ययाति" मधील भावलेले
विचार
*
या जगात जन्माला येण्याचा
एकाच मार्ग आहे, तसं मरणाच नाही...
मृत्यु अनेक वाटांनी
येतो! कुठून ही येतो तो!
*
आत्मप्रेम
या जगात जो तो आपापल्याकारिता
जगतो हेच खरे.
वृक्षवेलीची मूळे जशी
जवळच्या ओलाव्याकडे वळतात तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात.....
याला जग कधी प्रेम
म्हणते, कधी प्रिती म्हणते, तर कधी मैत्री........पण खरोखरच हे "आत्मप्रेम"
असते....
*
आयुष्याच्या आरंभी
ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे,
असे आयुष्याच्या शेवटी
आढळून येते.........
*
अपहार
ते फूल पाहून माझ्या
डोळयांना जे सुख होईल ते सुख प्रत्येक दिवशी मी घेणार आहे.
ते फार चांगलं उमललं
म्हणजे वेलीजवळ जाउन त्याचा वासही घेणार आहे मी.
पण ते तोडणार मात्र
नाही. आज वासासाठी एक फूल खुडलं तर उद्या तेवढ्याच सुखासाठी फूलामागून फूलं खुडाविशी
वाटतील मला.
मग दूस-यांच्या फूलांचा
अपहार करण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होईल........
अपहारासारखा अधर्म
नाही..........
*
सत्य
लज्जा हा सौंदर्याचा
अलंकार आहे. सत्याचा नाही. सत्य हे नग्न असते.
नुकत्याच जन्मलेल्या
बालाकाप्रमाने असते ते ! ते तसे असावेच लागते..........
*
सुख
या जगात सुख लूटण्याचा
काळ एकच असतो-----ते मिळत असते तेव्हा.......!
*
प्रिती
प्रिती ही कधी उमलणा-या
फूलासारखी हसते तर कधी उफाळणा-या ज्व़ाळेसारखी दिसते.
ती कधी चांदणी होते,
तर कधी वीज होते. ती कधी हरिणीचे रूप घेते, तर कधी नागीणीचे... ती कधी जीव देते, तर
कधी जीव घेते.........!!
*
जीवन
जीवन नेहमीच अपूर्ण
असतं. नी असं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे...
*
प्रेम
प्रेम माणसाला स्वत:च्या
पलीकडे पाहायची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो,
ते कशावरही जड़लेलं
असो. मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं! ते स्वार्थी, लोभी, किंवा फसवं असता कामा
नये.
खरं प्रेम नेहमीच नि:स्वार्थी
असतं, निरपेक्ष असतं... मग ते फूलावरलं असो, प्राण्यावरलं असो, सृष्टिसौंदर्यावरलं
असो, आई-बापावरलं असो,
प्रियकर-प्रेयसी यांच्यावरलं
असो, कुल, शांति, राष्ट्र यांच्यापैकी कुणावरलंही असो. नि:स्वार्थी, निरपेक्ष,
निरहंकारी प्रेम हीच
माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी असते...........
असलं प्रेम केवळ मनुष्य
करू शकतो!
*
जग माणसाच्या दयेवर
चालत नाही.
ते त्याच्या मनगटातल्या
बळावर चालतं.
माणुस केवळ प्रेमावर
जगुच शकत नाही.तो इतरांचा परभव करुन जगतो.
मनुष्य या जगात जी
धडपड करतो ती भोगासाठी ! !
त्यागाची पुराणं देवळातच
ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही,ते रणांगन आहे.
*
मुद्र शिंपल्यात घालून
कधी कुणाला दाखविता येईल का ?
फुलाचे चित्र काढून
कधी त्याचा सुगंध घेता येईल का ?
प्रीतीची अनुभूती सुद्धा
अशीच आहे.
*
दैव हे मोठ क्रूर मांजर
आहे माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असतो
*
लज्जा सौंदर्याचा अलंकार
आहे. सत्याचा नाही, सत्य हे नग्न असतं.
माणसांन उपभोग घेऊ
नये अशी जर देवाची इच्छा असती,
तर त्यानं शरीर दिलच
नसतं, पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे.
देवान माणसाला शरीराप्रमाणे
आत्माही दिला आहे.
शरीराच्या प्रत्येक
वासनेला या आत्म्याच बंधन हवं
त्यागाची पुराण देवळात
ठीक असतात पण जीवन हे देवालय नाही ,
ते रणांगण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा