Pages

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

प्रश्न एक उत्तर अनेक ...



प्रश्न एक उत्तर अनेक ...

तो अति हुशार आणि ती जरा साधी.....नीटनेटका संसार करणारी. दिसायला सुंदर नसली तरी चार चौघींमध्ये उठून दिसणारी.
संसार संथ गतीने चालला होता.... म्हणजे तो हुशार असुन हुशारीचा खूप फायदा न घेतलेला आणि अगदी प्रिंसिपलच्या चौकटीत जगणारा . इतकं की कंपनी कडुन दर वर्षी मिळणाऱ्या व्हॅकेशन -पॅक पण नं वापरणारा. तिने दर वर्षी म्हणावं की ह्या वर्षी जाउयातना कुठे आणि त्याने नेहमीप्रमाणे उत्तर द्यावं "अगं मी ज्याचे पैसे घेतो ते काम पूर्ण झालं नाही तर कंपनी जे फुकटात देते ते कसं घेणार . वेळेत पूर्ण झालं काम तर नक्की जाऊ" . आणि वेळेत काम संपण्याचा कधी प्रश्नच नव्हता कारण एक प्रोजेक्ट संपला कि दुसरा सुरु व्हायचा. बरं, इतकं काम करून कधी प्रोमोशन किंवा पगार वाढ वगैरे कामा प्रमाणे नाहीच ...ते कंपनीच्या नियमानुसारच होणार. अर्थात हे फक्त त्याच्या पुरतं . कारण तो कधी बॉसशी या बाबतीत बोलणार नाही . स्वतःहून या विषयी बोलायला अपमानास्पद वाटायचं. एकंदरीत काय तर नीरज आपल्या चौकटीत आयुष्य जगत होता. तो स्वतः खुश असेल तर ते पण ठीक होतं पण त्याला कळायचं की तो त्याच्याच बनवलेल्या आयुष्याच्या प्रिंसिपल्सने मागे पडलाय आणि मागेच राहाणार . पण त्या चौकटीतून निघायची हिम्मत त्याच्यात नव्हती... हेच जरा चांगल्या भाषेत म्हणायचं तर  सगळे कामचोर, भ्रष्टाचारी, घूस खाऊ असले तरी त्याला तसं बनायचं नाही . त्याला त्याच्या सरळ आणि सच्या मार्गाने चालायचं होतं . 

तिची मात्र चिडचिड व्हायची. हा इतका हुशार असुन त्या हुशारीचा तो फायदा घेत नाही असं तिला सतत वाटायचं.  ती त्याच्या हुषारीच्याच तर प्रेमात पडली होती. आणि त्याच्या ह्या प्रिंसिपल्ड आयुष्याचा पण कंटाळ यायचा तिला .
बरं या प्रोजेक्ट्स मुळे त्याला खुप फिरावं लागायचं . म्हणजे तो फक्त शनिवार-रविवार घरी. तो घरी आला कि त्याला घरचं जेवण हवं असायचं. घरी आराम करायला आवडायचं आणि तिला अगदी त्याच्या उलट.

हे असच चालु होतं ..संथ गतीचा संसार . तिला मानसिक त्रास होत होता. एकलकोंडी झाली होती ती. बाहेरचं जग मात्र तिला नावं ठेवत होतं .... एवढं सगळं चांगलं असतांना हिला कसचा त्रास होतो कळत नव्हतं त्यांना. त्यातल्या त्यात बायका तर खूप नावं ठेवायच्या तिला... सुख बोचतंय तिला, इतका चांगला नवरा मिळालाय म्हणुन तिचा हा मानसिक त्रास सहन करतोय ..वगैरे वगैरे... तिला ते सगळं कळायचं आणि ती स्वतःला आणखीनच एकटेपणांत लोटून द्यायची .
परवा तिला कॅन्सर डिटेक्ट झाला . पहिलीच स्टेज ...नीरज तिला जास्त वेळ देऊ लागला. सुट्टी काढून कुठे तरी जाऊयात ८-१० दिवसांसाठी असं म्हणु लागला . ... ती मात्र खिन्न नजरेने त्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार देते.

मानसिक कॅन्सर तर तिला कधीच झाला होता . उपाय तेव्हाच करायला हवा होता. हो पण यात चूक कोणाची ते नाही कळत . या मॉडर्न जिवनात तिने तिचं बाहेर पडून मार्ग शोधायला पाहिजे, स्वतःची काळजी करायला पाहिजे असंही वाटत . तिला पूर्ण स्वातंत्र आहेच. पण तिने तिचं सगळं सुख दुःख नीरजशी जोडलंय. ...

आपलं सुखदुःख आपल्या साथीदाराशी जोडणारा हळुवारपणा जपावा की थोडं स्वार्थीच असावं... प्रश्न प्रत्येकाचा आणि उत्तर मात्र प्रत्येकाचं स्वतंत्र .

शाईत भिजलेले क्षण ...
 आपल्या माणसांना वेळ ध्या ,वेळ निघून जाण्या आधी , आई वडील बहीण भाऊ बायको मूल , नवरा हे सर्व पाहिले नंतर *फेसबुक , व्हाट्सअप्प करिअर
तुम्ही पैसे खूप कमावलं पण त्याचा उपभोग घ्यायला आपली माणसे नसणा

“ओव्हरअर्निंग..!”



[8:54 AM, 4/1/2018] O D. S. Powar Sir: ओव्हरअर्निंगचं व्यसन?

 “आपण सगळेच गरजेपेक्षा खूपच जास्त काम करतो आहोत असा मुद्दा गुगलचा सीईओ लॅरी पेज यानं एका भाषणात मांडला होता. पेजचं हे विधान अर्थातच हातावर पोट असलेल्या, घराचं भाडं भरण्यासाठी किंवा रोजचं दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी काम करणाऱ्या कामगारांना उद्देशून नव्हतं. पेजला अभिप्रेत होतं ते “ओव्हरअर्निंग..!” पुरेशा गोष्टी मिळवल्यानंतरही मौजमजेसाठी वेळ न काढता अक्षरश: अहोरात्र काम करुन पैसे मिळवणं या प्रवृत्तीला शिकागो विद्यापीठाच्या ख्रिस्तोफर हीस या प्राध्यापकानं “ओव्हरअर्निंग म्हणलं होतं.

ओव्हरअर्निंग म्हणजे काय ते समजावून सांगताना हीसनं एक मजेदार प्रयोग केला होता. या प्रयोगात विद्यार्थ्यांनी “समोरचं बटण दाबून सुरेल संगीत ऐकायचं किंवा गोंगाट ऐकायचा यापैकी एक पर्याय निवडायचा होता. पाच मिनिटांच्या पहिल्या टप्प्यात एखादा विद्यार्थी जितक्या वेळा गोंगाट ऐकणं पसंत करेल (उदा. २० वेळा) तितकी चॉकोलेटस् त्याला मिळणार होती. पण या टप्प्यात ती चॉकोलेटस खायला मात्र त्याला परवानगी नव्हती.

 याच प्रयोगाच्या दुसर््या  पाच मिनिटांच्या टप्प्यात गोंगाट ऐकून मिळालेली चॉकोलेटस खाणं सक्तीचं होतं. दुसर््या  टप्प्यात काही विद्यार्थ्यांनी शांतपणे संगीत ऐकायचा आनंद सोडून देऊन गोंगाट ऐकणं पसंत केलं. आपण साधारण ३ ते ४ चॉकोलेटस खाऊ शकू असं कबूल केलेलं असतानाही त्यांनी १० पेक्षा जास्त चॉकोलेटस मिळवली. ती खाण त्यांना शक्य झालं नाही. ते सगळे “ओव्हरअर्नर्स आहेत असं हीसनं जाहीर केलं.

ओव्हरअर्नर्समध्ये आपण खर्च करु शकणार नाही त्यापेक्षा खूप जास्त मिळवण्याची एक खोलवर दडलेली आकांक्षा असते. कामाच्या अतिरेकानं त्यांना ताण आला किंवा जगण्यातला आनंद संपला तरी त्यांना त्याची तमा नसते.

सॉयकॉलॉजिकल सायन्सच्या एका अंकात याबद्दल लेख प्रकाशित झाला होता. काम करताना आनंद वाटतो, भविष्याबद्दल अनिश्चितता वाटते आणि इतरांपेक्षा जास्त संपत्ती मिळवावीशी वाटते ही कारणं सांगून भरपूर पैसे साठल्यावरही खूप काम करणारी माणसं हा लेख वाचून प्रत्येकाला आठवणार आहेतच.

पण त्या यादीत आपलंच नाव पहिलं आहे का? हे तपासायला हवं..!

काही राहिलं तर नाही ना !!!*



काही राहिलं
तर नाही ना !!!*

🌀जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक *टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो...
"काही राहिलं तर नाही ना?”

🌀वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते
"पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?”
ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!

🌀खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला
"सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”
काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे

🌀लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते
दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”
भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात.
अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार

🌀६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला
"साहेब, काही राहिलं तर नाही ना?”
साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात आले कि पूर्ण आयुष्य या जागी काम करण्यात केले. सगळ्च इथे आहे मग “मागे काय राहणार

🌀स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो
मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”
तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.
त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील

🌀एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही.

एकुलती एक



अति लाड म्हणजे प्रेम का?

माझा  एक वकिलमित्र सांगत होता की, त्याच्यांकडे एक घटस्फोटाची केस आली. केस अशी होती की, नवीन लग्न झाले होते. नवरा पगार झाला की , बायकोच्या हाती द्यायचा. बायको पहिल्या चार-पाच दिवसातच सर्व पगार शॉंपिंगवर खर्च करुन मोकळी व्हायची. असे दर महिन्याला होत गेले. त्यामुळे नवर्‍याचे आर्थिक गणित चुकले. तो तीला म्हणाला की, ‘‘पैसे जपुन खर्च करत जा!".
बस त्यावरुन भांडण करुन बायको माहेरी गेली. तिच्या आईने जावायांना बोलावून सांगितली की, ‘‘तिची हौस-मौज करा, पैसे कमी पडले तर माझ्या कडून घ्या!’’ हे सासूबाईंचे वाक्य ऐकून मुलगा तडक उठला आणि त्याने घटस्फोटाची मागणी केली. पुढे त्यांचा घटस्फोट पण झाला. आता यात नक्की काय घडले?.. नक्की चुक कोणाची होती?.. मुलगा अत्यंत स्वाभिमानी होता. त्याने त्याचे करीयर स्वत:च्या हिमंतीवर बनवले होते. तर मुलगी अत्यंत लाडात वाढलेली होती. पुढे समुपदेशनात लक्षात आले की, मुलगी एकुलती एक..
 लहानपणी ही मुलगी ज्या दुकानाच्या बाहेर उभी राहील त्या दुकानातल्या वस्तू गरज नसतांना पालक विकत घेत असायचे. ‘‘काय हवे माझ्या शोनुलिला?.. बार्बी गर्ल?’’ ओके..! लगेच तिला ती बाहुली मिळत गेली. तोंडामधुन एखादी मागणी आली की लगेच हट्ट म्हणून ती पुरवली जायाची.. या पध्दतीने ती लहानाची मोठी झाली. आणि लग्नझाल्यावर वर्षभराच्या आत माहेरी आली.
 पालकांनो लहान मुलांचे मानसिक स्वास्थ आणि भावनिक स्वास्थ हे तुम्ही त्याच्यांशी लहानपणी कसे वागतात त्यावर अवलंबुन असते. पालक मुलांचे लाड करणच्या नादात कुठे थांबायचे हे सुध्दा विसरतात.
 ‘‘मागीतले की मिळतं’’ ही सवय जर मुलांना लागली की, पुढे हे जड जाते. अशा मुलांना वाईट सवयी लवकर लागतात आणि तर मुली लवकर बिघडतात. नकाराची सवय राहिली नाही तर मोठ्यापणी साधा प्रेमभंग सुध्दा पचवता येत नाही,  ना ऑफिसमध्ये वरिष्ठांशी जुळवून घेता येते. याचे कारण पालक मुलांमुलीचे प्रत्येक प्रश्‍न स्वत: सोडवण्याच्या भानगडीत पडतात. कॉलनीत मुला-मुलांचे भांडण झाले तर आई लगेच शेजारच्यांशी भांडायला जाते. शाळेत थोडं टिचर रागावली की बाबा लगेच मुख्याध्यापकांना भेटतात. मुलाला एका डान्समधुन काढून दुसर्‍या डान्समध्ये अथवा दुसर्‍या परफॉर्मन्स मध्ये टाकले की लगेच टिचर्सला फोन करुन जवाब विचारतात.. या सर्वामधुन मुलांना आयती उत्तरे मिळतात. नकार पचवून घ्यायची सवय लागत नाही.
 पालक जेव्हा गरज नसतांना पाल्याचा हट्ट पुरवतात. पैसे नसतांना सुध्दा मुलांचे फाजील लाड पूर्ण करतात आणि त्याला गोंडस शब्दांची झालर देतात आणि ती झालर म्हणजे ‘‘आमचे लहानपणी असे लाड झाले नाही, मला जे मिळाले नाही ते मी माझ्या मुलां-मुलीला देईल’’ आणि या कृतीलाच पालक प्रेम करणे असे म्हणतात.
 खरं तर प्रेम आणि काळजी यांचा समतोल साधायचा असतो, कारण दोघं जास्त झाले की, वाढ खुटण्याची भीती असते. मागणी आणि पुरवढा यांचा योग्य समतोल पालक आणि पाल्यामध्ये होणे गरजेचे असते.
 आपण मुलांशी लहानपणी कसे वागतो त्यावर भविष्यातील त्यांची वर्तवणुक ठरत असते. म्हणून मागीतले ते मिळते ही सवय मुलांना लावु नका. मोठ्या माणसांनी, शिक्षकांनी किंवा क्लास टीचर ने त्याच्या भल्यासाठी काही ऍक्शन घेतली असेल तर त्यावेळेस टिचर्सला सहकार्य करा. कारण शेवटी मुलं  मोठ्यापणी सर्वांनमध्ये मिळून मिसळून राहणं, उत्तम संवाद साधणे हे महत्वाच असते आणि याला अडथळा असतो अति लाड! अति प्रेम!! शिस्त ही प्रेमाची पहिलि कृति आहे.

मृदगंध.


मृदगंध.

काल दुपारी दारावर एक माठ विकत घेतला,
जुना माठ किंवा डेरा पाणी थंड करत नव्हता....सो हा घेतला,
नवीन माठ घेतल्यावर त्यात पाणी भरून दोन दिवस भिजवत ठेवायचा व मगच नंतर तो वापरायला घ्यायचा असा आमच्या आईचा शिरस्ता होता,त्याप्रमाणे मी ह्यात पाणी भरून एक बाजूला ठेऊन दिला,
तर कालपासून ह्यातून एक अप्रतिम असा मातीचा सुगंध अकख्या घरभर पसरलाय,तो गंध इतका छान आणि हवाहवासा वाटला की भाच्याला व मुलीला मी म्हणालो, की आजकाल जग इतकं अडवांस झालंय की कोणतीही गोष्ट आपण स्टोअर करून ठेवू शकतो, किंवा रेकॉर्ड करून ठेवतो जसं की आवाज,गाणी,फोटो....व्हीडिओ, इ ई.
पण सुगंध किंवा गंध मात्र आपण साचवून ठेऊ शकत नाही अथवा आवडलेला सुवास एखाद्या डबीत बंद करून ठेऊ शकत नाही,त्यामुळेच तो हवाहवासा वाटतोय,
मनात विचार केला वेगवेगळ्या नात्यांचं पण असंच असतंय त्यांना आपण बंदिस्त करायचा प्रयत्न केला तर त्यातील गोडवा किंवा हवाहवासा भाव शिल्लक राहतच नाही....!
त्यांना मोकळं सोडलं तरच भावनिक पातळीवर एकमेकांचा सहवास हवासा वाटतो,
 पत्नी,मित्र,मैत्रिणी,भाऊ,बहीण अशा सगळ्या नात्यांमध्ये जर गोडवा टिकवायचा असेल तर ती नाती बांधून स्टोअर करायचीच नाहीत,त्यांचा आहे तोवर छान सहवास ठेवायचा,तो गंध कधी उडून जाईल काय माहीत??
बंधनं न टाकता त्या नात्यातून येणारा छान सुगंध आयुष्यातल्या उन्हाळ्यातली रखरखीत दुपार सुगंधित गार व संस्मरणीय केल्यावाचून राहणार नाही.

गैरसमज...



गैरसमज...

स्वामी विवेकानंदांनी गैरसमज कसा निर्माण होतो हे एका कथेतून स्पष्ट केले आहे...

एका जंगलात राम-सावित्री नावाच एक जोडपं राहत असत,राम हा जंगलात जाऊन लाकूडे तोडायचा आणि ती जवळच्या शहरात जाऊन विकायचा...
काही दिवसांनी त्यांच्या घरात एक सुंदर बाळ जन्माला येत.
एक दिवस त्याला जंगलात एक निरागस आणि घाबरले मुंगूसाच पिल्लू दिसत जवळच कोणत्यातरी जंगली श्वापदाच्या हल्ल्यात त्याची आई मरून पडली होती.
राम त्या पिल्लाला घरी आणतो.
थोड्या दिवसांतच ते पिल्लू त्या घरात एखाद्या सदस्यां प्रमाणे रूळते...
एक दिवस राम नेहमीप्रमाणे जंगलात आपल्या कामासाठी न्याहारी करतो आणि  निघून जातो...
नंतर थोड्या वेळाने आपल्या बाळाला झोपवून  सावित्री  पाणी आणण्यासाठी निघून जाते.
घरात फक्त बाळ आणि ते माणसाळलेल मुंगूस...
काही वेळातच त्या घरात एक भला मोठा साप शिरला आणि तो त्या बाळाकडे चाल करू लागला...
मुंगूसाने चपळाईने सापावर झडप मारली आणि सुरु झाली लढाई...
साप पण बलाढ्य होता पण मुंगूसाने त्याच्यावर मात केली मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर सापाच्या रक्ताने माखले होते...

आता मुंगूस दारात उभे राहून सावित्रीची वाट बघत होते...

तेवढ्यात सावित्री डोक्यावर हंडा घेऊन आली आणि बघते तर काय...???

मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर रक्ताने माखले होते

सावित्रीच्या डोक्यात एकच विचारांच वादळ ऊटल की तीच्या बाळाचे लचके त्या मुंगूसाने तोडले आणि त्याला मारुन टाकले...

पण मुंगूस मात्र सावित्रीकडे खूप निरागसपणे बघत होते

मात्र त्याचवेळी सावित्रीने बाळाच्या नावाने एकच टाहो फोडला...
आणि

क्षणार्धात डोक्यावरील हांडा तीने त्या मुंगूसाच्या अंगावर फेकला

आणि....
घरात पळत सुटली पण घरात जाताच तीला चित्र वेगळंच दिसलं तीच बाळ अजूनही झोपलच होत.
आणि

शेजारीच तो भयानक साप रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला...

सावित्री भानावर आली आणि सर्व प्रकार तिच्या लक्षात आला तशी ती चपळाईने उठली आणि बाहेर आली पण मुंगूस बिचारे जागेवर  ठार झाले होते..

सावित्रीने पुन्हा एकदा टाहो फोडला पण यावेळी तीचे दोन्ही हात जोडलेले होते......

स्वामी विवेकानंद सांगतात जे दिसतय ते बघा...
पण त्याचाआधी जे दिसत नाही ते शोधायचा प्रयत्न करा,कारण प्रश्न हा जीवलग माणूस गमवण्याचा आहे...
कारण...
गैरसमज हे जवळच्या माणसाबद्दल होतो, आणि...तो गैरसमज वेळ निघून गेल्यावरच दुर हाेताे...!!

🎭 जबाबदारीची जाणीव असणारा कधीच हात वर करू शकत नाही!
आणि हात वर करणारा कधीच जबाबदारी सांभाळू शकत नाही....!
💐 💐
"तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे,,
जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे,,
करा तुम्ही चांगले कर्म 
सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे,,
रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात,,
हसल्याने परके सुध्दा आपले होतात,,
मला ती नाती आवडतात ज्यात
मी नाही तर आपण असतो.

अनुभवलेला धर्म.


मी अनुभवलेला धर्म....( सर्वांनी वाचा)....
      मी गेल्या वर्षी गडकोट मोहिमेसाठी गेलो होतो. जाताना धर्माच्या घोषणा देत, जयजयकार करत गेलो होतो. मनात आपल्याच धर्माचा उन्माद टचटचून भरला होता. बरोबर मित्र  होतेच.

      पुण्याजवळ रात्री मुक्काम होता. आम्ही उघड्यावरच झोपलो होतो. काही मित्रांना थंडी सोसवत नव्हती. ते एका इमारतीच्या आडोश्याला झोपण्यासाठी गेले, पण त्या इमारतीतल्या सुशिक्षित व स्वधर्मीय लोकांनी त्यांना हाकलून लावले.

      दुसऱ्या दिवशी परत आमची पायपीट सूरू झाली. दुसरा मुक्काम सिंहगड व रायगडाच्या मध्ये असणाऱ्या एका जंगलात पडला. आदिवासी पाड्यात आम्ही थांबलो होतो.

      एका आदिवासी बांधवाने चक्क आम्हाला झोपडीत जागा दिली. झोपडी छोटीशीच, पण त्याचे मन आभाळसारखे वाटले. त्याच्या त्या झोपडीसमोर कालचा बंगला खूपच खुजा वाटत होता. चालूनचालून थकलो होतो.सकाळपासून चालत होतो. तहान खूप लागली होती, जवळ पाणी नव्हते. त्या बांधवाकडे पाणी मागितले, पण पाणी थोडे अन् आम्ही २५ जण ! शेवटी त्या सदगृहस्थाने आमच्यासाठी रात्रीचे पाणी आणून दिले. पाणी दरीतून आणावे लागत होते, त्यात मटका छोटाच पण तरीही तो माणूस हेलपाटे मारत होता.
      अखेर मी त्या भल्या गृहस्थास म्हटले, "मामा राहू द्या, नका त्रास घेऊ." यावर तो आदिवासी म्हणाला, "बाळा माझ्या दारात तू परत कशाला येशील? माझा तेवढाच धर्म."

तो जे बोलला ते अविश्वसनीय होते. त्याच्या त्या वाक्याने माझ्या डोक्यातला धर्माचा माज, उन्माद झटक्यात उतरला. रात्रभर झोप लागली नाही. मन स्वत:ला प्रश्न विचारत होते, अस्वस्थ होतो. हा आदिवासी म्हणतो तो धर्म कोणता? आम्ही ज्याच्या घोषणा देतोय तो कोणता ? काल बंगल्याच्या आडोश्याला झोपल्यावर तेथून निर्दयीपणे हाकलून देणाऱ्याचा धर्म कोणता?
   
      मन प्रश्नांनी भरून गेले होते. नक्की खरा धर्म कोणता ? आम्ही ज्याचा जयजयकार करत होतो तो की आदिवासी म्हणतो तो?

      जशी रात्र उतरत होती, तसा मनातला धर्माचा माज उतरत होता. मन शांत होत होते. त्या दिवशी खरा धर्म गवसला होता.                                  हातातली पोळी कुत्र्याने पळवल्यावर त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळणारे संत नामदेव अन् तो आदिवासी, दोघे सारखेेच वाटत होतेकुत्र्यात देव शोधणारे नामदेव अन् माणसात धर्म शोधणारा तो आदिवासी सारखेच भासत होते. ठार अडाणी असणारा आदिवासी धर्म जगत होता. आम्ही केवळ घोषणा देत होतो. आमचे मस्तक दुसऱ्या धर्माविषयी तिरस्काराने भरले होते. मस्तकातला धार्मिक उन्माद दुसऱ्या धर्माच्या माणसाला माणूस मानायला तयार नसून ते शत्रू वाटत होते, पण *त्या माणसाने डोळ्यावरील झापडं काढली.
       त्याने धर्म शिकवला. धर्म अनुभवला. एका आदिवासी माणसाला जे कळते ते आम्हाला कळत नाही. स्वत:लाच स्वत:ची लाज वाटली. तो माणूस आजही तसाच डोळ्यासमोर दिसतो. दगडू कचरे त्याचे नाव.

      तिथून निघताना त्याच्या पायाला स्पर्श केला. खूप
काहीतरी गवसल्याचा आनंद मनात दाटला होता.

      हिंदू , मुस्लिम , शिख , ख्रिश्चन ही केवळ लेबलं आहेत.....
 माणसाला माणसाचे शत्रू बनवणारा,परस्पराचा जीवावर उठणारा कोणताही धर्म धर्म असू शकतो काय?....
      *लक्ष्यात ठेवा सर्वांनी क "जात - पात , धर्म - पंथ , गोञ हे सर्व विसरून माणसात रहा माणुसकीला जपा....
.............................एक सामान्य माणूस 

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा