विचार
पैशाने पुर्ण झालेली
स्वप्न,
मरेपर्यत टिकतात..
कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न,
इतिहास घडवतात..
घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार
आहे ....
""परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण
तिथे एक कुटुंब आहे ""....
कुणाच्या नशिबाला हसू
नये
नशिब कुणी विकत घेत नाही
वेळेचे नेहमी भान ठेवावे..
वाईट वेळ सांगून येत नाही.!
बुद्धी कितीही तल्लख
असली तरी
नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
बिरबल बुद्धीवान होता तरीही तो
राजा होऊ शकला नाही.!
समाधान ही अंत:करनाची सर्वात सुंदर संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती
मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.
"अशा व्यक्तीवर
जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल
हसण्यामगील दुःख
रागवण्या मागील प्रेम
*आणि शांत रहाण्यामागील
कारण."
कपडे नाही
माणसाचे विचार
Branded पाहिजे...!
चुकीच्या बाजूला उभा
राहण्यापेक्षा
एकटं उभं रहाणं केव्हाही
चांगलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा