंबला तर कित्येक वाद कमी होतील. कितीतरी भांडण संपतील. माघार घेणं सोपं होईल.....1 दा तरी प्रयोग करून बघा. कारण यात मानसिक समाधान जास्त आहे....

मित्रांनो अशाच प्रकारचे छान छान लेख वाचण्यासाठी व share  करण्यासाठी आपल्या मोबाइल मध्ये अँप करा 
DOWNLOAD 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कोकण रेल्वे मार्गावर खास उन्हाळयासाठी कोकणात समर स्पेशल गाडयांचे वेळापत्रक konkan railway summer special

  कोकण रेल्वे मार्गावर खास उन्हाळयासाठी कोकणात समर स्पेशल गाडयांचे वेळापत्रक konkan railway summer special timetable गाडी क्र.01171 काला...

आणखी पहा