नदी सारखं जगावं
आयुष्य कठीण अजिबात
नसतं . .
कधी नळाला पाणी नसतं...
कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...
कधी पगार झालेला नसतो
. . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .
कधी मिळवलेला पगार
कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .
कधी जागा नसते . .
कधी जागा असून स्पेस नसते . . कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब
नसते . .
कधी डब्यात आवडती भाजी
नसते . . कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . . दोन्हीही मनासारख्या असल्या तरी
शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .
कधी कोणी सोबत असून
एकटेपणा असतो . . कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्या सारखे वाटते . .
कधी काही शब्द कानावर
पडतात . . कधी नको ते शब्द कानावर आदळतात . .
कधी हव्या असलेल्या
माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . .
कधी आपण कसे वागायचे
समजत नाही . . कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .
कधी दोष कोणाला द्यायचा
समजत नाही . . कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .
कधी डोकं टेकायला जागा
सापडत नाही . . कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .
कधी कोठे रिजिड आणि
कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . .
कधी समोरचा /ची आपल्याला
अकारण हक्काचा /ची वाटू लागते . . कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला
नकोसा वाटू लागतो . .
कधी पैसा असला कि नात्यांच्या
मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा -मौज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो
. . . यात अजून ४-५
गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ??
ताण घेतला तर तणाव
. .
आजचे भागले म्हणून
आनंद आणि
उद्याच काय म्हणून
चिंता
आयुष्य कठीण करते .
आपण नदी सारखं जगावं
. . सतत वहात राहाव्.......
या जन्मावर या जगण्यावर
शत:दा प्रेम करावं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा