Pages

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

'वाट'


'वाट' 


जगातील तीन प्रकारची माणसं...
१. 'वाट' बघणारे
२. 'वाट' लावणारे
३. 'वाट' शोधणारे

शब्द तोच आहे ... पण त्याच्या उपयोग जो तो आपल्या हिशोबाने करतो...

काही लोक, 'जे होत ते चांगल्या साठीच होत' असं म्हणत काहीतरी होण्याची 'वाट' बघत बसतात... पण त्याला जर कृतीची साथ नसेल तर मग त्यांची 'वाट लागते'...

'वाट' लावणाऱ्या बद्दल तर बोलायलाच नको... हे लोक पूर्ण वेळ स्वतः खाली राहून दुसऱ्याला सुद्धा खाली ओढण्यात मग्न असतात...त्यांच्या आनंदाची परिसीमा तेवढीच...

त्यातला तिसरा वर्ग महत्वाचा... 'वाट शोधनार्यांचा' ... कितीही संकटं, कितीही अडथळे आले तरी जिद्दीने नवीन वाट शोधणारे मग पुढे निघून जातात...

आपण कुठली 'वाट' निवडायची ते आपणच ठरवायचं..
इच्छा असली तर मार्ग सापडतोच !!!


विचार


विचार 


पैशाने पुर्ण झालेली स्वप्न,
          मरेपर्यत टिकतात..
      कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न,
          इतिहास घडवतात..
       
 घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे ....
 ""परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे ""....                                       

कुणाच्या नशिबाला हसू नये
               नशिब कुणी विकत घेत नाही
      
वेळेचे नेहमी भान ठेवावे..
           वाईट वेळ सांगून येत नाही.!

बुद्धी कितीही तल्लख असली तरी
          नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
 
 बिरबल बुद्धीवान होता तरीही तो          
             राजा होऊ शकला नाही.!

     समाधान ही अंत:करनाची सर्वात सुंदर संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.

"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल
हसण्यामगील दुःख
रागवण्या मागील प्रेम
*आणि शांत रहाण्यामागील कारण."

कपडे नाही
माणसाचे विचार
Branded पाहिजे...!

चुकीच्या बाजूला उभा राहण्यापेक्षा
एकटं उभं रहाणं केव्हाही चांगलं.


स्वयंपाक घर, घराचा आत्मा


स्वयंपाक घर, घराचा आत्मा

*******
'स्वयंपाक घर' हा घराचा आत्मा असतो. स्वयंपाक घर म्हणजे पवित्र महायज्ञाची तयारी जिथे केली जाते ती जागा. कारण उदरभरण म्हणजे ते नुसते पोट भरणे नसते तर ते एक यज्ञकर्म करणे समजले जाते व अशा उदरभरणाची सोय जिथे केली जाते ती जागा म्हणजे यजाची पवित्र जागा, स्वयंपाक घर होय! व या ठिकाणी सर्व काम पवित्र रीतीनेच केले पाहीजे. तसेच चौसष्ट कला पैकी पाककला एक उच्च दर्जाची कला समजली जाते. चविष्ट व पौष्टीक पदार्थ करणे ही एक पाक कला आहे व स्वयंपाक घर एक कला दालन आहे . तर अशा कला दालनामधे वावरताना प्रत्येकाने पाळावित अशी कांही पत्थे व करण्यायोग्य सोप्या गोष्टी.
स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ असावे. नियमित साफ-सफाई झाली पाहीजे.
स्वयंपाक घरात प्रवेश करण्याआधी शुचिर्भुत होऊन, सुती व काम करण्यास सोईचे स्वच्छ कपडे परिधान करावेत.
केस व्यवस्थित एकत्र वर बांधलेले असावेत.
नेहमी आधी साबणाने हात स्वच्छ धुवूनच मग कामाला सुरवात करावी.
स्वयंपाकात लागणारे डाळी, तांदुळ, कडधान्ये नेहमी साफ करून ठेवावीत. पीठं चाळून ठेवावीत. शेंगदाणे भाजून कुटून ठेवावेत. रवा भाजून ठेवावा. पोहे चाळून ठेवावेत.
स्वयंपाकात लागणारे मसाले तीन किंवा सहा महिन्याचेच करावेत. अशाने त्यांचे स्वाद कमी होत नाहीत. पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो.
आधीचे पदार्थ आधी वापरावेत. ते जास्त जूने होऊ देऊ नयेत.
गवार, घेवडा, मटार सारख्या भाज्या आधीच निवडून, मोडून फ्रीजमधे ठेवाव्यात. पालेभाज्या, कोथिंबीर निवडून ठेवावे. आलं-लसूण पेस्ट तयार करून ठेवावी. ऐनवेळी घाई गडबड होत नाही.
भाज्या चिरण्याआधी धुवून घ्याव्यात. चिरल्यावर नाही.
जो पदार्थ करणार आहोत त्याची आधी पुर्वतयारी करून घ्यावी. नंतरच गँस पेटवून सुरवात करावी. म्हणजे त्या पदार्थाला आवश्यक एखादा पदार्थ नसेल तर पर्यायी सोय करता येते व पदार्थ नीट बनतो. तसेच गँसचीपण बचत होते.
तयार अन्नपदार्थ नेहमी व्यवस्थित झाकून ठेवावेत.
आपल्या गरजे इतकेच अन्न पदार्थ तयार करावेत. आजच्या काळात ऐनवेळी कोणीही कोणाकडे जात-येत नाही.
शक्यतो शिळे अन्न शिल्लक राहूच नये परंतु कांही कारणाने कधी शिल्लक राहीलेच तर लवकरात लवकर त्याचा कांही नविन पदार्थ करून घरातल्या सर्वानी वाटून खाऊन संपवावा. वाया घालवू नये.
कुठे वाचलेला, खाल्लेला अथवा आवडलेला एखादा नवीन पदार्थ करून पहायचा असेल तर, आधी त्याचा पुर्ण अभ्यास करावा. लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे याची एकदा खात्री करावी. एखादी वस्तू नसेल तर आधीच आणवून घ्यावी व नंतरच शांतचित्ताने प्रयोगाला सुरवात करावी. म्हणजे पदार्थ सहसा फसत नाही.
नवीन पदार्थ करताना सुरवातीला अगदी कमीत-कमी प्रमाणात साहित्य घेऊन लहान प्रमाणात पदार्थ बनवावा. चुकून बिघडलाच तर फार वाया जात नाही. आवडला तर आणखी बनवता येते.
स्वयंपाक घरात नेहमी एखादे पेन व कागद छोट्या पँडला लावून लटकवून ठेवावे. एखादा पदार्थ संपला तर लगेच लिहून ठेवावे. म्हणजे बाजारातून सामान आणताना सर्व वस्तू न विसरता घरी येतात व ऐनवेळची धावपळ वाचते.
स्वयंपाक घर आपल्या कुवतीनुसार सर्व आवश्यक त्या जुन्या व अत्याधुनिक साधनानी म्हणजे भांडी, चमचे, पँन, कढई, तवे, मिक्सर, ब्लेडर इत्यादि.. नी सुसज्ज ठेवावे व पदार्थ तयार करताना योग्यवेळी योग्य ती साधने आळस न करता वापरावित. पदार्थ अधिक रूचकर व लवकर होतो. उदा. शेंगदाण्याची लसूण घातलेली चटणी जुन्या पध्दतिने बिडाच्या खलबत्त्यात कुटली तर अधिक रूचकर लागते.. तेच धण्या -जिर्याची पावडर मिक्सरमधे चांगली बारीक होते.
सर्वात शेवटी महत्वाचे, स्वयंपाक करताना आनंदी वृत्तीने, हास्यमुखाने, मनापासून करावा. पदार्थ अधिक चवदार व चांगला होतो. आदळाआपट करत चिडचिड्या वृत्तीने कधीच करू नये. हा अन्न देवतेचा अपमान असतो. व असे अन्न घरातल्या खाणार्याच्या कधीच अंगी लागत नाही व समाधानही मिळत नाही. बरकत रहात नाही.
एकूणच फक्त पदार्थ करता येणे म्हणजे 'सुगरण' नव्हे तर त्या जोडीला स्वच्छता, नियोजन, बचत, शास्त्र अशा सर्व कला तिला अवगत असाव्यात तरच अशा सुगरणीला अन्नपुर्णा देविचा वरदहस्त लाभतो.
आपण जे काम करतो ते मनापासून व आनंदाने करावे. पुर्ण क्षमतेने करावे. स्वतालाही आनंद मिळतो व समोरच्यालाही मिळतो.

चाक....


चाक....


प्रिया आणि समरच्या लग्नाला आता जवळजवळ तीन वर्ष होत आली होती. Love Marriage च्या जमान्यात त्यांच Arranged Marriage होत. सुरवातीला सगळं सुरळीत चालू होत पण नंतर काही ना काही कारणामुळे खटके उडू लागले. प्रिया बँक मध्ये कामाला होती तर समर एका परदेशी कंपनीत. घरात सगळ्या सुख-सोई होत्या. नव्हता तो फक्त एकमेकांसाठीचा वेळ आणि एकमेकांना समजून घेण्याची समज. भांडणाच कारण कधी गादीवर पडलेला ओला टॉवेल तर कधी किचनमध्ये सुरु राहिलेला पंखा. आजकाल तर काहीही शुल्लक कारण पुरेस होतं होत.
आज सकाळीहि खिडकीवर विसरलेला कालचा चहाचा कप वादळ उठवून गेला. दोघे एकमेकांशी तावातावने खूप भांडले नी काही न खाता उपाशी ऑफिसला निघून गेले. आज नवीन महिन्याचा पहिला आठवडा त्यामुळे ऑफिसमध्ये काम भरपूर असणार ऐखाद वेळेस लंचसाठी देखील वेळ मिळणार नाही हे प्रियाला माहित होत पण तरी देखील ती तशीच निघून आली.
आज ४ तारीख, म्हणजे दर महिन्याप्रमाणे आज पाटील आजी आजोबा पेंन्शन साठी बँकमध्ये येणार. पाटील आजी आजोबा संपूर्ण बँकमध्ये कौतुकाचा विषय होता. दोघे जोडीने नेहमी येत, कडक इस्त्री केलेली कॉटनची साडी आणि तसाच कडक इस्त्रीचा कॉटनचा शर्ट. दोघे सत्तरीच्या घरात होते, पण एकमेकांना खूप सांभाळत होते. दरवेळी येताना बरोबर शबनम बॅग त्यात पाण्याची बाटली, छत्री, बिस्कीटचा पुडा आणि दोघांची डॉक्टरची फाईल न चुकता असे. त्यांच्याकडे बघून प्रिया नेहमी विचार करत असे कि आपल्या नशिबात हे सुख का नाही. नेहमीप्रमाणे आजोबांनी स्वतःचा फॉर्म भरला नी कॉउंटर वर दिला आणि आजीकडे तिचा फॉर्म घ्यायला वळले आणि नेहमी प्रमाणे आजी रिकामा फॉर्म घेउन तशीच उभी होती. "अगं काय हे, एक साधा फॉर्म भरता येत नाही तुला? आणखी किती वर्ष माझ्याकडून भरून घेणार आहेस, आज शेवटचा भरतो आहे, पुढच्यावेळी तूच भर" "असू द्या ओ तुम्ही आहात ना, मग मी कशाला चिंता करू?" आजीचं गोड हसून उत्तर, थोड्याफार प्रमाणात हा संवाद दर महिन्याचा होता. आज कॉउंटरवर प्रिया होती, प्रियाच्या हातात फॉर्म देत "बावळट आहेस" आजोबा पुटपुटले आणि आजी लाजली. "इथेच थांब, मी मॅनेजरला भेटून येतो, जाउ नकोस कुठे, हरवशील, वेंधळी आहेस तू" म्हणत आजोबा केबिन कडे गेले. "आजी, अहो इतके बोलतात आजोबा तर शिकून घ्या ना फॉर्म भरायला, त्यात काहीच कठीण नाहीे" प्रिया वेळ काढण्यासाठी बोलली. आजी हसली " अग मला येतो भरता फॉर्म, पण मला तो येत नाही म्हणून ह्यांची होणारी ती प्रेमळ चिडचिड मला आवडते" "मी एकटी सगळं करू शकते, पण मी ते करू शकत नाही म्हणून हे जे जबाबदरीने करतात ते मला आवडत" "ह्या वयात आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो आणि मग ते स्वतःची काळजी घेतात मला ते हवं आहे" "संसारात दोघांनाहि दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लाउन गाडी ओढायची असते" आजी गोड हसली. कॅबिन मधून आजोबा बाहेर आले नी आजी त्यांच्या पाठीमागे चालू लागली.
दाराशी येत इथेच थांब मी रिक्षा घेउन येतो म्हणून आजोबा निघाले नी आजी ने त्यांना मागून हाक मारून छत्री हातात दिली. सगळा प्रसंग गोड होता, "किती प्रेम आहे ना आजींचा आजोबांवर" बाजूला बसलेल्या सरिताला प्रिया म्हणाली"अग दोघाचं बोल, आजीला उन्हाचा त्रास होतो म्हणून पाटील आजोबा तिला इथेच थांबवून चालत जाऊन रिक्षा आणतात, नेहमी बॅगमध्ये कोकम सरबताची बाटली घेउन फिरतात, खूप काळजी घेतात ते एकमेकांची"
प्रियाला सकाळी घडलेला प्रसंग आठवला. समरने काल लवकर आला तेव्हा दोघासाठी चहा करून ठेवला होता आणि हे तो जेव्हा-जेव्हा लवकर यायचा तेव्हा-तेव्हा करत होता. आज समरशी शांतपणे बोलायचं प्रियाने ठरवलं. तिने समरला फोन लावला " काही खाल्लस का?" "नाही गं आज एक महत्वाची मिटिंग आहे, तू काही खाल्लस का? "नाही, चल कामं होत राहतील काहीतरी खाऊन घे, उपाशी काम करत बसू नकोस, मी हि ब्रेक घेते" संद्याकाळी जेवायला बाहेर जायचं ठरवून प्रियाने फोन ठेवला.
हळूहळू का होईना दोघांमध्ये वादाच्या जागी संवाद होऊ लागला, खटके उडत होते पण पूर्वीसारखं वातावरण नव्हतं.
ह्यात तीन-चार महिने गेले आणि आज पुन्हा सकाळी बेडवर ओलो टॉवेल बघून प्रियाचा पारा चढला. समरने सॉरी म्हणून टॉवेल उचलला पण तोपर्यँत प्रिया खूप चिडली होती "नोकर नाही आहे मी इथे, नाही जमणार मला सारखं ऍडजस्ट करायला, इतका आळशी स्वभाव बरा नाही." रागारागात प्रियाने तयारी केली नी ती ऑफसला निघून गेली. कॉउंटर वर ती बसली होती आणि तिला दारातून पाटील आजोबा आत येतांना दिसले आज ते एकटेच होते आणि पेंन्शनचा दिवसहि नव्हता काहीतरी वेगळं काम असेल म्हणून प्रिया पुन्हा आपल्या कामात गुंगली. शिपायाने, साहेबांनी आत बोलावलं आहे हा तिला निरोप दिला. आत पाटील आजोबा बसले होते, "प्रिया पाटील आपल्या बँकचे सगळ्यांत जुने कस्टमर आहेत, त्यांना आज पर्सनली मदत कर, मी दुसऱ्या ब्रँच मध्ये चाललो आहे त्यामुळे you can sit here and help him with all the formalities" नायर साहेब निघून गेले.
" बोला आजोबा काय करायच आहे" "मला सावित्रीच अकाऊंट क्लोज करायच आहे, गेल्या आठवड्यात ती हार्टअटॅक नी घरी बसल्या जागी गेली" कोणीतरी जोरात ओरडल्यावर जसं कान सुन्न होतात प्रियाच तसं झालं "I am sorry" च्या वतिरिक्त ती काहीच बोलू शकली नाही. आजोबा बोलत होते " खूप काळजी घ्याची माझी ती, सगळं वेळच्या वेळी, मी सुरुवाती पासून वेंधळा, पण ती प्रत्येक वेळी माझ्या चुका लपवायची माझ्या पाठीशी कायम उभी राहिली, तिला बहुतेक ती जाणार हे कळलं होत, आज पर्यंत तिला कित्येक वेळा मी जेवण करण्यासाठी बाई ठेवू सुचवलं होत पण तिने कधीच ऐकलं नाही, पण एक १५ दिवसापूर्वी तिने जेवणासाठी बाई ठेवली तिला मला लागत तसं जेवण शिकवलं, मी तिला चिडवलं देखील कि पाटलिणबाई आता बसल्याजागी ऑर्डर देणार" आजोबानी डोळ्याला रुमाल लावला, प्रियालाहि रडू आवरलं नाही, formalities पूर्ण करून आजोबा निघून गेले. प्रियाच लक्ष फोनकडे गेल, समरचा मेसेज स्क्रीनवर डिस्प्ले होत होता "सॉरी प्रिया मी आज पुन्हा टॉवेल विसरलो, I will try not to do it again, पण यार तू त्यामुळे काही न खाता ऑफिस ला जाऊ नकोस, I feel guilty, please don't do that again. I have been pampered, spoiled brat till date and I m trying to change that, please give me time to change myself, I promise I will change, I never have said this before but I always want you in my life, No one can understand my mood the way you do, Please" काहीवेळ प्रिया  फोन कडे बघत राहिली आणि तिला पाटील आजीच वाक्य आठवलं "आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो." "संसारात दोघांनाहि दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लाउन गाडी ओढायची असते"
"sorry, I too loose my control every now and then, I will also try to work on it, you too please give me time for that, I too always want you to be their in my life, you are my entire support system and we both will work towards understanding each other".प्रिया  रिप्लाय सेंड केला....

झरा


झरा


शांत डोहावर कधी विश्वास ठेवू नये.. खोल बरच काही कुजलेलं मिळतं. उथळ वहणारं नितळ पाणीच उत्तम पिण्यायोग्य असतं.

माणूसही तसाच असावा, त्याच्या स्वभावात खळखळाटच असावा असं नाही पण कमालीचा सायलेंटपणा मात्र मुळीच नसावा, कधी कधी या सायलेंटखाली त्याचं दबलेलं पुर्वआयुष्य मिळेल. उलट  कधी पुर्णत: घमेंड, कुजकेपण याचा दर्प खोल आत दिसेल.

सतत वाहत रहावं नितळ -यासारखं, लोकं म्हणु देत उथळ पाण्याला खळखळाट फार... तो खळखळाटच पाणी शुद्ध ठेवतो. डोह कधी कधी तळाशी घमेंड, कुजकेपणा या असल्या पदर्थांनी कुजका निघु शकतो.

बेफिकीर पणे  मांडावं आपण आहोत तसे, लोकं मग ठरवतील तुमचा बरे वाईटपणा... स्वच्छंदीपणा हवा जगण्यात वागण्यात फक्त नैतिकतेचा लगाम हवा त्याला.. बाकी उधळा जगणं मुक्त हस्ताने... आयुष्य फार सुंदर आहे, ते असं कुजकेपणाणे कुणी वाया घालू नये .

बिनधास्त तारीफ करा, एखाद्या सुंदरतेची एखाद्या फुलाची, वेलाची, निसर्गाची आणि सुंदर एखाद्या मुलीचीही बरं का.. तिला तिची सुंदरता कळू द्या.. आवडली तर आवडली म्हणा, बिनधास्त... सगळे विकार अपेक्षा बाजूला ठेवुन मात्र..!!

कुढुन मुळीच जगू नका, आयुष्य विश्वाचा वेळ पाहता फक्त तसूभर आहे... दिलखुलास जगा.

सगळं उपभोगलं पाहीजे. थरार, आनंद, सुंदरता, आव्हानांना सामोरं जाण्यात आणि त्यानंतरच्या जिंकलेपणात जो आनंद असतो तोसुद्धा वेचता आला पाहीजे. डब्यासारखं एकाच ठिकाणी बसून जमत नाही. चारीआर मनाला घुमवलं पाहीजे. वैराग्याची भगवी वस्त्रे कधीच परिधान करु नका. कारण ती घातल्याने आतल्या चेतना मरत नाहित.

सर्व आसक्ती जीवंत असू द्या, त्या जिवंत असणं हे आपण जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यांना फक्त सुंदरतेची झालर असू द्या, मग त्यांचं उपभोगणंही सुंदर होवून जाईल .जगणही सुंदर होवून जाईल...!!

खळखळत जगा..
नितळ -यासारखं  शुद्ध..!!

Be positive and be happy...! Have a nice day



Be positive and be happy...! Have a nice day


माझ्या घराजवळ बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते.
तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची.
दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची...

इंजिन आणि डबे रोज बदलली जायची,
पण...
फक्त अर्धी निकर घातलेला छोटा मुलगा हातातलं फडकं  फिरवत गार्ड व्हायचा...

आज न राहवून
 थांबून मी त्या गार्ड होणाऱ्या मुलाला बोलावून विचारले,

"बाळ तू रोज गार्ड होतोस, तुला कधी इंजिन, कधी डबा व्हायला आवडत नाही का?"
त्यावर तो मुलगा उत्तरला...

"बाबूजी मला घालावयास सदरा नाही त्यामुळे मागच्याला धरायला काही नाही. मग माझ्या मागे कोण येणार ?"
म्हणून मी रोज गार्ड बनूनच खेळात भाग घेतो...

 "हे बोलताना त्याच्या डोळ्यांत मला पाणी तरळल्याचे जाणवले...

त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला !

आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काही  ना काही कमतरता असणारच...
तरीही आपल्याला जीवनाचा खेळ खेळावा लागणारच.

त्या मुलाला घालावयास सदरा नाही म्हणून आई- बापावर रागावून, रुसून रडत बसता आले असते...
पण,
 तसे न करता आहे त्यात समाधान मानून तो खेळात सहभागी झाला.
आणि जीवनाच्या खेळाचं अंग बनून राहिला.

मित्रांनो चला आपल्यालाही आहे त्यात समाधानी राहून या जीवनाच्या खेळाचं अंग व्हायचे आहे.
सतत हसत खेळत रहा व जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या...

Be positive and be happy...! Have a nice day

लक्ष


लक्ष 

एक मुलगा प्रिन्सिपलकडे गेला आणि म्हणाला, "मॅडम, आता मी शाळेत येणार नाही."
प्रिन्सिपलने  विचारले "पण का?"
मुलगा म्हणाला " मी एका शिक्षकाला दुसऱ्या शिक्षकांबद्दल वाईट बोलताना पाहिले ; आपल्याकडे जे शिक्षक आहेत ते चांगल शिकवत नाहीत ; कर्मचारी चांगले नाहीत ; विद्यार्थी त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांना त्रास देतात आणि इथे अनेक  चुकीच्या गोष्टी होतात ....
प्रिन्सिपल ने उत्तर दिले "ओके. पण आपण शाळा सोडण्यापूर्वी, माझ्यासाठी कृपा करून मी सांगतो  ते काम कर. एका काचेच्या प्यालात पाणी घ्यायचं आणि एकही थेंब न सांडता  शाळेभोवती तीन वेळा चक्कर मार व नंतर, तू तुझी इच्छा असल्यास शाळा सोड "
मुलाने विचार केला: हे खूप सोपे काम आहे!
प्राचार्यांनी सांगितले म्हणून त्याने शाळेला तीन वेळा चक्कर मारली . जेव्हा  त्याचे तीन राऊंड संपले तेव्हा त्याने प्रिन्सिपलला सांगितले
प्रिन्सिपलने विचारले "जेव्हा तुम्ही शाळेला राऊंड मारत  होता, तेव्हा तुम्ही एका शिक्षकाने दुसर्या शिक्षकांबद्दल वाईट बोलत असताना पाहिले का?"
त्या तरुणाने उत्तर दिले, "नाही."
" सिनिअर विद्यार्थी ज्युनिअर  विद्यार्थ्यांशी चुकीच्या पद्धतीने वागताना पाहिले का?"
"नाही"
"शिक्षक शिकवताना पाहिले का?"
"नाही"
तेव्हा प्रिंसिपल त्याला म्हणाले की
"तुझे लक्ष फक्त पाण्याच्या ग्लासावर होते, त्यामुळे  दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे  तुझ्या ग्लासातील एकही थेंब न सांडता तू तुझं ध्येय पूर्ण करु शकलास . 

आपल्या आयुष्याचेही असेच आहे .जेव्हा आपण आपले लक्ष्य / ध्येय (Target ) सुनिश्चित करतो व ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला इतरांच्या चुकांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो "
मतितार्थ.....
इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा व त्यालाच प्राधान्य द्या .....

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा