Pages

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

देवावरची अपार निष्ठा

देवावरची अपार निष्ठा


ज्याचा देवावर विश्वास नाही त्याने जरुर वाचा 🔆

भारतातील प्रख्यात हार्ट स्पेशालिस्ट डाॅ. मांडके आज खूप आनंदात होते.

त्याला कारणही तसेच होते. नुकताच त्यांना त्यांच्या शोधनिबंधासाठी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला होता.

त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते विमानाने दिल्लीला जायला निघाले होते.

ठरल्या वेळी विमानाने उड्डाण केले.

डाॅ. मांडके विचारात गढून गेले होते. त्या शोधनिबंधासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते. रात्रंदिवस ते संशोधनात मग्न असत. अनेक विचारांची दाटी झाली होती त्यांच्या मनात....

इतक्यात ....

अचानक ...विमानाचे आपातकालीन लँडींग करण्यात आले.

डाॅ. मांडके समारंभाला वेळेवर पोहोचण्याच्या काळजीत पडले...

विमानतळावरील अधिकारी त्यांना म्हणाले की पुढची फ्लाईट 10 तासांनी आहे.

त्यामुळे डाॅक्टरांनी एक कार भाड्याने घेऊन पुढे जायचे ठरवले.

जवळपास 5 ते 6 तासांचा तो प्रवास होता.

त्यांना गाडीने जायचा कंटाळा आला होता कारण ते दमलेले होते आणि त्यांना थोडा आराम हवा होता.

पण काहीच पर्याय नसल्याने ते गाडी चालवत निघाले....

प्रवास सुरु होऊन एखादा तास झाला होता ..इतक्यात ..वातावरण अचानक बदलले आणि खूप जोराचा पाऊस सुरु झाला..

रस्त्यावरचे बोर्ड नीट दिसत नव्हते.
बरेच अंतर पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते रस्ता चुकले आहेत...

पावसाचा जोर वाढतच चालला होता. नाईलाजाने आसरा शोधून थांबावेच लागणार होते.

सुदैवाने थोड्याच अंतरावर त्यांना एक लहानसे कौलारु घर दिसले.

कसेबसे ते तिथे पोहोचले आणि त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला.

एका तरुण स्त्रीने दार उघडले आणि अगत्याने त्यांना आत येण्यास सांगितले.

तिचे घर अगदीच साधे होते. घरात सामानही अगदी थोडेच होते. कोणत्याच महागड्या वस्तू नव्हत्या.

त्या स्त्रीने डाॅक्टरांसाठी चहा आणि काही बिस्किट आणले.

जरा वेळाने ती म्हणाली ..

माझी प्रार्थनेची वेळ झाली आहे. आपण माझ्यासोबत प्रार्थना करणार का?

डाॅक्टरांचा फक्त कर्मयोगावर विश्वास असल्याने त्यांनी नम्रपणे नकार दिला!

ती स्त्री उठली आणि एका छोट्या कोनाड्यात असलेल्या मुर्तिसमोर दिवा लावून प्रार्थना करायला लागली.

प्रत्येक कडव्यानंतर ती तिथे ठेवलेला एक छोटासा पाळणा हलवत होती.

डाॅक्टर तिचे निरिक्षण करत होते आणि त्यांच्या मनात तिला विचारण्यासाठी अनेक प्रश्न तयार होते!

काही वेळाने तिची प्रार्थना संपली.

डाॅ. नी तिला विचारले ...

या सगळ्यांचा तुम्हाला काही उपयोग झाला का कधी?

देवाने कधी तुमची हाक ऎकली आहे का?

आणि तुम्ही तो छोटासा पाळणा का हलवत होतात?

....

त्या स्त्रीच्या चेहे-यावर अचानक खिन्नता आली...

खोल आवाजात ती म्हणाली ...

"माझ्या 2 वर्षांच्या मुलाला जन्मत: ह्रुदयरोग आहे...
मुंबईतील प्रख्यात डाॅ. मांडके सोडून त्याचा इलाज कोणीही करू शकणार नाही. पण त्यांच्याकडे जाण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसे नाहीत..

मी रोज देवाला प्रार्थना करते की कसेही करुन मला त्यांच्यापर्यंत ने आणि माझ्या मुलाला जीवदान दे. मला खात्री आहे.. एक दिवस देव मला नक्की मदत करेल..."

...

पुढचे बरेच क्षण तिथे सुन्न शांतता पसरली ...

डाॅ. मांडके अगदी स्तब्ध झाले ...
काय बोलावे ते कळेनाच त्यांना ...

त्यांनी मागच्या काही तासांमध्ये घडलेल्या घटनाचक्राचा विचार केला ...

कोणतेच लक्षण नसताना हवामान खराब होऊन विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाही....

गाडीने जाताना पावसाने रस्ता चुकला ...

याच घरात आसरा घ्यावा लागला ...

आणि ...आता त्या स्त्रीने सांगितलेली वस्तुस्थिती ....

...

काय अद्भूत् ..चमत्कारच जसा ..

काही क्षणातच डाॅ. भानावर आले. त्यांनी तिला त्यांची ओळख सांगितली आणि वातावरण ठीक झाल्यावर तिला आणि तिच्या बाळाला घेऊन ते मुंबईला निघाले ...!

...

सोबत आणखी एक गोष्टपण घेतली त्यांनी ....

देवावरची अपार निष्ठा !

...

कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप काही जास्त मिळाले होते त्यांना..!!

या जगात कोणतीतरी शक्ती नक्कीच आहे, ती कोणत्या रूपात आहे सांगता येत नाही, प्रत्येक धर्मात वेग वेगळी तत्व सांगितली आहेत,पण देव आहे एवढे मात्र नक्की



CLICK HERE
CLICK HERE

फर्स्ट गिअर

फर्स्ट गिअर




           गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली........
गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअर' टाकतो.
हा 'फर्स्ट गिअर' म्हणजे
आपल्या जवळची सख्खी माणसं. आई बाबा,जोडीदार, मुलं,जवळचे मित्र...
हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही.  मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता 'पुढे' जात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कार' फर्स्ट गिअर करतो.
इथे आपल्याला unconditional प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी 'बंद पडणार नाही' याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो.
परंतु गाडी'पळण्यासाठी'इतका कमी वेग
पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर
टाकतो ! इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व
कळू लागतं. शाळा,कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद,विविध कला.....
बाहेरचं जग किती मोठं आहे
आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं.
समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो.
गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून  मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडा लत्ता, भांडीकुंडी,पहिला फ्रीज,
पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग,
सणासुदीला नवीन कपडे,चांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं.
या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअर मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य,
पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.
आपण आता फोर्थ गिअर' टाकतो.

गाडी सुसाट निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग- मल्टीप्लेक्स, गाडी, latest मोबाईल, 1 BHK मधून 2 BHK, laptop, ह्याउ नि त्याउ..!
या वेगाची नशाच काही और!
गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही...
आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी... खर्व.... निखर्व...... रुपये नाहीत, गरजा!
हा 'वेग'खूप आनंददायी असतो.
आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये,
'लाल'सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं....
आणि... आणि.....आणि.....
नियती
नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो. गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो.
पाच.. चार.. तीन..दोन...एक....खाट खाट गिअर मागे टाकत आपण आता neutral वर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो. पाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखील टाकला होता याचा विसर पडला होता.
वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती... आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं.
गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे..मला सांगा कुठला गिअर टाकाल ?
सुसाट वेगाचा पाचवा गिअर ? की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा 'फर्स्ट गिअर' ?
आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण
आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ?
कोणी दिला होता आधार ?आठवून पहा.
प्लाज्मा टीव्हीने ?
EMIभरत विकत घेतलेल्या extra बेडरूमने?
नव्या कोऱ्या गाडीने ?
'You are promoted' असं लिहिलेल्या कागदाने ?
मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ.
तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने !
आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा,
निरागस प्रश्न विचारून
आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं,
'होईल सगळं व्यवस्थित'म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी'बायको' नावाची मैत्रीण, 
बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, 
'त्या'काळात आपल्या frustration
चा ‘कानहोणारे आणि योग्य सल्ला देणारे
'जिवाभावाचे मित्र' हे सगळे हे सगळे फर्स्ट
गिअर तुमची गाडी ओढत नव्हते का ? 
Don't get me wrong.  माझा चवथ्या- पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही. त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया. फक्त त्यावेळी आपल्या'फर्स्ट गिअर्स'चं स्मरण ठेवूया. 
आयुष्याचा वेग मधून मधून थोडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.
Enjoy life!!!

https://amzn.to/2wSScXk

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

पॉजिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार

पॉजिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार


पॉजिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक
एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते. 
अचानक काही आठवलं म्हणून त्यानी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली ....
या वर्षात माझ्या शरीरातलं पित्ताशय काढून टाकलं 
आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळून रहावं लागलं.
याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्षे पूर्ण केली 
आणि मी ज्या प्रकाशन कंपनीत माझी उमेदीची 30 वर्ष नोकरी केली ती नोकरी मी सेवानिवृत्त झाल्याने बंद झाली.
याच वर्षात माझ्या वडिलांच्या निधनाचं दु:ख मला पचवावं लागलं
याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकिय शिक्षणाच्या परिक्षेला मुकला.... त्याच्या झालेल्या कार अपघातामुळे! जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले
शिवाय गाडीचे नुकसान झाले ते अजुन वेगळेच ..!
आणि शेवटी त्यांनी लिहिले ..…. 
"खरंच, किती वाईट आणि दु:खदायक ठरले हे वर्ष माझ्यासाठी !!!
इतक्यात त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली. 
भरलेले डोळे आणि विचारात गढून गेलेल्या आपल्या पतीकडे पाहताच त्यांना काहितरी वेगळं असल्याचा अंदाज आला.
सावकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद वाचला
आणि काही न बोलता त्या खोलीतून निघून गेल्या.
थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता.
तो कागद त्यानी त्यांच्या पतीच्या कागदा शेजारी ठेवला. 
लेखक महाशयानी तो कागद उचलून वाचायला सुरुवात केली. 
त्यात लिहिले होते...
गेले कित्येक वर्ष ज्याचा त्रास मी माझ्या शरीरात काढला ते पित्ताशय अखेर या वर्षात मी काढून टाकले. 
आता मला कुठलाही त्रास नाही. 
मी अत्यंत सुखी झालोय यामुळे ..!
याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्षे अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार पाडली.
आणि एक चांगल्या नोकरीतून सन्मानाने सेवानिवृत्त झालो, 
आता अजून चांगलं आणि लक्षपूर्वक लिहायला माझ्याकडे भरपुर वेळ आहे...!!
याच वर्षात माझे तिर्थरुप वडील वयाच्या 95 व्या वर्षी अगदी कुठलाही आजार नसताना आणि कोणावर अवलंबून न रहाता इहलोकीची यात्रा संपवून शांतपणे मार्गस्थ झाले ..!!
याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं, 
जीवघेण्या कारच्या अपघातातुन जरी कार पुर्णपणे मोडित निघाली तरी तो बचावला 
आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत जोमाने अभ्यासाला लागला....!!!
आभारी आहे देवा ...!!
किती सुंदर आणि चांगल वर्ष दिलस तू मला ..!!"
बघा मित्रांनो ... तेच प्रसंग पण पाहण्याची दृष्टी वेगळी ..!! 
नकारात्मक विचार बाजूला सारुन एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी !!
आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात.
आपण ज्या दृष्टीने त्याकडे पाहतो तसा आपल्या मनावर वाईट चांगला परिणाम होतो.
प्रत्येक घटनेला जसा कार्यकारण भाव आहे तसाच वेगवेगळा अर्थ आहे.
आपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायच..!!!
त्या घटनेची वाईट बाजू न पहाता चांगली बाजू, सकारात्मक बाजू डोळ्यासमोर ठेवायला शिका.
जे होत ते चांगल्या साठीच हा आशावाद मनाशी बाळगून पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपूर्वक विचार करा ...!! 
जगणं अजुन सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल !!
Every Dark cloud has a silver lining …!!!
प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते हे ही लक्षात ठेवा ..!!
शेवटी चिडचिड करुन जगायच की आनंद घेत हे आपल्या विचारांवरच ठरणार आहे.
आपल्याकडं काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेऊन नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा ..!!
दु:खात सुख शोधा, सुखात दु:ख नको !!
शेवटी पाडगावकरांच्या ओळी आठवतात.!!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं;
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं!
सरला आहे म्हणायचं
कि भरला आहे म्हणायचं?
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत 
कि गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा....!!

मित्रांनो सकारात्मक व्हा ....आनंद लुटा ..!!


जीवनसाथी


जीवनसाथी


एकदा एक मित्र आमच्या घरी आला होता.                  चहा,नाश्त्यासोबत गप्पाही चांगल्या रंगल्या होत्या.
बोलता बोलता मी मधेच उठून उभा राहिलो.
मी प्लेट्स धुवून लगेच परत येतो.”
मी असं म्हणताच तो माझ्याकडे अशा काही विचित्र नजरेने पाहत होता जणू मी त्याला सांगितलंय की
मी रॉकेट बनवायला चाललोय.’
मग तो काहीसा गोंधळून कौतुकाच्या स्वरात बोलला.
मला आनंद वाटला की तू तुझ्या बायकोला कामात मदत करतोस.मी नाही करत मदत. कारण माझ्या बायकोला त्याचं काही कौतुकच नसतं. आता हेच बघ ना ,मागच्या आठवड्यात मी किती मेहनतीने फरशी धुतली....
तर तिने साधं छान ही म्हटलं नाही....”
मी किचनमधून परत आलो.
मी बायकोला ‘मदत करत नाही.खरं तर तिला मदतीची गरजच नसते. तिला हवा असतो ‘पार्टनर.आणि घरात ,समाजात मी तिचा पार्टनर आहे.
पण मी  काही घरतल्या कामात तिची मदत करत नाही.
घर स्वच्छ करण्यात मी तिला ‘मदत करत नाही ,
कारण मीही याच घरात राहतो आणि त्याची स्वच्छता माझीही गरज आहे.
स्वैपाकात मी तिला ‘मदत करत नाही,
कारण जेवण ही माझीही गरज आहे आणि म्हणून स्वैपाक करणं माझंही काम आहे.
जेवणानंतर मी ताटं धुतो ,
कारण ती ताटं मीही वापरत असतो.
मी मुलांना सांभाळण्यात तिला मदत करत नाही.
कारण ती माझीही मुलं आहेत आणि मुख्य म्हणजे  एक बाप म्हणून ते माझंही काम आहे.
कपडे धुणे, वाळवणे, घड्या घालून ठेवणे या कामात मी तिला मदत करत नाही.
कारण ते कपडे माझे अन माझ्या मुलांचे असतात.
मी घरात तिला ‘मदत करत नाही,
कारण मीही या घराचा एक हिस्सा आहे.

अन् मुद्दा राहिला तो तिने तुझं कौतुक करण्याचा तर आठवून बघ, तिने जेव्हा घर स्वच्छ केलं,कपडे धुतले, स्वैपाक केला, मुलांना संभाळलं तेव्हा तू तिला साधं ‘थँक्यू तर बोललास का ?
बोलायला हवं.
अगदी कोणत्याही मर्यादांचा बाऊ न करता बोलायला हवं.
मी बोलतो.
पण थोडं वेगळ्या स्टाईलने.
जसं, “थँक्यू डार्लिंग....!!
तुझी खरंच कमाल आहे!!”
तुला हे मूर्खपणाचे वाटेल कदाचित.
जणू एखादी नवलाची गोष्ट मी तुला सांगतोय,
असे तुझे डोळे मोठ्ठे मोठ्ठे झालेत.

पण खरं  तर असं काहीही नाही,
आयुष्यात एकदाच फारशी पुसून तू एका मोठ्या कौतुकाची अपेक्षा करत होतास. पण, खरं सांग तिच्यासाठी तू असा कधी विचार केला आहेस का?

तुझ्यासाठी म्हणून सांगतो,
या कामांसाठी फार मेहनत अन संयम लागतो.
जो आपल्यात नसतो.
आपल्याकडे कष्टाच्या कामांना मर्दानी काम म्हणतात. पण आपली आई,बायको जे काम करत असतात ते मर्दानी कामाहून मुळीच कमी नसते.
कदाचित आपल्याला हेच शिकवलं जातं की हे काम तितकं मेहनतीचं नसतं.
साधं बोटही फिरवावं लागत नाही.
खरं तर हे काम केल्यावर समजतं.
जर तू तिच्याकडून कौतुकाची अपेक्षा करत असशील तर तिच्याही कामाचं कौतुक कर. अगदी मनापासून.
तिला हात दे, तिच्या ‘पार्टनरसारखा.
एखाद्या पाहुण्यासारखा नको जो फक्त जेवण्यासाठी, झोपण्यासाठी, अंघोळीसाठी किंवा केवळ इतर गरजा पूर्ण करण्यासाठी घरात येतो.
आपल्याला हे बदल आपल्या घरापासून सुरु करावे लागतील. आपण आपल्या मुलींना अन मुलांना ‘मैत्रीचं खरं मर्म शिकवायला हवं. तेव्हा ते एकमेकांचं कौतुक करतील अन त्याहून अधिक एकमेकांच्या कामाचा आदर करतील.





मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

मासा आणि हंस

आजची बोधकथा बोधकथा


मासा आणि हंस
एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला.त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते.
तात्पर्य
मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात.

सोमवार, ३ सप्टेंबर, २०१८

दहीहंडी

दहीहंडी 

                          मित्रांनो नुकताच दहीहंडीचा सण आपण अनुभवला. तरुणाईचा  जल्लोष, उत्साह बघायला मिळाला. मीडिया दिवसभर तेच दाखवत होती. मागणी तसा पुरवठा. मोठं मोठ्या राजकीय  नेत्यांनी दही हंडीचे आयोजन केले होते. त्यात सिने तारे, मालिका कलाकार बोलावण्यात आले होते. मोठं मोठ्या बक्षिसांचे आकडे टीव्ही वर सांगत होते. अनेक  नृत्यांगना बेभान होऊन  आपली कला सादर करीत होत्या. त्यामुळे गोविंदांना उत्साह वाटत होता.  डीजे च्या तालावर तरुणाई थिरकर होती. कित्येक दिवस केलेल्या प्रॅक्टिसची किमया आज जगाला दाखवायला सज्ज होते. मेहनत, सांघिक भावनेने केलेले प्रयत्न आज फळाला येत होते. मेहनतीचं चीज झाल्या सारखा वाटत होतं. 
                           त्याच वेळी टीव्ही वर बातम्यांच्या खाली लाईन ला बातमी वाचली. एका २०वर्षीय  गोविंदाचा मृत्यू , ८८ जखमी. त्याच क्षणी मला समोरच्या टीव्ही वरची दृश्य बघून भीती वाटू लागली. एकीकडे हा जल्लोष त्या वेळी त्या मृत गोविंदाच्या घरी काय अवस्था असेल या कल्पनेनेच अंगावर काटा आला. जखमी,  आयुष्यभर जायबंदी झालेल्यांच पुढे काय ?
                          खरंच तरुणाईची रग दाखवायला  हे सर्व आवश्यक आहे का ? कानठळ्या बसवणाऱ्या दुर्लक्ष करून केवळ सण अथवा  धार्मिक पण  सिद्ध होते का? आज राजकीय नेते कुठल्याही सणाचे  इव्हेंट करून आपली ओळख किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पैसे अशा इवेन्टवर  खर्च करतात. किती करतात त्याचा हिशोब नाहीच. पण त्यात  वापरली जातेय ती तरुणाई ! त्यांच्या जीवावर बेतणारी .
                           नक्की काय साध्य होतं ?  आयुष्यभर जायबंदी होणाऱ्यांचं नुकसान  काही हजारात मोजले  जाते. जीवानिशी जाणारा काही शाहिद होतं नसतो. त्यांच्या कुटुंबाचं काय? हे  प्रश्न जल्लोषात पडत नाहीत तर,  दुःखात पडतात.
                          आजही खेडे गावात  बऱ्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने  दहीकाला उत्सव साजरा केला जातो. आदल्या आदल्या दिवशी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी ला रात्रभर पारंपरिक नाच गाणी करून साजरा केला जातो. त्यामुळे समाजात एकोपा वाढतो. शाळांमध्ये खूप छान पद्धतीने  लहान मुले साजरा करतात. आता हाच बघा ना बोलका फोटो. खूप काही शिकवून जातो. सॅल्यूट त्या भारताला !


                       
       

आयुष्य म्हणजे काय


जरुर वाचा



आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.!
मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.
आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल.!
तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका.
मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर, स्वतःच्या आवडीनिवडीवर करा.

जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही, हे देखील लक्षात ठेवा.
तुम्ही कदाचित आपल्या चाळीशीत असाल, पन्नांशीत किंवा साठीत, आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही.
या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल.? तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमिन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !
एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात, हे लक्षात असू द्या.
आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर, उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल, आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल, तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा आणि हो! तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका, त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणतो नं.. "आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..!
प्रेम मधुर आहे,
त्याची चव चाखा..!

क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!

संकटे ही क्षणभंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!

डोंगराआड गेलेला सूर्य
परत दिसू शकतो, पण माथ्या आड गेलेला "जिवलग" परत कधीच दिसत नाही"


A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा