Pages

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

my konkan festival diwali

देव दिवाळी 

                खरे तर सण हे आनन्दासाठीच साजरे केले जातात. सध्या दिवाळी म्हणजे दिवाळ असच काहीस  लोक बोलत असतात. देव दिवाळी शहरात साजरी केली जात नाही. पण गावात साजरी केली जाते. 
माझे बालपण कोकणातील अत्यंत दुर्गम भागातील गावातले . त्याकाळी गावात घर घरात माणसे असायची, म्हणजे घरात माणसेच राहतात, पण सध्या अशा गावातून केवळ वयस्क, म्हातारे, निवृत्त लोकच पाहावयास मिळतात. तर सांगायचं असं कि, गावात बरीच माणसे असायचीय, पोरेटोरे, शेतकरी, बाया माणसे ई. करती माणसे बहुतांश मुंबईत असायची. त्यांची फेरी शिमगा, गणपती किंवा घरातील काही समारंभ अथवा दुःख याकरिता गावी यायची. 
             आम्हा मुलाना आदल्या दिवसापासून उत्साह असायचा. या दिवसात थंडी चांगलीच पडलेली असायची.  आदल्या संध्याकाळी आम्ही अंगणात गप्पा मारता मारता पैज लावायचो कि उद्या जो कोणी  लवकर उठून पूजा करेल त्याला ५ - ५ बोरे  इतरांनी द्यायची. हा, आता बोरे म्हणजे झाडाची बोरे नव्हेत, तर या दिवसात आमच्या कडे आजच्या सारखा फराळ वगैरे भानगड नसायची. तर शेतातील तांदळापासून घरीच तयार करण्यात आलेले पोहे आणि गहू अगर तांदळाच्या पिठात शेतातून काढलेले तीळ टाकून गोल आकाराची बोरे तयार केली जायची. रुचकर व आरोग्यदायी. तीही सकाळी उठून आजी करत असे. 
            रात्री हुरहुरत्या उत्साहाने झोपी जायचो. सकाळी पहिल्या कोंबड्याला आजी उठायची. पहिल्या कोंबड्याला म्हणजे, कोंबडा सकाळी ४ ते ४. ३० ला पहिल्यांदा बांग देतो, नंतर दुसरा म्हणजे ५. ते ५. ३० ला नंतर ६ते चांगले उजाडून बाहेर जाई पर्यंत, कोंबडा आरवण्यासाठी खास राखून ठेवला जायचा. पहिल्या कोंबड्याला  जाग यायची, तो पर्यंत आजीने  उठून चूल पेटवलेली असायची. शेकत शेकत पाणी गरम व्हायचे, आणि मग पटकन आंघोळ करून स्वारी तयार.. 
            घरच्या देवाला ओवाळून नमस्कार करायचा. नंतर कंदिलाच्या प्रकाशात गोठ्यात जायचे, गुरेही ओळखीचे माणूस बघून आळोखे पिळोखे देत उभे राहाची. थोडासा हू हू  करायची. गाई बैलांच्या शिंगाला तेल लावून आरती ओवाळायची, ज्यांच्या जीवावर आपण शेती करतो, पोट भरतो त्यांच्या पायी कृतज्ञता. ओवाळून झाल्या नंतर बाहेर येऊन तोंडाला दोन्ही हातांची कोण करून जोरात ओरडायचं इडा पीडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे.
           आवाज ऐकून शेजारची मित्र मंडळी जागी व्हायची. काहींची आंघोळ सुरु असायची, माझा आवाज ऐकल्यावर त्यांची घाई व्हायची. करता करता सगळे जागे व्हायचे. आणि मग मी जिंकल्याने सर्वांकडच्या बोरे मला मिळायची. जिंकण्याची मजा वाटायची.
           कोकणात पैसे अडका कमीच असायचा पण कमी पैश्यातही जी मजा यायची ती आताच्या दिवाळ सणात येत नाही,  केवळ खर्च नसून आनंद असायचा. 

रविवार, २३ जुलै, २०१७

thaught of life

थोडस जीवनाबद्दल 

                      आज आपण हे वाचत आहात. ती वेळ व  न चुकवता येणारा मृत्यू यामधील काळ म्हणजेच जीवन होय. मृत्य कधी येईल हे  आपल्याला ठाऊक नाही, किती वर्षे, किती दिवस, किती तास, सेकंद काहीहि सांगता येत नाही. कदाचित पुढच्या क्षणीही दत्त (यम ) म्हणून उभा राहू शकतो. आणि माणूस मात्र आताचा क्षण जगायचं सोडून भविष्याची चिंता करीत बसतो. आपला भूतकाळ आठवून आठवून मनाला दुखी करत असतो. मृत्यू हि एक प्रक्रिया आहे. ह्या जगात सजीव म्हणून जन्माला येण व मृत्यू येणं हि जन्म व मृत्याची एक प्रक्रिया आहे. परंतु माणूस जन्माचा आनंदत्सोव साजरा करतो आणि मृत्यूला घाबरतो, वाईट मानतो. याच कारण स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर केलेल्या शोध व भौतिक जीवन. याची त्याला सवय होते. 
                       माणसाला लाभलेल्या अचाट बुद्धीचया वापर करून नवनवीन शोध लागले. त्याचा उपभोग घेतो आणि मग त्याला त्याचे व्यसन लागते. त्यालाच मग तो जीवन समजू लागतो. परंतु हा भ्रम असतो. तो भ्रम फुटतो तो मृत्यू समोर उभा ठाकल्यावर. केविलवाणी धडपड करूनही जेंव्हा त्याला उमगते कि आपली आता हे शरीर त्यागाची वेळ झालेली आहे, तेंव्हा त्याची या जीवनावरची आसक्ती संपते आणि जाणीव होते. ती आपल्या जन्माच्या कारणांची. आपण या जगात का आलो त्याची. कारण काय ?
                        आयुष्य या का चे उत्तर शोधण्यात बहुतांशी लोक अपयशी ठरतात अथवा त्यांना त्याची जाणीवच नसते. ते जगात असतात भौतिक जगात. 
                        तर मित्रहो आपल्या जीवनाची चौकात सोडा आणिग आताच क्षण जागा. मजेत जागा.  
                

सोमवार, ३ जुलै, २०१७

वाचावीत अशी पुस्तके

प्रोत्साहनपर पुस्तके 

मी नोकरी करीत होतो तेंव्हा आठवतंय ..... रविवारची संध्याकाळ आली कि सोमवारच्या त्या लांब लांब सावल्या मनात शिरु लागत आणि रविवार मजेचा ताबा घेत. मग थिएटर मध्ये सिनेमा बघताना, समुद्राच्या वाळूवर मुलाशी खेळताना पोटातली ती सुनामीची लाट हळू हळू आक्राळ विक्राळ होत जायची. मग लक्षात यायचं आपले खांदे पडलेत,आवाज धीमा झालाय, श्वास स्लो झालाय. त्याच मनःस्थितीत झोपी जायचो आणि सोमवारी सकाळी मोबाईलचा गजर स्नूझ करीत झोपून राहायचो. मग नंतर कळलं मी एकटाच नाही. इंग्रजीमध्ये याला मंडे ब्लूएज सिन्ड्रोम म्हणतात नाही म्हणायला  हे थोडं दिलासादायक होत. 

  • नवीन काळे

अप्रतिम पुस्तक, अनुभवाच्या आधारे मांडलेले विचार जरूर संग्रही 




(Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)

अतिशय प्रोत्साहनपर व आपले ध्येय कसे गाठावे याचे मार्गदर्शन करनारे पुस्तक. जॅक कॅनफिल्ड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मोटिवेशनल गुरु आहेत. त्यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलर आहेत. स्वतःच्या अनुभवाच्या आधारे यशाचा फॉर्मुला पुस्तक रूपाने उपलब्ध




(Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)



आज आपण एका अशा संघर्षाची ओळख करून घेणार आहोत जी तुम्हाला ते पुस्तक वाचल्या नंतरच कळेल. होय !
 तुमच्या पोटात भूक असेल, डोक्यात कसलीही लाज नसेल आणि तुमच्या मनगटात जिद्द असेल , तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकता अगदी कुठल्याही .........
       हे वाक्य आहे कामत रेस्टॉरंट ची चैन काढणाऱ्या श्री विठ्ठल कामात यांच्या इडली ऑर्किड आणि मी या सुप्रसिद्ध पुस्तकातील . हे पुस्तक नुसते एकदा वाचून संपत नाही तर आपल्याला प्रेरणा देत राहते. अनेकदा वाचूनही दरवेळी नवीन काहीतरी गवसते. कधी उदास वाटत असल्यास, निरुत्साही असल्यास, अपयश आल्यास हे पुस्तक मार्गदर्शकाची काम करते. उत्साह वाढवते, जगायला शिकवते. हे केवळ काल्पनिक रचलेले पुस्तक नसून विठ्ठल कामात यांना त्यांच्या जीवनात आलेल्या बऱ्या वाईट अनुभवांचे सुरस कथन आहे. आपल्याला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल.


(Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)

 


वीणा गवाणकर लिखित एक होता कार्व्हर . खरोखरच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जगावं कस हे शिकवते पुस्तक. 


(Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)


माणसाच मन हा खरा कल्पवृक्षच आहे. सार काही देणारा !यश, सुख,आरोग्य, नवनिर्मिती, सृजन रंजन इतकाच काय पण दुःख, आजार, विनाश , अपघात , नुकसान, दुर्दैव हे सार काही प्रथम मनाच्या सृष्टीत जन्माला येत आणि नंतरच अस्तित्व धारण करते.
           तुमच मनच तुमच्या जीवनातील प्रत्येक वस्तू , व्यक्ती, परिस्थिती, आकर्षित करत. या मनाच्या शक्तीनं म्हणूनच चमत्कार घडू शकतात. मनाच्या शक्तीद्वारे जे नको ते टाळता येते आणि हव ते मिळवता येत. मग ते व्यक्ती, परिस्थिती, वस्तू, स्वगुण यापैकी काहीही असो. तुमची समस्या वैयक्तिक, कौटुंबिक,  आर्थिक-कोणतीही असो.
आपल्या मेंदूचे प्रोग्रामिंग कसे असते, कसे बदलावे व कसे करावे याचे मार्गदर्शन आपल्याला या पुढील पुस्तकातून मिळेल. पुस्तकांच्या लेखिका डॉ. रमा मराठे ह्या विख्यात डॉक्टर, माजसोपचार तज्ज्ञ, लेखिका व कवयत्री आहेत.


(Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)






A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा