एका वडिलांनी आपल्या मुलाला दिलेले अतिशय सुंदर,
समर्पक उत्तर....
दोन पिढ्यांमधला जगण्यातला फरक....
प्रत्येकाने वाचावं असं काही....
एका तरुणाने आपल्या वडिलांना विचारले:
"तुम्ही पूर्वीच्या काळी कसे काय हो रहात होतात ???
तंत्रज्ञान नाही...
विमाने नाहीत...
इंटरनेट नाही...
संगणक नाहीत...
फारसे नाटक/सिनेमे नाहीत...
टीव्ही तर नाहीच....
एअर कंडिशनर नाही...
कार नाहीत
मोबाईल फोन नाहीत...
त्यावर बाबांनी उत्तर दिले.....
"बाळा, तुमची पिढी खालीलपैकी गोष्टी नसताना आज जशी राहू
शकते ना, तसेच तू सांगितलेल्या गोष्टींच्या अभावात आम्ही रहायचो".....
श्रद्धा-प्रार्थना नाही...
प्राणिमात्रांविषयी करुणा नाही...
कुणाशी सन्मानपूर्वक वागणं नाही...
वडिलधाऱ्यांविषयी आदर नाही...
सुशीलता, लाजलज्जा नाही...
विनम्रता तर नाहीच नाही...
खेळ नाहीत, व्यायाम नाही ...
योग-प्राणायामाचा तर पत्ताच नाही...
प्रत्येकाशी प्रत्येकक्षणी स्पर्धा, निकोप-निरपेक्ष 'मैत्र' नाही...
सखोल वाचन नाही...
अवघं जगणं उथळ, जगण्याच्या तत्त्वज्ञानाचा थांगपत्ता नाही...
1960 ते 1990 या काळात
जन्मलेलो आम्ही खरचं भाग्यवान होतो. आम्ही परिपूर्ण असं जीवन जगलो!
खेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीच हेल्मेट घातलं नव्हतं.
शाळेतून घरी आल्यावर आम्ही संध्याकाळपर्यंत मनसोक्त खेळलो. आम्ही
टीव्ही नाही पहात बसलो.
आम्ही आमच्या जिवाभावाच्या मित्रांसोबत खेळलो, बनावट-बदमाष इंटरनेट
मित्रांबरोबर नाही.
आम्हाला जर कधी तहान
लागली तर, आम्ही नळाचे, विहीरीचे पाणी प्यायलो, बाटलीबंद पाणी नाही प्यायलो.
हाती पैसे कमी म्हणून, आम्ही एकाच ग्लासात दोघं मित्र ऊसाचा रस,
सरबत पीत असू... त्यामुळे, वाटण्यातला निर्भेळ आनंद गाठी बांधला, ती काही आमची उपासमार
नव्हती
आम्ही दररोज भरपूर वरण-भात-भाजी खात होतो, पण चायनीज, फास्टफूड
खाल्ल्यासारखे आम्ही वजन वाढून लठ्ठ नाही झालो.
सर्वत्र हिरवळ, साधे मातीचे रस्ते म्हणून साध्या स्लिपर घालून
फिरतानाही कधि त्रास जाणवला नाही....
आमच्या आई आणि वडीलांना आम्हाला निरोगी व शरीरसंपन्न ठेवण्यासाठी
कोणताही विशेष आहार (ब्रॅण्डेड फूड) आम्हाला द्यावा लागला नाही.
आम्ही स्वत:चे साधेसुधे खेळ स्वतः तयार करायचो आणि ते मनसोक्त
खेळलो, त्या खेळांनी निसर्ग-पर्यावरणाचा कधि घात झाला नाही.
आमचे आईवडील श्रीमंत नव्हते. ते आम्हाला भौतिक सुख देऊ शकले नाहीत;
पण प्रेम त्यांनी भरभरुन दिलं आणि आम्ही ते घेतलं.
आम्हाला कधीही सेलफोन, डीव्हीडी, प्ले स्टेशन, व्हिडिओ गेम, पर्सनल
कॉम्प्युटर, इंटरनेट चॅटचा विचारही शिवला नाही... तरीही पाचपन्नास खरेखुरे मित्र आम्ही
राखून होतो.
आम्ही आमच्या मित्रांच्या घरी कुठल्याही निमंत्रणाशिवाय कधिही
जात होतो आणि एकत्र जेवायचो देखील.
अामच्यावेळी आमचं कुटुंब आणि इतर नातेवाईकांबरोबर असलेल्या जिव्हाळ्याच्या
संबंधांमुळे आम्ही खूप आनंदी होतो.
आमच्या त्यावेळी काढलेल्या काळ्या-पांढऱ्या
पुसट झालेल्या फोटोंमधूनच तुम्ही त्या 'रंगीतस्मृति' शोधू शकता.
आमची पिढी, एक अनोखी आणि अधिक समजूतदार पिढी आहे; कारण, आमची
ही अशी शेवटची पिढी आहे की, ज्यांनी आपल्या वडीलधाऱ्यांच नेहमीेच एेकलं आहे आणि ज्यांना
आज आपल्या मुलांचेही एेकावे लागत आहे! आणि,
आम्ही अजूनही एवढे हुशार नक्कीच आहाेत की, आमच्यावेळी अस्तित्वात नसलेल्या तंत्रज्ञानाचा
योग्य वापर कसा करायचा, याचं मार्गदर्शन वेळप्रसंगी तुम्हाला करु शकतो !!!
जाता जाता बाळा, मला एक प्रश्न तुमच्या नवतरुण पिढीला विचारायचाय,
"तुमची पिढी जर एवढी सुखसंपन्न, संसाधन-तंत्रज्ञानयुक्त व नशिबवान आहे; तर, मग
ती थबकून कधि खराखुरा 'विश्राम', खरीखुरी विश्रांती का घेऊ शकत नाही... त्यासाठी, अनिवार्यपणे
तब्येतीचा आणि कौटुंबिक स्वास्थ्याचा सत्यानाश करणाऱ्या मादक पदार्थांचाच आश्रय हरघडी
का घ्यावा लागतो... सतत, वाघ पाठीशी लागल्यासारखी, तिला जीवनात प्रचंड धावपळ, दगदग
का करावी लागत्येय ???"
आमच्याकडे आता वेळ मर्यादित आहे... त्यामुळे, तुम्ही आमच्यापाशी
असलेल्या या निर्भळ आनंदी जगण्याच्या 'ठेव्या'चा शक्य असल्यास वा इच्छा झाल्यास लाभ
घ्या, "ठेविले अनंते, तैसेचि रहावे", ही अतिशय निसर्ग-पर्यावरणपूरक जाज्वल्य
मराठी संस्कृतीतली जीवनशैली, आमच्याकडून जाणून घ्या... स्वतः आनंदी व्हा आणि पुढच्या
पिढ्यांचं अस्तित्व कायम राखा... त्यांना जगण्यासाठी सुयोग्य निसर्ग-पर्यावरण व नैसर्गिक
संसाधनं शिल्लक ठेवा..... माणूस कितीही मोठा झाला, साधनसंपन्न झाला तरीही तो प्रथम
'दयाळू-मायाळू' असला पाहिजे आणि सरतेशेवटीही तो तसाच असला पाहिजे !!!
जगा, जगवा आणि जगू द्या
!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा