Pages

गुरुवार, २८ मार्च, २०१९

अमृतवेल-



अमृतवेल-वि.स.खांडेकर
जग चुकते,त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही !
प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी शहाणा होतो; पण तो दुसर्याला लागलेल्या ठेचानी नाही, तर
स्वतःला झालेल्या जखमांनी!
"मागे किर्र रान पुढे गर्द अरण्य,असे हे जीवन !"
लहानपणाच्या आठवणी किती नाजूक मोहक, पण किती बहूरंगी असतात !जणू काही मोरपिसच !"
"शब्दापेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो पण त्याला काही काळजाला हात घालता येत नाही ते काम अश्रूनांच साधते! "
"आईच्या नखात जे बळ असते ते
बायकोच्या मुखात...!
जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं!
जगात सर्व गोष्टी योग्य वेळी माणसाला कळतात झाडाना काही पानाबरोबर फुल आणि फुलाबरोबर फळ येत नाहीत !
जग जिकंण्याइतंक मन जिकणं सोप नाही!
बायकांच लक्ष पुरुष्याच्या जिभेकडे नसंत ते डोळ्याकडे असतं!
या जगात जो तो आपल्याकरिता जगतो हेच खरे वृक्षवेलीची मुळे
जशी जवळ्च्या ओलाव्याकडे वळतात ,तशी माणसेही सुखासाठी निकटच्या
लोकांचा आधार शोधतात; याला जग कधी प्रेम म्हणते कधी मैत्री म्हणते पण
खरोखरच ते आत्मप्रेमच असते !
आकाशाचा अंत एक वेळ लागेल पण माणसाच्या हृद्याचा ?
प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे
पाहायची शक्ती देतं ते प्रेम कुणावरही असो ते कशावरही जडलेल असो मात्र ते खंरखुर प्रेम असायला हवं ! ते हृदयाच्या गाभ्यातुन उमलयाला हवं ! ते स्वार्थी, लोभी किंवा फसवं असता कामा नव्हे. निरहंकारी प्रेम
विकासाची पहिली पायरी असते असलं प्रेम केवळ मनुष्य करु शकतो !
प्रिय व्यक्तीला तिच्या दोषासहं स्वीकार करण्याची शक्ती खर्या प्रेमाच्या अंगी असते- असली पाहिजे !
कुठला ना कुठला छदं हे दुःखावरले फार गुणकारी औषध आहे!
भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही ! मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही!
त्याला भविष्याच्या गरुड्पंखांचं
वरदानही लाभलेलं आहे.
एखाद स्वप्न पहाणं, ते फुलविणं,ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं,
त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न जरी भंग पावलं तरी
त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसर्या स्वप्नामागनं
धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे.
मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं!
या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे.प्रीती म्हणजे यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही.सा-या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते,तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते.
मग या वेलीवर करुणा उमलते,मैत्री फुलते.मनुष्य जेव्हा जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरुप होतो, तेव्हा तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो.या बाहेरच्या विश्वात रौद्र-रम्य निसर्ग आहे.सुष्ट दुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंच्या कला आहेत
आणि महारोग्याच्या सेवेपासून
विद्न्यातल्या संशोधनापर्यंची आत्म्याची तीर्थक्षेत्रे आहेत."
"पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दूसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही ,
तो स्वत:चाही वैरी बनतो!मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात."
माणसानं ओठांशी नेलेला अमृताचा प्याला नियतीला अनेकदा पाहवत नाही. एखाद्या चेटकिणीसारखे ती अचानक प्रगट होते ,आणि क्षणार्धात
तो प्याला भोवतालच्या धुळीत उडवून देते.
विश्वाच्या या विराट चक्रात तू कोण
आणि मी कोण आहोत ?या चक्राच्या कुठल्या तरी अरुंद पट्टीवर क्षणभर आसरा मिळालेले दोन जीव ! दोन दवाचे थेंब - दोन धुळीचे कण !
स्वत:च्या तंद्रीत अखंड भ्रमण करणारे हे अनादी, अनंत चक्र,तुझ्या -माझ्या सुख- दु:खांची कशी कदर करु शकेल ?
संकोच हा सत्याचा वैरी आहे.
हिमालयाच्या पायथ्याशी उभा असणारा मनुष्य किती खुजा,किती क्षुद्र दिसेल,याची कल्पना कर.
विश्वशक्तीपुढं आपण सारे तसेच आहोत.जन्म हे या परमशक्तीचं वत्सल स्मित आहे,प्रीती हे तिचं
मधुर गीत आहे.मृत्यू ही तिची राग व्यक्त करण्याची रीत आहे.या शक्तीची कृपा आणि कोप यांचा आपण नतमस्तक होऊन स्वीकार
केला पाहिजे.
या जगात दु:ख मनुष्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ते निरनिराळे रुपं घेऊन
येतं!
स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे, पण माणसाचं मोठेपण
आपल्या वाट्याला आलेलं सारं दु:ख साहून नवी स्वप्नं पाहण्यात आहे - हालाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे.
आपण सदैव आत्मकेंद्रित असतो.नेहमी केवळ स्वत:च्याच सुख-दु:खाचा विचार करतो.त्यामुळं आपलं दु:ख आपल्याला फार फार
मोठं वाटत राहतं ! तू दु:खाच्या पिंज-यात स्वत:ला बंदिवान करुन
घेऊ नकोस. त्या पिंज-याचं दार उघडं,पंख पसर आणि आकाशात भरारी मार.जीवनाचा अर्थ
त्या आकाशाला विचार
कल्पनेची नशा दारुपेक्षाही लवकर चढते.
जर आणि तर ! शब्दांची सुंदर प्रेते ! हे शब्द
कोषातून काढून का टाकत नाहीत

valentine


🌹नवरा आणि बायको मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतात आणि त्यांचं छोटं मूल शाळेसाठी आजीकडे राहातं.

आठवड्याची गाठभेट होत असते. नवऱ्याची परत बदली झाल्यावर काही दिवसांनी बायको मुलाला घेऊन दोन दिवस येते सुटीसाठी. रविवारी घरमालकांकडे जेवताना मालकीणबाई म्हणतात, " या आता इकडं! कुठवर साहेब एकटे राहातील?" ही बिचारी गप्प बसते. दुपारी ती एकच खोली स्वच्छ करते. थोडीशी असणारी तांब्या पेले भांडी चकाचक घासून ठेवते, दोरीवर पडलेले कपडे धुवून घड्या घालून ठेवते. गहू पाहाते डब्यात आणि साफ करून दळून आणून ठेवते. नवरा तिला सांगत राहातो की बाई, थोडा आराम कर. पण ही सगळी कामं उरकून मग ती नोकरीच्या गावी परतते.

सोमवारपासून तोच तो दिनक्रम सुरू होतो आणि गुरूवारी नवऱ्याचं पत्र येतं. " दीड दिवस तू आलीस आणि या खोलीचं घर झालं. काल सकाळी तुला स्टँडवर सोडून मी परस्पर ऑफिसला गेलो आणि संध्याकाळी परतलो तर खोलीचा कायापालटच झालेला दिसला. खोलीभर फिरलेला तुझा हात मला सर्वत्र दिसू लागलाय. तू होतीस तेव्हा तुझ्या असण्याने खोली भरून गेली होती आणि आज तू इथे नाहीस तर तुझ्या आठवणीनी खोली तितकीच भरून गेली आहे. रात्री स्वयंपाक करायला बसलो. कपाटातून पिठाचा डबा काढला आणि उघडून पाहते तर- माझ्या अंगावर सरसरून शहारा आला. डब्यात मावावे म्हणून तू पीठ दाबून बसवले होते. तसे दाबताना तुझ्या हाताचा ठसा त्या पिठावर स्पष्ट उमटला होता अगदी रेषा न् रेषांसह.

मी त्या ठशाकडे पाहातच राहिलो. तो केवळ पिठावरचा ठसा नव्हता. माझ्या एकटेपणावरचा तुझ्या अस्तित्वाचा उमटलेला ठसा होता तो. पीठ काढून तो मोडण्याचं धैर्य मला झालं नाही."

यापेक्षा वेगळं असं काही valentine असेल???

पार्टी


पार्टी सुरु होती.
धांगडधिंगा, गप्पा, आवाज, गाणी  असलं बरंच काही चाललं होतं.
मधूनच कोणालातरी नाचण्याची लहर आली.
आणि पाहता-पाहता सगळेजण सामील झाले. फक्त एक सोडून.

तो तसाही शांत-शांत असायचा.
हुशार होता, कुणाशी फारसं बोलायचा नाही.

"अरे चल ना, मजा येते नाचायला.." ती म्हणाली.
"मला नाच येत नाही, force करू नकोस", तो भीती वाटावी एवढ्या ठाम आवाजात बोलला.

सगळे पार्टीत मश्गुल असताना तो केव्हातरी तिथून निघाला, कोणालाही न सांगता.
घरी येताना, त्याच्या डोक्यात विचार चालले होते, 'काय ते फिदीफिदी हसतात, फालतू जोक्स मारतात आणि नाचतात. मला नाही आवडत, it's of no use...'

तो असं म्हणत गेला, ज्याने त्याच्याशिवाय कुणालाही फरक पडला नाही.
तो तुटत गेला, इतरांपासून.
एकटा होत गेला.
पुस्तक, लेखन ह्यांत रमत गेला. व्यासंग वाढवत गेला.  पण कुणालाही easily reachable तो नव्हता म्हणून ती मैत्री, जुनी नाती, sharing आणि मजा मात्र हरवत गेली.

कधीकधी त्याला मित्र आठवतात, जुने दिवस आठवतात आणि आता तसं नाही म्हणून तो हळहळतोही..
पण मित्रांच्यात गेल्यावर हे जाणवत राहतं कि आपण त्यांच्यापासून तुटलोय..

असे अनेकजण असतात. लोक येणार, मस्ती होणार म्हटलं कि ह्यांच्या कपाळावर रेषा जमू लागतात.
खूप कमी जणांशी त्यांचं जमतं. मग ते कामात झोकून देतात, चिडचिडे होतात, प्रत्येक गोष्टीला नावं ठेऊ लागतात. त्यांना काहीतरी सिद्ध करायचं असतं. काय, हे बहुदा. त्यांचं त्यांना सुद्धा कळलेलं नसतं.  

का कुणास ठाऊक, पण असं वाटतं कि त्यांनी त्यांच्याच भोवती मोठ्या-मोठ्या भिंती बांधून घेतल्या आहेत...
त्याच्या आत त्यांच्याशिवाय कुणालाच प्रवेश नाही.
त्यांना लोक नको असतात असं नाही; पण मित्र-नातेवाईक सगळे एका अंतरावर.
दु:खाने कोसळणं नाही तसं खूप आनंदून जाणं आणि खळखळून हसणंपण नाही...

अशा लोकांच्या बाबतीत वाटत राहतं, काय हरकत आहे, एक दिवस वय सोडून वागायला?
आपल्या भिंतीना एक खिडकी करून बाहेर पाहायला?
सगळे नसतात व्यासंगी, तुमच्याएवढे...
हुशारही नसतात... perfect तर अजिबातच नसतात...
पण आनंदात राहण्यासाठी व्यासंग आणि हुशारीची गरज नसतेच मुळी...
जरा, आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येतं, कि आनंदाला तर शोधण्याची पण गरज नसते,
तो कुठेही असतोच...अगदी दु:खात सुद्धा असतो...

जसा मोठ्या-मोठ्या पुस्तकांत आणि चांगल्या कलाकृतीत असतो,
तसाच फालतू जोक्स आणि नाचण्यातपण असतो.
 जसा चर्चासत्रामध्ये असतो, तसाच तो पार्ट्यांमध्ये असतो.
तसाच एखाद्या परक्या माणसासाठी  पटकन डोळे भरून येण्यात सुद्धा असतो.

आपण मोकळे झालो कि, तो असा कुठेही भेटू शकतो,
पण बांधून ठेवलं तर फक्त काही ठराविक गोष्टींत.

आपल्या आजूबाजूच्या आवडीनिवडींच्या भिंती पाडून मोकळे झालो कि, आपण आनंदात राहण्याचे चान्सेस वाढवतो. सजीव होतो.

आता नेमकं काय करायचंय हा शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न...


बुधवार, २७ मार्च, २०१९

सावली


आपल्यातील प्रत्येकाला आयुष्यात राज्य हवं असतं पण त्यासाठी स्वत:वर डाव घ्यायला आवडत नाही..नेहमीच आपला डाव कुणीतरी घ्यावा म्हणून यासाठी प्रत्येकजण कुणाचीतरी वाट पाहत असतो.सभोवतली इकडून तिकडून फिरणार्या सोयऱ्यातून कुणीतरी पुढे येईल ही आपली इच्छा काही केल्या फलद्रूप होत नाही.मग आपण इथल्या माणसांच्यामध्ये माणुसकी उरली नाही म्हणून खेद व्यक्त करतो.

कधी भावना उरात मावेनाशा झाल्या की त्यातून बंडखोर काव्याची निर्मिती होत जाते.आपल्या शब्दांच्या कधी लाह्या होतात आणि आकाशातल्या सगळ्या चांदण्याची कधी जागा घेतात हे आपल्याला समजत नाही.मधूनच तत्वज्ञानाचे नवनवे फंडे आपल्या हातून जन्माला येतात.

आपण या सगळ्यात एक साधी गोष्ट विसरून जातो की मुळात रखरखत्या उन्हात आपल्याला सावली मिळावी म्हणून नेहमी कुणीतरी ऊन झेलायलाच हवे असा काही दंडक होऊ शकत नाही.कधीतरी आपणसुद्धा आपल्या उन्हाची ख्याली-खुशाली विचारायला हवी.आपल्या उन्हानां आपल्याकडून होणाऱ्या विचारपुसेची आस लागून राहिलेली असते.बाकी सगळ्यांच्या स्पर्शापेक्षा त्यांना आपल्याकडून एक फुंकर अपेक्षित असते.आणि हे त्यांचे मागणं काही वावगं म्हणता येणार नाही.

साऱ्या जगात कितीही कौतुक झाले. मानपत्रे मिळाली तरी गावाकडल्या पाठीवरल्या थापेपुढे त्यांना मोल नसते.आपल्याला आपल्या उन्हापेक्षा शेजारच्या अंगणातली सावली जादा भाजून काढत असते.जगात उन्हाच्या भाजण्यावर औषध मिळू शकते.पण सावलीच्या भाजण्याला काही कुठे आराम मिळत नाही.

दुसरं असं होतं की आपल्याला सावली देणाऱ्या झाडाच्या फांद्या वठल्या की आपण त्यांचा हात अलगद सोडून देतो.आतापर्यंत केवळ त्यांच्यामुळे प्रत्येक नाजूक घडीला आपण सहीसलामत सुटलो याबद्दल आपल्याकडे कसलाही कृतज्ञपणा असत नाही.आणि कित्येकदा आपल्या कानावर पडणाऱ्या हाकांना आपण कृतघ्नपणे टाळून टाकत असतो. इथले सगळे व्यवहार केवळ देवाण-घेवाण अशा दोन बाजू असणार्या नाण्याच्या इशाऱ्यावर चालते हे सोयीस्करपणे विसरून जात असतो.

दिलेल्या कडू गोळीच्या कडवटपणाचे वास्तव आपण स्वीकारत नाही. त्याला सामोरे जायची आपण हिंमत दाखवीत नाही.सत्य हे नागडे असायला हवे हे सत्य आपल्याला पचनी पडत नाही.वेगवेगळ्या वेशभूषा करून आपण कुणाला फसवीत होतो.याचं उत्तर आपल्या मानगुटीवर बसते तेव्हा आपल्या गोवऱ्या स्मशानात गेलेल्या असतात. आपण त्यावेळी स्वत:वर डाव घेण्यासाठी कबूल होऊन कितीही आर्जवे करीत गेलो तरी हाती काही लागत नाही.

" तेंव्हा गणित बिघडायला लागतं "



" तेंव्हा गणित बिघडायला लागतं "
----------------------------------------------

मी म्हणतो तसंच
सर्वांनी वागलं पाहिजे
असा आपला अट्टहास जेंव्हा सुरु होतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

आज पर्यंत माझा कोणताच अंदाज चुकला नाही
इतका मी भविष्याचा correct अंदाज घेऊ शकतो
तेंव्हा माझ्या निर्णयाला कुणी विरोधच करायचा नाही
असा अहंकार जेंव्हा खूप वाढीस लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

एवढं " मी " सागळ्यांसाठी केलं
तरीही
कुणीच त्याची नोंद घेत नाही
चार माणसात कुणी
आमचं कौतुकही करत नाही
अशा अपेक्षांचं ओझं
जेंव्हा आपण इतरांवर टाकायला लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

या घरात/ऑफिसात फक्त " मीच " शहाणा आहे
या ऑफिस मध्ये फक्त " मीच " सिन्सीअरली काम करतो आणि बाकीचे सगळे कामचुकार आहेत
हा व्यवसाय जो भरभराटीस आला तो केवळ " माझ्यामुळे " !
इतरांना त्याचं काहीच देणं घेणं नाही असा भ्रम जेंव्हा वाढीस लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

मी जसं वागतो
तसंच इतरांनी वागावं
हेच खावं , तेचं प्यावं
इतके वाजताच झोपावं
तितके वाजताच उठावं
अशी नाना तऱ्हेची
अनावश्यक बंधन घालून
जेंव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणायला लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

म्हणून आपल्या अवती भवतीच्या माणसांना स्वातंत्र्य द्या
थोडा मोकळा श्वास घेऊ द्या
नातू झाल्यावरही पोराला
लहान समजू नका !

पदोपदी इतरांचा आपमान करू नका
आपलं मत जरूर नोंदवा
पण आग्रह करू नका
आपल्या मतापेक्षा इतरांच मत ग्राह्य धरल्या गेलं तर राग राग , चीड चीड करू नका
कधी तरी का होत नाही

त्याने तर सांगितले नाही, मला माहीती दिली नाही असा भ्रम जेंव्हा वाढीस लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

दुसऱ्याचंही कौतुक करा
मग बघा जगणं किती छान , आनंदी , सोप्प वाटायला लागतं
आणि सगळी गणितं कशी जुळून यायला लागतात .....!!

शनिवार, १६ मार्च, २०१९

विश्वास


.सुंदर बोधकथा...

तो वाळवंटात हरवला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हेc त्याला दिसत होतं, जाणवत होतं. हताश होऊन तो सभोवताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती.
तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं. तो थबकला. हा भास तर नाही? नाहीतर मृगजळ असेल. पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःच थकलेलं शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता, झोपडी खरोखरच होती. पण ती रिकामी होती, कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं.
पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला. आणि समोरच दृष्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली.
तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात वरखाली करायला सुरवात केली. पण काहीच झालं नाही. पाणी आलंच नाही. नुसतात पंपाचा आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला. आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले.
तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडेे गेलं. परत एक अत्यानंदाची लहर उठली. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सिल केलेली होती. चटकन तो पुढे सरकला. त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले.
त्यावर लिहिले होते "हे पाणी पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवायला विसरू नका."
तो चक्रावलाच. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. काय करावं? या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं? की सुचनेप्रमाणे करावं?
समजा, सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर?, पंपाचा पाईप तुटला असेल तर?, खालचं पाणी आटून गेलं असेल तर? पाणी वायाच जाईल... सगळा खेळ खल्लास...
पण सुचना बरोबर असतील तर?... तर भरपूर पाणी...
पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याच मत ठरेना.
शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरवात झाली. भरपूर पाणी येतं होतं. त्याला काय करू नी काय नको असं झालं. ढसाढसा पाणी प्यायला तो. स्वतः जवळच्या बाटल्या पण काठोकाठ भरल्या त्याने. तो खुप खुश झाला होता.
शांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून सहज लक्षात येत होतं की तो मानवी वस्तीपासून अजून खुप दूर होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती.
त्याने निघायची तयारी केली. सुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली.
आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली.
"विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता, पाणी येतच" आणि तो पुढे निघाला.
----तात्पर्य--
*ही गोष्ट आहे देण्याचं महत्व सांगणारी.
काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी.
काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं.
त्याही पेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते. विश्वासाने केलेले दान खुप आनंद देते.
आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला.
काय होईल माहिती नसताना त्याने विश्वासाने अज्ञातात उडी मारली.
या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी.
त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या

ऑप्टिशियन्स प्राईज...


ऑप्टिशियन्स  प्राईज...... #संगीताशेंबेकर

तुम्ही कधीही  ऑप्टिशियन कडे जा...चष्मा   बनवायला...किंवा रिपेयर ला....सगळ्यात तुम्हाला काचेत डिस्प्ले करतील खूप साऱ्या डिझाइन्स....तुम्हाला एखादी छान आवडते मग तुम्ही त्याची किंमत विचारता....तो दुकानदार तुम्हाला एक अशी किंमत सांगतो जी कि तुम्हाला फारच कन्व्हीन्सिंग असते....मग तुम्ही  त्या  फ्रेमला नक्की करता....आणि  तुम्हाला कळतं कि ही फक्त "लेन्स" ची किंमत होती......बाजूची फ्रेम अधिक पैशात निवडायची ...मग तरी तुम्ही बार्गेन करता असुदे..फायनली चष्मा छान दिसेल....आणि असे करत करत अँटी ग्लेअर ..आणि असे काही काही निवडत अंदाजे पाचशे रुपयापासून सुरवात झालेली तुमची आवड अठराशे रुपयात जाऊन थांबते....तुम्हाला कळतही नाही तुम्ही किती  हो हो हो म्हणत पुढे गेलात ....एकाच वस्तूची किंमत पाच वेळा बदलली तरी तुम्ही निर्णय बदलत नाही.....
असेच काही नात्यांचेही असते आपल्या जीवनात ...सं
एखादी शेजारीण....खूप काही निरनिराळी वागते आपण तरीही बोलत नाही....कारण कंपनी हवी असते तिची...एखादी ऑफिसातील व्यक्ती खूप काही करते खटकण्यासारखं पण आपण बोलत नाही कारण तिथे वैर नको असते आपल्याला....एखादी नातेवाईक व्यक्ती तसंच करते   पण काही स्पेसिफिक कारणाने आपण दुर्लक्ष करतो.....आणि निमूट राहतो.....ही सगळी ऑप्टिशियन प्राईज नाती आपण नकळत सांभाळत असतो.......जगण्यासाठी ..... #संगीताशेंबेकर

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा