रत्नदुर्ग किल्ला व त्यावरील शिवसृष्टी रत्नागिरी जिल्हयात पर्यटनासाठी एक छान स्पॉट
हल्ली कोकणात पर्यटक व चाकरमानी मोठया संख्येने अगदी एक-दोन दिवसांच्या सुट्टीतही फिरायला येत आहेत. बऱ्यापैकी झालेले रस्ते आणि कोकणातील बीचेस, किल्ले,देवस्थाने अगदी फुलुन जातात. जिल्हयात असणाऱ्या वेगवेगळया ठिकाणामध्ये आणखी एक ठिकाणी भर पडली आहे. इतिहासातील शौर्याची आठवण करुन देणारे आणि पुलकित करणारे असे ठिकाण म्हणजे रत्नदुर्ग येथील शिवसृष्टी. रत्नागिरी शहरापासून थोडयाच अंतरावर रत्नदुर्ग हा किल्ला आणि त्यावर भगवती देवीचे मंदीर आहे. खाली भगवती बंदर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्या आली आहे शिवसृष्टी. पण त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी अंधार पडण्याची वाट बघावी लागेल. कारण अंधारात खुप छान सजावट व प्रतिकृती अगदया खऱ्या वाटतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या
इतिहासातील मोजके गड आणि त्यांचे सरदार यांची प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत.
किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि त्यासमोर त्यांची थोडक्यात माहिती फलक लावले आहेत.
क्यूआर कोड वापरुन त्याची माहिती इंटरनेटवरही उपलब्ध आहे.
त्याचप्रमाणे शिवरायांचे विश्वासू व पराक्रमी सरदार बाजी प्रभू देशपांडे, कान्होजी आंग्रे यांचे पुतळे व थोडक्यात माहिती फलकावर दर्शविणेत आली आहे. तसेच युध्दनौकेची प्रतिकृती अगदी बारकाव्यांसह उभारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवकालीन खेडी कशी होती. तेथील लोकांचे राहणीमान, वेशभुषा, अ. बारकाव्यासह उभारण्यात आले आहे. हे सर्व पाहताना एक ते दीड तास सहज निघून जातो. बाहेर पडताना केवळ पर्यटन म्हणून नव्हे तर अभिमानाने छाती भरुन येते आणि इतिहासातील ती पाने डोळयासमोर येतात. एकदा नक्कीस भेट दयावी असे हे ठिकाण आहे.



