सोशल मिडीया आणि आपण: ‘लाईक्स’ च्या
दुनियेत हरवलेले आपले ‘लाईफ!’
रस्त्याने जाता जाता एक मोबाईलचे स्क्रीन गार्ड
विकणारा फेरीवाला दिसला. त्याच्याकडे सद्या कोणीही गिऱ्हाईक नव्हते. आजुबाजूला लोक
येत जात होते. तो खाली मान घालून बसला होता. मोबाईलमधील रीळ बघण्यात दंग होता. पुढे
बघितल तर भाजीवाला भाजी गिऱ्हाईकाला भाजी पिशवीत भरता भरता भाजीवर ठेवलेल्या
मोबाईलमध्ये रीळ बघत आहे. गिऱ्हाईकाला पटकन पळवण्याच्या मानसीकतेत. मनात विचार आला
काय हे वेड लावून ठेवलंय संगळयांना. खऱ्याखुऱ्या जगापेक्षा त्यातील माणसापेक्षा
आजकाल आपल्याला आभारी जगच अधिक प्यारे झालेय का?
लहान मुलांपासून तर आजी आजोबां पर्यंत जो तो गुंतलेला. आजच्या डिजीटल युगात
आपली सकाळ ‘सुर्योदयाने’ कमी आणि ‘व्हाटस्अप नोटीफीकेशन’ने जास्त होते. डोळे उघडल्या उघडल्या आपण देवाचे दर्शन घेतो
की नाही माहित नाही पण मोबाईलचे दर्शन मात्र नक्की घेतो.
सोशल मिडीयाने जग जवळ आणले हे जरी खरे
असले, तरी आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला विसरत चाललो आहेात का? हा विचार
करण्याची आता वेळ आली आहे.
1. स्टेटसच्या नादात ‘स्थिती’ विसरलो का? status
हल्ली एखादया छान हॉटेलमध्ये गेल्यावर पदाथ जिभेला लागण्यापूर्वी
तो कॅमेऱ्यात कैद होतो. चव कशी आहे यापेक्षा फोटोला ‘लाईक्स’ किती मिळतील,
यातच आजचा आनंद सामावलेला दिसतो. तीच गत एखादया सुंदर ठिकाणी गेल्यावर तिथला आनंद
उपभोगण्यापेक्षा फोटो आणि रीळमध्येच सगळे अडकलेले. आपण नक्की कोणासाठी जगतोय? स्वत:साठी की
फॉलोअर्सना दाखवण्यासाठी?
2. ‘स्क्रॉलींग’चे चक्रव्युह- scrolling
“फक्त 5 मिनीटे रील बघतो” असे
म्हणून आपण मोबाईल हातात घेतो आणि कधी तासभर निघून जातो, हे कळतही नाही. प्रत्येकाला
आयुष्य हे वेगवेगळे दिलेले आहे. जेवढे काही आयुष्य आहे त्यातील सुंदर क्षण
अनुभवण्यापेक्षा हया आभासी जगासाठी आपण आपला वेळ फुकट घालवत आहोत याची जाणीवही
नसते. हे एक असे चक्रव्युह आहे ज्यातून बाहेर पडणे प्रत्येकाला कठीण जात आहे. यामुळे
आपली एकाग्रता कमी होत चालली आहे आणि कामाचा वेगही मंदावला आहे.
3. तुलना: दु:खाचे मुळ कारण
दुसऱ्याचे फिरण्याचे फोटो, नवीन गाडी किंवा महागडे कपडे बघून आपल्याला
वाटू लागते की आपलेच आयुष्य किती नीरस आहे. पण लक्षात ठेवा, सोशल मिडीयावर
प्रत्येकजण फक्त त्याचे ‘बेस्ट व्हर्जन’ दाखवत असतो, पडद्यामागचा संघर्ष आणि दु:ख कोणीच पोस्ट
करत नाही. सोशल मिडीयावर दाखविलेले व्हिडीओ खरच सगळे सत्य असतात का? मुळात
व्हिडीओ का पोस्ट केला आहे? खरचं काहीतरी द्यायला की काहीतरी कमवायला?
4. डिजीटल ‘डिटॉक्स’ची गरज
मोबाईल पूर्णपणे सोडून द्या असे कोणीच म्हणणार नाही. पण दिवसाला
काही वेळ ‘नो गॅजेट झोन’ असायला
हवा. कितीही म्हटले तरी जगा बरोबर जावंच लागतं. पण काही प्रमाणात आटोक्यात ठेवू
शकतो ना. हे जग सोडण्यापूर्वी जे जे काही पहायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे तो कधी
घेणार. सतत मोबाईल वापरामुळे झोप अशांत होते. त्यामुळे काही सवयी आपल्याला लावून
घ्याव्यात.
·
जेवताना मोबाईल
बाजूला ठेवा
·
झोपण्यापूर्वी
किमान अर्धा तास स्क्रीन बंद करा
·
आभासी
मित्रांपेक्षा प्रत्यक्ष भेटणाऱ्या मित्रांना वेळ द्या
निष्कर्ष
: social media
सोशल
मिडीया हे एक उत्तम साधन आहे, जर ते मर्यादित वापरले तर! आपण सोशल मिडीयाचे ‘मालक’ व्हायचे की ‘गुलाम’, हे आपल्याच हातात आहे. मोबाईल लॉक करा, बाहेर
पडा आणि खऱ्या जगाचा आनंद घ्या. कारण खऱ्या आयुष्यात ‘फिल्टर्स’ नसतात, पण तरीही ते खूप सुंदर असते!
“तुम्ही दिवसातला किती वेळ सोशल मिडीयावर घालवता? कमेंटसमध्ये
नक्की सांगा.”