गरुडाकडून शिकायला मिळणारी सात प्रमुख नेतृत्व कौशल्य ....
1. गरुड नेमही अतिशय
उंच आकाश पातळीवर एकटा भरारी घेतो.
तो चिमण्या, कावळ्या
आणि इतर लहान पक्ष्यांबरोबर उडत नाहीत.
लक्ष्यात ठेवा गरुडासोबत
फक्त गरुडच उडू शकतो उडतो.
2. गरुडाची नजर इतकी तीक्ष्ण आणि अचूक असते की तो 5 किलोमीटर वर असलेल्या
गोष्टींवर देखील लक्ष केंद्रित करू शकतो. शिकार करताना कितीही अडथळे आले तरी आपले भक्ष्य
पकडल्या शिवाय त्यावरचे एकाग्र लक्ष हटू देत नाही.
3. गरुड मृत किंवा
आयते भक्ष कधीच खात नाही. तो फक्त ताज्या शिकारानेच खाद्य खातो.
@- आपल्या मागील यशावर विसंबून राहू नका, जिंकण्यासाठी
नवीन सीमेकडे पहात रहा. भूतकाळातील तुमचे यश मागे सोडून द्या. नवीन संधी शोधत रहा आणि आपल्या यशस्वीतेच्या नव्या आनंदाचा रोज आस्वाद घ्या.
4. गरुडांना झंझावाती
वादळे खूप आवडतात, आकाशातील अस्ताव्यस्त झालेल्या ढगांकडे पाहून ते अधिक उत्साही होतात. वादळांना पाहून ते आकाशात उंच
झेपावतात आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग करून ते ढगांच्याही वर जाण्याचा प्रयत्न करतात,
भर वादळातीळ भरारीने
गाठलेल्या इच्छित गगनचुंबी उंचीनंतर वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग करून घेऊन स्वतःच्या पंखांना विश्रांती देतात, जेव्हा इतर छोटे-मोठे पक्षी वादळाला करून
झाडांवरच्या पानांमागे लपून बसलेले असतात.
@- आयुष्यात येणारी
अशी वादळे/अडचणी ही तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतात हे जाणून घ्या आव्हानांना तोंड
द्या. यशस्वितेच्या खेळातला खरा खेळाडू आव्हानांना संधी समजून त्याचा फायदा करून घेतो
जेव्हा इतर जण त्यांना अडचणींनी समजून डगमगून जातात.
5. जेव्हा मादी गरुड
आणि नर गरुड एकमेकांना भेटतात आणि त्यांना संयोग करायचा असतो. तेव्हा मादी गरुड जमिनीवर
उतरते, गवताची एक काडी उचलून ती पुन्हा हवेत उंच भरारी घेते आणि आवश्यक उंची गाठल्यानंतर ती काडी हवेत सोडून देते आणि तिच्याकडे पहात राहते.
नर गरुड ती खाली जमिनीवर पोहोचण्याआधी पकडतो
आणि पुन्हा मादीकडे आणून देतो, मादी पुन्हा उंच भरारी घेते आणि पुन्हा ती काडी
खाली सोडते नर पुन्हा ती काडी जमीनी वर पोहोचण्या
आधी तिच्याकडे आणून देतो. आणि हा खेळ काही तास अधिकाधिक उंचीवर जात असाच चालू राहतो. जेव्हा मादीला नराच्या ती पकडण्याच्या क्षमतेची, चिकाटीची आणि तिच्याशी असलेल्या बांधिलकीची खात्री
पटते तेव्हाच ती संयोगासाठी तयार होते.
@- आपल्या वैयक्तिक
जीवनात असो किंवा व्यवसायामध्ये असो, समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रथम दर्शनी
सादरीकरणाने प्रभावित न होता, त्यांच्या वचनबद्धतेची चाचणी घेत जा.
6. पिल्लांना जन्म
दिल्यानंतर गरुड त्याच्या घरट्यातील पिसे आणि
मऊ गवत बाजूला काढून टाकतो जेणेकरून त्याचा नवतरूण पिलांना अस्वस्थ वाटून ती उडण्यासाठी
लगेच तयार होतील.
@- व्यवसायातील असो
किंवा स्वतःच्या कुटुंबातील प्रत्येकाला आणि
स्वतःला त्यांच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढा, हे तूमच्या यशात कोणत्याही प्रकारची
वाढ करत नाहीत.
7. जेव्हा गरुड म्हातारा
होतो त्याचे पंख कमकुवत होतात आणि ते त्याला त्याच्या सर्वशक्तीनिशी उडू देत नाहीत,
तेव्हा गरुड एकांतात असलेल्या उंच शिखरावर जाऊन
स्वतःची सर्व पिसे उपटून टाकतो, चोच
खडकावर आपटून मोडून टाकतो, अशा रक्तरंजित अवस्थेत तो त्या पहाडावर एकांतात राहतो.
जेव्हा अधिक क्षमतेचे
नवे पंख आणि नवीन चोच येते नाही तेव्हाच तो गरुड
पहिल्यापेक्षा अधिक शक्तीनिशी परततो.
@- आपल्याला नवीन युगामध्ये नव्या पिढी बरोबर स्वतःच्या
शक्ती सहित टिकून राहण्यासाठी, जुन्या सवयी, जुनी मूल्ये आणि संस्कृतीचा मर्यादा मनातून
काढून टाकून नवीन गोष्टी शिकुन स्वतःला शक्तिशाली बनविण्यासाठी तुम्ही सतत तयार असले
पाहिजे.
*कधी हार म्हणू नका
!
स्वतःलाच गरुडासारखे
मजबूत बनवा!




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा