प्रश्न एक उत्तर अनेक ...
तो अति हुशार आणि ती जरा साधी.....नीटनेटका संसार करणारी. दिसायला
सुंदर नसली तरी चार चौघींमध्ये उठून दिसणारी.
संसार संथ गतीने चालला होता.... म्हणजे तो हुशार असुन हुशारीचा
खूप फायदा न घेतलेला आणि अगदी प्रिंसिपलच्या चौकटीत जगणारा . इतकं की कंपनी कडुन दर
वर्षी मिळणाऱ्या व्हॅकेशन -पॅक पण नं वापरणारा. तिने दर वर्षी म्हणावं की ह्या वर्षी
जाउयातना कुठे आणि त्याने नेहमीप्रमाणे उत्तर द्यावं "अगं मी ज्याचे पैसे घेतो
ते काम पूर्ण झालं नाही तर कंपनी जे फुकटात देते ते कसं घेणार . वेळेत पूर्ण झालं काम
तर नक्की जाऊ" . आणि वेळेत काम संपण्याचा कधी प्रश्नच नव्हता कारण एक प्रोजेक्ट
संपला कि दुसरा सुरु व्हायचा. बरं, इतकं काम करून कधी प्रोमोशन किंवा पगार वाढ वगैरे
कामा प्रमाणे नाहीच ...ते कंपनीच्या नियमानुसारच होणार. अर्थात हे फक्त त्याच्या पुरतं
. कारण तो कधी बॉसशी या बाबतीत बोलणार नाही . स्वतःहून या विषयी बोलायला अपमानास्पद
वाटायचं. एकंदरीत काय तर नीरज आपल्या चौकटीत आयुष्य जगत होता. तो स्वतः खुश असेल तर
ते पण ठीक होतं पण त्याला कळायचं की तो त्याच्याच बनवलेल्या आयुष्याच्या प्रिंसिपल्सने
मागे पडलाय आणि मागेच राहाणार . पण त्या चौकटीतून निघायची हिम्मत त्याच्यात नव्हती...
हेच जरा चांगल्या भाषेत म्हणायचं तर सगळे कामचोर,
भ्रष्टाचारी, घूस खाऊ असले तरी त्याला तसं बनायचं नाही . त्याला त्याच्या सरळ आणि सच्या
मार्गाने चालायचं होतं .
तिची मात्र चिडचिड व्हायची. हा इतका हुशार असुन त्या हुशारीचा
तो फायदा घेत नाही असं तिला सतत वाटायचं. ती
त्याच्या हुषारीच्याच तर प्रेमात पडली होती. आणि त्याच्या ह्या प्रिंसिपल्ड आयुष्याचा
पण कंटाळ यायचा तिला .
बरं या प्रोजेक्ट्स मुळे त्याला खुप फिरावं लागायचं . म्हणजे
तो फक्त शनिवार-रविवार घरी. तो घरी आला कि त्याला घरचं जेवण हवं असायचं. घरी आराम करायला
आवडायचं आणि तिला अगदी त्याच्या उलट.
हे असच चालु होतं ..संथ गतीचा संसार . तिला मानसिक त्रास होत
होता. एकलकोंडी झाली होती ती. बाहेरचं जग मात्र तिला नावं ठेवत होतं .... एवढं सगळं
चांगलं असतांना हिला कसचा त्रास होतो कळत नव्हतं त्यांना. त्यातल्या त्यात बायका तर
खूप नावं ठेवायच्या तिला... सुख बोचतंय तिला, इतका चांगला नवरा मिळालाय म्हणुन तिचा
हा मानसिक त्रास सहन करतोय ..वगैरे वगैरे... तिला ते सगळं कळायचं आणि ती स्वतःला आणखीनच
एकटेपणांत लोटून द्यायची .
परवा तिला कॅन्सर डिटेक्ट झाला . पहिलीच स्टेज ...नीरज तिला जास्त
वेळ देऊ लागला. सुट्टी काढून कुठे तरी जाऊयात ८-१० दिवसांसाठी असं म्हणु लागला .
... ती मात्र खिन्न नजरेने त्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार देते.
मानसिक कॅन्सर तर तिला कधीच झाला होता . उपाय तेव्हाच करायला
हवा होता. हो पण यात चूक कोणाची ते नाही कळत . या मॉडर्न जिवनात तिने तिचं बाहेर पडून
मार्ग शोधायला पाहिजे, स्वतःची काळजी करायला पाहिजे असंही वाटत . तिला पूर्ण स्वातंत्र
आहेच. पण तिने तिचं सगळं सुख दुःख नीरजशी जोडलंय. ...
आपलं सुखदुःख आपल्या साथीदाराशी जोडणारा हळुवारपणा जपावा की थोडं
स्वार्थीच असावं... प्रश्न प्रत्येकाचा आणि उत्तर मात्र प्रत्येकाचं स्वतंत्र .
शाईत भिजलेले क्षण ...
आपल्या माणसांना वेळ
ध्या ,वेळ निघून जाण्या आधी , आई वडील बहीण भाऊ बायको मूल , नवरा हे सर्व पाहिले नंतर
*फेसबुक , व्हाट्सअप्प करिअर
तुम्ही पैसे खूप कमावलं पण त्याचा उपभोग घ्यायला आपली माणसे नसणा