कसल भारी होत जीवन ।
नव्हती कसली भ्रांत..।
पैसा नसे बाबांकडे ।
तरी ते दिसत शांत..।
रिकामे डबे, आई कधी
आदळतही नसे..।
तेल नसे भाजीला, तरी
चव अविट असे..।
चपाती तर घरी!
पाहूणे आल्यास कधीतरी व्हायची ।
ती खायला मिळणार,
या आनंदातही तृप्ती असायची..।
सगळ्या मोसमातील रानमेवा कोणीतरी आणून द्यायचे..।
आई बसायची वाटायला
तरी रूसण्याच कौतुक असायचे..।
डोळे मिचकावत चिंचा खाताना, गप्पा किती रंगत..।
चटणी भाकरीची मग
बसे अंगत पंगत ।
धो धो पाऊस कोसळताना मुद्दामच भिजायच,
आजीच्या सुती लुगड्यान मग ओल डोक पुसायच.....।
कुडकुडणार्या थंडीत
चुलीचीच शेकोटी असायची,
विश्वाच ग्यान देत मग
आई भाकरी थापायची......।
एकच स्वेटर दर वर्षी
जपून ठेवला जायचा..।
खुपच लहान झाला तर
लहान भावाला द्यायचा......।
उन्हाळ्याच्या सुट्टयात
सगळे आंबे खायला जमत..।
खोल्या भरून आंबे असतानाही पाडाच्या अंब्यासाठी भांडणे जुंपत......।
काहीच नव्हत जवळ तरी,
माणस खुप श्रीमंत होती..।
गरीबीत जगतानाही
माणसात माणूसकी होती......।
आता पैसा आहे बाबांकडे,
डबेही भरलेले,
पण तरी आदळापट आणि बाबा
चिडलेले..।
चपाती रोज गॅसवर बनवली जाते,
रोज दोन तीन भाज्या..।
ताट भरलेले तीनही वेळा,
पण एकट्याला जेवणाची सजा.....।
सण येतात आणि जातात,
सजले धजलेले फोटो अपलोड करण्यासाठी..।
वेळ नसतो मुलाला आईस भेटण्यासाठी..।
सगळी फळे मिळतात बाजारात,
चव नसते कशाला..।
अॅसीडच्या मार्याने संपवलेले असते जीवनसत्वाला.....।
सगळ मिळवलं माणसाने,
पण समाधानच गमावले..।
खिसे भरले पण
"मन"च रिकामे झाले..।
खुप श्रीमंत झाला माणूस, पण....
माणूसकी हरवून बसला..।
भरल्या घरात राहूनही,
आनंद बाहेर शोधू लागला.....॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा