Pages

सोमवार, १५ एप्रिल, २०१९

"तृप्तपदी"

 "तृप्तपदी" 


वा! 32 गुण जुळलेले आहेत,
लवकर लग्न उरकून टाकु या."

ज्या घरात उपवर वधु वर आहेत तिथे हा संवाद नक्कीच ऐकायला येतो. कागदावरील पत्रिका जुळली म्हणजे मनातील पत्रिका खरचं जुळते का? नक्कीच नाही.

निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नसते तर  मिळणारा जीवन साथीदार' अगदी आपल्याला हवा तसा असणार कसा? त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे. लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने दोन मनं अगदी एकमेकां सारखी असणे जवळ-जवळ अशक्य आहे. वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले दोन जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे?आपल्याला 'हवी तशी' व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल.

 32 गुण जुळले म्हणजे आवडी निवडी जुळतील का ?
कधीच नाही.पण न जुळलेल्या चार गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी.पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना सांगितलंच जात नाही. या न जुळलेल्या गुणांशीच खरं तर आपलं लग्न होत असतं.
तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली...
नाही जमलं की विस्कटली.

बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, श्रद्धा-अंधश्रद्धा असे  प्रश्न विचारले जातात या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या सुंदर मुलींच्या उत्तरांसारखीच ठराविक साच्याची असतात.  खरंतर एकमेकांनावर इम्प्रेशन मारण्यासाठी खऱ्या पेक्षा खोटी माहिती सांगितली जाते. लग्नानंतर मग खरं काय ते एकमेकांना समजते व भ्रमनिरास होतो व इथुन संसारात ठिणगी पडायला सुरवात होते.... नाही जुळलं -मोडा, व्हा विभक्त... अशा वेळीच समुपदेशन व समुपदेशकांची गरज असते.

धुमसत राहणाऱ्या राखेत  फुलं कशी फुलणार ?
संसाराची बाग फुलवायची असेल तर ही सात पावले खंबीरपणे टाका....

आपल्यापेक्षा  वेगळ्या व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं.
हे या वाटेवरच पाहिलं पाऊल..

एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत,
ते स्वीकारणे हे दुसरे पाऊल..

एकमेकांच्या गुणांची कदर करणे हे तिसरे पाऊल...

चवथे व महत्त्वाचे पाऊल म्हणजे,
एकमेकांना गुणदोषासह स्विकारणे ...

पाचवे पाऊल सहनशीलता... 

सर्वात महत्वाचे म्हणजे तडजोड करणे..

अहंम पणाचा त्याग करणे..

ही पावलं योग्य विश्वासाने पडली की मग ती "सप्तपदी" ची  "तृप्तपदी" होते. ही तृप्तपदी होण्यासाठी हा सर्व ऊपद्व्याप.
हेच संसाराचं खरं मर्म आहे.

सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही.
या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.
हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.आयुष्य म्हणजे बुद्धीबळाचा पट आहे. सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन आहे. यात कधी कधी प्यादे सुद्धा राजाला शह देतात. म्हणुन आयुष्याच्या पटावर संधी बघुन चाल खेळावी लागते. तरच जीवन यशस्वी होते.

"मेड फॉर इच अदर" आपोआप होत नाही तर...
आपल्यालाच जमवाला लागते...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा