Pages

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

तेजोवलय (Aura)


तेजोवलय (Aura)



ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,

मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते.

माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.
यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले मत तयार होते.. याचे कारण आपले आणि त्याचे हृदय चक्र (अनाहत चक्र) जी तेजोवलये बाहेर सोडत असतात ती एकमेकांना स्पर्शतात आणि सूक्ष्म पातळीवर माहितीची देवाणघेवाण करतात.. आणि आपण त्याप्रमाणे त्याच्याशी आपले वागणे बोलणे ठरवतो.
 
मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती.. आपल्या मनात दिवसाला सरासरी 70000 विचार येतात.. विचार सुद्धा  ऊर्जा रुपातच उत्सर्जित होत असतात..  त्यांचा ही प्रभाव आपल्या तेजोवलयावर पडत असतो.  सकारात्मक विचारांमुळे आपले तेजोवलय नेहमी स्ट्रॉंग रहाते. जर आपण सतत निराशेच्या , द्वेषाच्या किंवा रागाच्या विचारात राहात असू तर आपल्या तेजोवलायवर त्यांचा विपरीत परिणाम होतो.   आपले विचार आपल्या भावनांना जन्म देतात..आणि त्यानुसार तेजोवलय बदलत राहाते..

जर दोन्ही हात पसरून आपण उभे राहिलो तर जो अंडाकृती आकार आपल्या शरीरासभोवती तयार होईल तेवढे सर्वसाधारण निरोगी माणसाचे तेजोवलय त्याच्या शरीराबाहेर सर्व दिशांनी  पसरलेले असते. या ह्ददीत आपली आवडती किंवा जवळची व्यक्ती आली तर आपल्याला आवडतं.. पण ज्यांच्या शी आपलं फारसं पटत नाही किंवा वर सांगितल्या प्रमाणे एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल आपले प्रथमदर्शनी चांगले मत नाही अशी व्यक्ती आली , तर आपण नकळतच 2 पावलं मागे सरकतो.. कदाचित यावरूनच ,"keeping someone at arm' length" किंवा "2 पावलं दूर रहा " वगैरे वाकप्रचार निघाले असावेत.

तेजोवलय जर clean आणि strong असेल तर आपल्या आरोग्यावरच नव्हे तर सम्पूर्ण  आयुष्यावरच त्याचा चांगला परिणाम होतो.  तुमचं सगळं व्यक्तिमत्व दुसरयांवर प्रभाव पडणारं बनतं.. आपसी संबंध चांगले रहातात.. उच्च पदावरील व्यक्ती, अभिनेते, देशप्रमुख किंवा इतरही क्षेत्रातील अशा व्यक्ती ज्यांना  नेतृत्वगुण आणि mass  influence ची सवय असते  त्यांचे तेजोवलय खूप स्ट्रॉंग असते.

प्राचीन योग शास्त्रात देखील तेजोवलयाचं महत्व सांगितलं आहे.  आपण जर देवदेवतांची चित्र पाहिली तर त्यांच्या मस्तका भोवती गोल तेजस्वि प्रकाश दाखवलेला असतो.  ते तेजोवलय असते. उर्जास्वरूपात असल्याने साध्या डोळ्यांना तेजोवलय बघता येत नाही. पण काही विशिष्ठ पद्धतीने नियमित अभ्यास आणि सराव केला तर ते शक्य आहे. 

तुम्ही शब्दांनी, वागण्याने आपल्या भावना किंवा intentions  लपवू शकता .. पण तुमचे तेजोवलय काहीही लपवून ठेवत नाही.. तुमच्याबद्दलची सर्व माहिती तुमचं तेजोवलय देत असते.
आपण पाहिले की तेजोवलय उर्जास्वरूपात असल्याने ज्यांचे आज्ञाचक्र किंवा तृतीय नेत्र विकसित झाला आहे, जसे थोर संत, योगी, किंवा अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती, यांना ते सहज बघता येते.

1939 साली सायमंड कीर्लियन या एका रशियन शास्त्रज्ञाला इतर काही संशोधन करत असता अपघातानेच अशा  एका तंत्राचा शोध लागला ज्यायोगे त्याला मशिनद्वारे तेजोवलय बघता आले. त्याने त्या तेजोवलयाचे छायाचित्र (photograph) घेतले.  व तेजोवलयावर आणखी संशोधन करून Aura किंवा तेजोवलय खरोखर अस्तित्वात असते हे सिद्ध केले.  ह्या तंत्राला कीर्लियन फोटोग्राफी असे नाव पडले. 

भारतात प्राचीन काळी ऋषीमुनींना त्यांच्या यौगिक सामर्थ्याने तेजोवलयाचे सर्व ज्ञान होते व ते त्यांना सहज पहाता येत असे.  तेजोवलयाला सुद्धा विविध रंग असतात आणि त्या रंगांना अर्थ असतात, किंवा रंगांमधून आपल्याला तेजोवलयाबद्दल अधिक माहिती मिळते ह्याचे सखोल ज्ञान आपल्या अंतर्चक्षूंद्वारे त्यांना होते.  यावर अनेक पौराणिक आणि इतर ग्रंथांमध्ये माहिती उपलब्ध आहे. कीर्लियन फोटोग्राफीने घेतलेल्या तेजोवलयाच्या छायाचित्रात सुद्धा असे विविध रंग आढळून आले.  आणि अखेर आधुनिक विज्ञानाने तेजोवलयाचे अस्तित्व मान्य केले.   गुगल वर कीर्लियन फोटोग्राफी या विषयावर सर्व माहिती उपलब्ध आहे.

तुमचे तेजोवलय ही तुमची पर्सनल सिग्नेचर म्हणता येईल.  जो माणूस आंधळा आणि बहिरा आहे, तो सुद्धा त्याच्या जवळ येणाऱ्या इतर लोकांचे अस्तित्व बरोब्बर ओळखतो.. सांगू शकाल , कसे..?  कारण, देवाने दिलेल्या पंचेंद्रियां पैकी जेव्हा एखादे काम करत नाही तिथे बाकीची वइंद्रिये अतिसंवेदनशील होतात.  ही लोकं इतरांचे अस्तित्व त्यांच्या तेजोवलयावरून ओळखतात.  प्रत्येक माणसाकडे तेजोवलय बघायची, ते ओळखायची, त्याचा अर्थ जाणून घ्यायची जन्मजात क्षमता आहे. फक्त ती विकसित करावी लागते.

तेजोवलय clean आणि strong का ठेवावं..?कारण याचे  खूप फायदे आहेत.
1. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहातं.
2. आपलं आपल्या भावनां वर नियंत्रण रहातं. व्यक्तिमत्व balanced रहातं.
3. व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होतं. नातेसंबंध.. जो आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे.. ते छान रहातात.  सर्व आघाड्यां वर यशप्राप्ती होते.
4. तुमची intuitive power वाढते.
5. तुम्ही तुमच्या स्वतः च्या प्रकाशात रहाता. Victim होण्यापासून किंवा इतरांच्या प्रभावा पासून दूर राहता.

पहिल्या भागात बघितल्या प्रमाणे कुठल्याही interaction किंवा नातेसंबंधां मधे (personal, professional, social) ऊर्जेची देवाणघेवाण होत असते.  

अगदी दैनंदिन आयुष्यात बघायचं झालं तर आपण सकाळी उठून आवरून आपल्या ऑफिसला जायला निघतो..( घरातल्या कटकटी असतील तर त्याही आल्या ) जाताना रस्त्यात ट्रॅफीक मधे इतर वाहन चालकांबरोबर  वाद होतो..किंवा ट्रेन मध्ये गर्दीत उभे असताना कोणी ओळखीचा भेटतो आणि तो आपल्या अडचणींचा पाढा वाचतो..  ऑफीस मधे बॉस किंवा सहकाऱयां बरोबर अनबन होते..असं बऱ्याच लोकांशी आपलं interaction होत असतं.. सकारात्मक संवाद असेल तर ठीक पण बऱ्याचदा नकारात्मक बोलणं होतं आणि  लोकांच्या विचारां मधली, बोलण्यातली ऊर्जा आपल्या तेजोवलयामधे येते.. आपली त्यांच्याकडे जाते.  अशा प्रकारे तुम्ही जेव्हा रात्री घरी येता तेव्हा विचार करा की किती जणांची नकारात्मक ऊर्जा तुम्ही घेऊन येता.

खालील कारणां मूळे तेजोवलय संक्रमित किंवा दूषित होऊ शकतं..
1. नकारात्मक विचार,  भावना, शब्द, कृती, आपली किंवा इतरांचीही
2.भीती (social conditioning, beliefs)
3. Low self esteem, low self confidence, lack of self love.
4. कुसंगत
5. कोमा, ऑपरेशन, ऍक्सिडेंट, मानसिक धक्का
6. दुसऱ्याचे जाणीवपूर्वक फेकलेले वाईट विचार किंवा intentions
7.वाईट जागा, अपवित्र स्थळे
8. नशा, इतर वाईट सवयी
8. All internal and external factors beyond our control.

तेजोवलय दूषित असेल तर पुढील लक्षणे आढळतात..
1. अकारण भीती, सतत चिडचिड, राग, चिंता, मत्सर, depression.. Emotional imbalance.
2. Strained relationships
3. Accidents, अडचणी.
4. Imbalanced personality and life.
5. अनारोग्य

वरील लिस्ट वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की जशी आपण दररोज शरीराची स्वच्छता ठेवतो तसेच तेजोवलय clean ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.  कारण हे केलं नाही तर उर्जारूपात जो नकारात्मक कचरा तिथे साठत जातो, त्याने हळूहळू आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

तेजोवलय clean ठेवणं अतिशय सोपं आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी वागण्याचे खूप छान नियम,  रीतीरिवाज घालून दिले आहेत. आपण आजही त्यातील बरेचसे नियम पाळतो. बदलत्या काळानुसार काही पाळणं शक्य नसतं. पण तरीही आधुनिक जीवनशैलीशी सांगड घालून, याविषयीचे आवश्यक ज्ञान घेऊन, आपण काही छोटे बदल केले, नियम केले, तर आपण आपले तेजोवलय रोजच्या रोज नक्की cleanआणि strong  ठेवू शकतो.
तेजोवलय अंतर्गत आणि बाह्य अशा विविध गोष्टीनी प्रभावित होत असतं आणि त्यामुळे सतत बदलत असतं. दिवसभरात बऱ्याच घटना, गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यांच्यावर आपले नियंत्रण नसते. आणि आपले तेजोवलय संक्रमित होत राहाते. 

आपण आपले तेजोवलय खालील उपायांनी  रोजच्या रोज शुद्ध ठेऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा