प्रसिद्ध व्यक्तींचे सुविचार:
=====================
नदी वाहून गेल्यावर पाय
न भिजविता पलिकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न बसता पाण्यात उडी घालून आणि प्रवाह
तोडून पलीकडे चला.
स्वामी विवेकानंद
तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर पुढे जाऊ नका पण पुढे जाणाऱ्याला
मागे खेचू नका.
लोकमान्य टिळक
सत्य असेल तर काळाच्या ओघात ते टिकेल, असत्य असेल तर ते अदृष्य
होईल.
साने गुरुजी
दिवसभरात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून
जात आहात, असे समजावे.
स्वामी विवेकानंद
सर्वच प्रश्न सोडून सुटणारे नसतात, काही प्रश्न सोडून दिले की
सुटतात.
विनोबा भावे
आत्मविश्वास हे कर्तृत्ववृक्षाचे मूळ आहे, वृक्षांची मुळे जो
जो भूमीत खोल जातात तो तो वादळाशी झुंजण्याचे त्याचे सामर्थ्य वाढते; आयुष्यातील नानाविध
संकटाशी टक्कर देण्याला आत्मविश्वासही असाच उपयोगी पडतो.
वि.स.खांडेकर
घर ही गोष्ट दगडविटांनी बांधले जात नाही, जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या
धाग्यांनी बांधले जाते तेच खरे घर.
वि.वा.शिरवाडकर
इतरांपेक्षा स्वतःला जास्त ओळखा, ईतरांपेक्षा जास्त काम करा आणि
इतरांपेक्षा कमी अपेक्षा करा, या तीन गोष्टी यश मिळविण्यासाठी महत्वाच्या आहेत.
विल्यम शेक्सपिअर
यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे हे मी सांगू शकणार नाही.
पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच
यशाच्या जवळ जाणे होय.
विश्वनाथन आनंद
मुलांना मनासारखं करु द्यायला हवं, त्यांची अभिरुची विकसित होत
जाईल. आपण काही लादू नये, फक्त प्रोत्साहन द्यावं. मुलं निसर्गाच्या संवेदनांचा शोध
घेतील.
विष्णु चिंचाळकर
सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड करणे.
सुभाषचंद्र बोस
मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे हा त्याचा
चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
सर्वपल्ली राधाकृष्णन
गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा होय.
सरदार वल्लभभाई पटेल
श्रद्धा हा असा पक्षी आहे जो पहाटेच्या गर्द काळोखात त्याला प्रकाशाची
चाहूल लागून तो गाऊ लागतो.
रवींद्रनाथ ठाकूर
निर्बुद्ध लोक दुसऱ्यावर हसतात आणि बुद्धीवान स्वतःवर.
ओशो
जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग
शोधून ठेवावेत.
एन.आर.नारायणमूर्ती
ज्या दिवशी आपली थोडी सुद्धा प्रगती झाली नसेल, तर आपला तो दिवस
फुकट गेला असे समजावे.
नेपोलियन बोनापार्ट
समाजावर जर काही प्रभाव पाडायचा असेल तर आपण आपले लक्ष बालकांकडे
वळविले पाहिजे. हे सत्य मान्य केले तर शिशुविहारांचे महत्त्व समजते. ही बालकेच आपल्या
भविष्याला आकार देणार आहेत आणि आपण जे साहित्य, शिक्षण त्यांना देऊ त्यावरच त्या आकाराची
घडण अवलंबून असणार आहे.
मारिया मॉंटेसरी
पूर्ण नम्रताभाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही.
महात्मा गांधी
प्रत्येकजण जग कसे बदलेल याचा विचार करत असतो मात्र कुणीही स्वतःला
कसे बदलता येईल याचा विचार करत नाही.
ल्येव तल्स्तोय
पैसा हा खतासारखा आहे; तो साचवला की कुजत जातो आणि गुंतवला तर
वाढायला मदत करतो.
जे.आर.डी.टाटा
माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले याचा अर्थ मी कुणी वेगळा,
हुशार आहे असा होत नाही तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा
जरा जास्त होती इतकेच.
आयझॅक न्यूटन
परिस्थिती मानसाला घडवत नसते तर ती त्याला प्रकट करते.
जेम्स अॅलन
रडू नकोस, रडायला वेळ तरी कुठे आहे? स्वतःच्या अंतरंगात दीप चेतव.
त्या दीपाच्या प्रकाशात निर्वाणपद प्राप्त करण्याचा मार्ग शोध.
बुद्ध
चुका दाखवितांना त्या कमी कशा करायच्या हेही सांगितले तर त्याचा
परिणाम चांगला होतो.
बिल गेट्स
जीवन केवळ दीर्घ नव्हे तर महान असावे.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर
पहिले यश मिळाल्यानंतर स्वस्थ बसू नका कारण दुसर्या प्रयत्नात
जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणेल की पहिलं यश केवळ नशीबाने मिळाले होते.
ए. पी. जे. अब्दुल कलाम
जेव्हा एखाद्याला वाटत असेल की त्याने आयुष्यात एकही चूक केली
नाही तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही असे समजावे.
अॅल्बर्ट आइन्स्टाइन
प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास
न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.
अब्राहम लिंकन
अपयशी झाल्यावर आपल्याला अपयशका आले? याचे स्पष्टीकरण द्यावे
लागते, मात्र यशस्वी झाल्यावर एका शब्दाचेही स्पष्टीकरण द्यावे लागत नाही.
ॲडॉल्फ हिटलर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा