श्रद्धेमुळे मानसिक आधार मिळतो, हीसुद्धा मनाची करुन घेतलेली समजूत आहे. श्रद्धेलाही विवेकाचे अधिष्ठान हवे अन्यथा तिचे रुपांतर प्रारंभी अंधश्रद्धेत आणि नंतर अतिरेकवादात होऊ शकते. एखाद्याला त्याच्या आईबद्दल आदर, प्रेम, विश्वास वाटतो, ही श्रद्धा. पण तीच आई पत्नीचा जाच करत असल्यास तिला तिच्या चुकीची जाणीव करु न देणे अथवा आईच्या वर्तनाचे विश्लेषण न करणे,ही अंधश्रद्धा आणि जगात केवळ आईच सर्वश्रेष्ठ, असे मानणे हा अतिरेकवादच..
मानवी समूहाकडून तर्कनिष्ठता, विवेक याची अपेक्षा करायची नाही तर मग कुणाकडून ? कारण निसर्गाने मानवालाच कृतींमागील विश्लेषणाची विशेष बुद्धिमत्ता दिली आहे. इतर प्राणी 'आहार्, निद्रा,भय, मैथुन' यापलिकडे विचार करत नाहीत. प्राण्यांमधील बुद्धिमत्ता आणि कल्पकता किंवा वात्सल्य व प्रतिकारक्षमता (हल्ला करणे) या गोष्टी या मूलभूत गरजांशीच संबंधित आहेत.
मनुष्य प्राणी या सर्वांहून अधिक उत्क्रांत आहे. संवेदनांच्या रुपाने तो लहानपणापासून घेत गेलेला अनुभव त्याच्या मेंदूच्या स्मृतिकोषांत साठवला जातो आणि त्या संदर्भ चौकटीतच तो सध्याच्या अथवा भविष्यातील कृतींबाबत निर्णय घेतो.
प्रश्न असा आहे की अनुभवांतून सत्याची जाणीव झाल्यानंतरही त्याने चुकीच्या समजुतींना कवटाळून बसावे का ?
सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास लहानपणी आपण परी, राक्षस, देव, भुते, जादू, चमत्कार या अद्भुत विश्वात रमतो. मोठे झाल्यावर यातील काही खरे नसते आणि आपल्या कृतीच परिणाम घडवतात. हे उमगूनही 'तेच जुने विश्व खरे' (कारण ते सुखद अनुभूती देते.) असे मानण्यात कसला आलाय शहाणपणा ?
हे तर विवेकावर जाणूनबुजून घातलेले पांघरुण आहे.
नैतिक तत्त्वांवर श्रद्धा असणे इतपत ठीक, पण जसे बायबलमध्ये म्हटले आहे, की पृथ्वी गोल नसून् चौकोनी आहे, म्हणून त्या समजुतीला कवटाळून बसणे, ही मात्र अंधश्रद्धाच.
एखाद्याच्या श्रद्धेचा इतरांना त्रास होईल न होईल पण अंधश्रद्धेचा आणि अतिरेकवादाचा कायम त्रासच होतो. असो.
कुणाही माणसाने विवेकी अन् तर्कनिष्ठ असलेच पाहिजे.
तरच विषमता, शोषण, हिंसाचार याला पायबंद बसतो.
मानवी समूहाकडून तर्कनिष्ठता, विवेक याची अपेक्षा करायची नाही तर मग कुणाकडून ? कारण निसर्गाने मानवालाच कृतींमागील विश्लेषणाची विशेष बुद्धिमत्ता दिली आहे. इतर प्राणी 'आहार्, निद्रा,भय, मैथुन' यापलिकडे विचार करत नाहीत. प्राण्यांमधील बुद्धिमत्ता आणि कल्पकता किंवा वात्सल्य व प्रतिकारक्षमता (हल्ला करणे) या गोष्टी या मूलभूत गरजांशीच संबंधित आहेत.
मनुष्य प्राणी या सर्वांहून अधिक उत्क्रांत आहे. संवेदनांच्या रुपाने तो लहानपणापासून घेत गेलेला अनुभव त्याच्या मेंदूच्या स्मृतिकोषांत साठवला जातो आणि त्या संदर्भ चौकटीतच तो सध्याच्या अथवा भविष्यातील कृतींबाबत निर्णय घेतो.
प्रश्न असा आहे की अनुभवांतून सत्याची जाणीव झाल्यानंतरही त्याने चुकीच्या समजुतींना कवटाळून बसावे का ?
सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास लहानपणी आपण परी, राक्षस, देव, भुते, जादू, चमत्कार या अद्भुत विश्वात रमतो. मोठे झाल्यावर यातील काही खरे नसते आणि आपल्या कृतीच परिणाम घडवतात. हे उमगूनही 'तेच जुने विश्व खरे' (कारण ते सुखद अनुभूती देते.) असे मानण्यात कसला आलाय शहाणपणा ?
हे तर विवेकावर जाणूनबुजून घातलेले पांघरुण आहे.
नैतिक तत्त्वांवर श्रद्धा असणे इतपत ठीक, पण जसे बायबलमध्ये म्हटले आहे, की पृथ्वी गोल नसून् चौकोनी आहे, म्हणून त्या समजुतीला कवटाळून बसणे, ही मात्र अंधश्रद्धाच.
एखाद्याच्या श्रद्धेचा इतरांना त्रास होईल न होईल पण अंधश्रद्धेचा आणि अतिरेकवादाचा कायम त्रासच होतो. असो.
कुणाही माणसाने विवेकी अन् तर्कनिष्ठ असलेच पाहिजे.
तरच विषमता, शोषण, हिंसाचार याला पायबंद बसतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा