Pages

रविवार, २ सप्टेंबर, २०१८

कावळा आणि बैल


कावळा आणि बैल




बैलांच्या अंगावर बसून जेंव्हा कावळा गोचीड खातो तेंव्हा बैलाला असे वाटते की कावळा आपल्यावर उपकार करीत आहे तो त्याला आपला सखा मित्र वाटतो आणि संपूर्ण शरीर त्याच्या स्वाधीन करून निवांतपणे पाय पसरवून पडून राहतो.
              तोच कावळा जेंव्हा गोचीड सोडून बैलाच्या मांसाचे लचके तोडायला लागतो.तेंव्हा मात्र बैल सावध होऊन  आपल्या शिंगांने त्याला धुडकावून लावतो.खरेतर कावळा त्यावर उपकार वगेरे काही करीत नव्हता तो त्याच्या अंगावरचे गोचीड खाऊन आपले पोट भरत होता. जेंव्हा गोचीड संपले तेंव्हा त्याने बैलाचे मांस खायला सुरवात केली.
              मित्रांनो,असे कावळे आपल्या जीवनात ही पुष्कळ आहेत.त्यांना आपल्या मांसाचे लचके तोडण्याअगोदरच ओळखा आणि दूर करा.कारण,ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यासोबत मित्र बनण्याचे नाटक करीत असतात.त्यांना आपल्या विषयी सहानुभूती वगेरे काहीही नसते.

      पैशाने पुर्ण झालेली स्वप्न,
          मरेपर्यत टिकतात..
      कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न,
          इतिहास घडवतात..
       
घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे ....
""परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे "" 

कुणाच्या नशिबाला हसू नये
               नशिब कुणी विकत घेत नाही
      
वेळेचे नेहमी भान ठेवावे..
           वाईट वेळ सांगून येत नाही.!

बुद्धी कितीही तल्लख असली तरी
          नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
 
 बिरबल बुद्धीवान होता तरीही तो          
             राजा होऊ शकला नाही.!

     समाधान ही अंत:करनाची सर्वात सुंदर संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.

"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल
हसण्यामगील दुःख
रागवण्या मागील प्रेम
*आणि शांत रहाण्यामागील कारण."

कपडे नाही
माणसाचे विचार
Branded पाहिजे...!

चुकीच्या बाजूला उभा राहण्यापेक्षा
एकटं उभं रहाणं केव्हाही चांगलं.



आपल्या चिमुकल्यांसाठी


आपल्या चिमुकल्यांसाठी एवढी पोस्ट नक्की वाचायलाच हवी.



पालक सभेत असा एक प्रश्न विचारून बघावा - ‘कोणाची मुलं हट्टी आहेत, त्यांनी हात वर करा.’
सगळे हात वर होतात.

असं विचारलं की - ‘कोणाची मुलं नीट जेवत नाहीत?’
तरी सगळे हात वर.

मी आणखी एक प्रश्न विचारते -
इथे असे कोणी पालक आहेत का ज्यांनी आपल्या मुलांना कधी मारलं नाही?’
बहुतेक वेळेला एकही हात वर होत नाही.

मग विचारावं की - ठीक आहे.
आता दुसरा प्रश्न विचारते -
'असे कोणी पालक आहेत का की ज्यांना आपल्या मुलांना मारून बरं वाटतं, आनंद होतो? त्यांनी हात वर करा.’
पुन्हा एकही हात वर होत नाही.

पालक सांगू लागतात, ‘मुलांना मारलं की मग आपल्यालाच वाईट वाटतं.
रडू येतं. मग रडून झोपलेल्या मुलाच्या डोक्यावर आम्ही हात फिरवत बसतो. तो उठला की त्याच्या आवडीचं काही खायला करतो.’

एकदा असं झालं की, पहिल्या प्रश्नाला एका पालकाने हात वर केला.
ते म्हणाले, ‘मी माझ्या मुलांना कधीच मारलेलं नाही.’

मला फार नवल वाटलं.
मी म्हटलं, ‘तुम्ही पुढे येता का?
आम्हाला सांगा तरी तुम्ही असं कसं वागता ते?’

ते पुढे आले. हातात माईक घेतला आणि म्हणाले, 'ते डिपार्टमेंट त्याच्या आईकडे दिलंय.’
...आणि हशा-टाळ्यांच्या गजरात जागेवर जाऊन बसले.

आणखी एका बाबांना स्फूर्ती आली. ते आले आणि म्हणाले, ‘मी कामामुळे बाहेरगावी असतो. त्यामुळे मारायला मला मुलं भेटतच नाहीत.’

पुन्हा मोठा हशा झाला.

क्वचित काही पालक भेटतात न मारणारे.
आणि कुणी सांगतं, ‘आम्हाला आमच्या आईवडिलांनी कधीच मारलं नाही त्यामुळे आम्हाला पण मारावंसं वाटत नाही.’

कुणी म्हणतात, ‘लहानपणी भरपूर मार खाल्ला त्यामुळे ठरवलं की मुलांना आपण मारायचं नाही.’

काही असं सांगतात की, ‘मारायची गरज नाही. समजावून सांगितलं की मुलं ऐकतात.’

मला असं विचारावंसं वाटतं, ‘तुम्हाला मुलांना मारल्यावर जर वाईट वाटतं, रडू येतं, तरी का मारता मुलांना?’

पालक सांगतात, ‘राग येतो त्यांचा. राग आवरता येत नाही. कधी इतर कुठलातरी राग मुलांवर निघतो. वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात तसं!’

असं आपण जेव्हा म्हणतो की, 'आम्हाला राग आवरत नाही.'

तेव्हा आपण लबाड वागत असतो. काय लबाडी करतो आपण?

एकच चूक मुलांनी केली की त्याला मिळतो मार आणि वडिलांनी, आजी आजोबांनी, काकांनी केली तर?
तर लगेच आपण राग आवरतो.

मग एखाद्या छोट्या मुलीला मी माइकपाशी बोलावते.
तिला विचारते, 'अगदी सोपा प्रश्न आहे बरं का. घाबरू नको. छान उत्तर दे.’
ती 'हो' म्हणते, पण तिच्या चेहऱ्यावर ताण दिसतो.
मग मी तिला म्हणते, 'समज ही एक भाजीची वाटी आहे. ती अशी खोलीच्या मधेच ठेवलीय. तिकडून तू धावत-धावत आलीस आणि तुझा पाय वाटीला लागला. वाटी उडाली आणि सगळी भाजी सांडून गेली तर तुझी आई काय करेल?’

अर्धा मिनिट ती विचार करते आणि म्हणते, ''आई आधी एक धपाटा घालेल आणि म्हणेल, 'दिसत नाही तुला? आता भरून ठेव ती भाजी.''

सगळे पालक हसतात. तिला मी म्हणते, ‘छान उत्तर दिलंस.'

आता दुसरा सोपा प्रश्न.
'समज ती भाजीची वाटी तशीच आहे आणि तू धावत-धावत नाही आलीस. तुझे बाबा चालत आले. त्यांचा पाय वाटीला लागला. भाजी सांडली. आता आई काय करेल?’

मुलीला आता गंमत वाटते आणि उत्तर द्यायला उत्साह वाटतो.
ती म्हणते, ‘बाबांना आई काहीच म्हणणार नाही. धपाटापण घालणार नाही. उलट म्हणेल, 'मी भरते ती भाजी. तुम्ही जा कामाला. माझंच चुकलं. वाटी उचलून नाही ठेवली.’

पालक पुन्हा जोरदार हसतात.
मुलीला मी शाबासकी देते.
छोटं बक्षीस देते.

आपलं असं ठरलेलंच असतं की,
'चूक लहान मुलाच्या हातून झाली तर त्याला लगेच मारायचं आणि मोठ्या माणसांना मात्र माफ.
जो आपल्याला उलट मारू शकतो, त्याला आपण मारायला जात नाही! लहान मूल काय बिचारं करणार?'

मुलं बालभवनात सांगतात ते पालकांनी ऐकावं.
आज ना बाबांनी मला खूप मारलं. मला आज आत्महत्या करावीशी वाटते आहे.'

'आज आईने मला उगाचच मारलं. मला घरातून पळून जावंसं वाटतंय.'

आज दोघं मला खूप रागावले.
मला असं वाटतंय की, 'जगात माझं कुणीच नाही.'

इतकं जर मुलांना वाईट वाटतं,
तर का मारायचं मुलांना?

'छडी लागे छम-छमवर अनेक पालकांचा विश्वास असतो.
'मारलं नाही तर मुलं बिघडतात' अशी त्यांच्या मनात भीती असते.

काही पालक तर हमखास असं सांगतात, 'मी लहानपणी फार वात्रट होतो. आमच्या एका सरांनी मला खूप बदडलं म्हणूनच मी सुधारलो.'

मुलं मात्र कितीदा सांगतात, ‘मारू नका ना! समजावून सांगा. आम्हाला कळतं.'

पण आपल्या मन:स्थितीचं काय करायचं?
कधी समजा सुट्टीचे दिवस आहेत. आवडते पाहुणे घरात आलेत.
सर्वांच्या तब्बेती उत्तम आहेत.
पैशाचा काही प्रश्न नाही.
घरात काही भांडण नाही.
अशा आनंदाच्या वातावरणात मुलांनी काही दंगा केला, नासधूस केली, आगळीक केली तर आपण उदारपणे म्हणतो, ‘जाऊ दे, जाऊ दे. भरून टाका ते. आपल्याला आता बागेत जायचंय.'

आणि याऐवजी,
'समजा मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळालेत, आपल्याला बरं नाही, पैशांची चणचण आहे, घरात भांडणं झालीयत, आपला मूड खराब आहे.
अशा वेळी मुलाच्या हातून चमचा खाली पडला तरी आपल्याला संताप आवरत नाही.
त्याला मार तर बसतोच,
वर दहा बोलणी ऐकून घ्यावी लागतात.
हा आपला मूड म्हणजे एखाद्या ग्लासातल्या पाण्याच्या पातळीसारखा असतो.
अप्रिय गोष्टी घडल्या की पातळी खाली जाते आणि आपली सहनशक्ती कमी कमी होते.
आवडीच्या गोष्टी घडल्या तर, पातळी वर जाते. आपली सहनशक्ती चांगली असते.

तेव्हा एक लक्षात ठेवायचं -
'मुलं जोवर १४-१५ वर्षांची होत नाहीत,
तोपर्यंत ही पाण्याची पातळी निर्धारपूर्वक वर ठेवायची आणि मुलांना मारायला हात उठेल तेव्हा दुसऱ्या हातानं हात धरायचा आणि स्वत:ला विचारायचं, 'याची जरूर आहे का?'

९९ टक्के वेळा तुम्हाला उत्तर मिळेल -
'जरूर नाही. मारू नको. समजावून सांग.'

तेव्हा प्रश्न संयमाचा आहे.
'मारणं' हा आपला शॉर्टकट असतो.
खरं तर,
कोण समजावून सांगत बसणार?
घाईच्या वेळी मुलं हट्ट करतात.
वेळ नसतो. मग घाला दोन धपाटे.
...आणि मुलं इतकी चिवट असतात की, ती आपला अंत पाहतात.
खरंच आहे. तुम्ही रस्सीखेच सुरू केलीत तर मुलं कधीच हरणार नाहीत.
तुम्हालाच आपल्या हातातला दोर सोडून देण्याचा शहाणपणा करावा लागतो.

मुलांशी संवाद वाढवण्यासाठी एक गोष्ट करता येईल.
रात्री मूल झोपत असेल तेव्हा वेळ काढून त्याच्याजवळ बसा.
त्याला गोष्ट सांगा. गप्पा मारा.
आणि त्याला हे सांगा की, 'आज दुपारी तू जो दुकानात हट्ट केलास, 'मला अमूक पाहिजे म्हणून' आणि 'रडायला लागलास' ते मला आवडलं नाही.
किती खेळणी आहेत तुझ्याकडे !
तरी हट्ट करायचा का?
मूल पण सांगेल त्याला तेच खेळणं का हवं होतं ते.
तुम्हीही सांगा तुम्ही ते का नको म्हणालात ते आणि सारखं आपल्याला हवं ते त्या क्षणी मिळत नाही, धीर धरावा, वाट पहावी.
कधी नाही मिळालं तर हट्ट करू नये.
तमाशे तर नाहीच करायचे हे त्याला/तिला पटवून द्या.
हे संवादाचं कौशल्य, प्रामाणिकपणे बोलणं मुलापर्यंत पोचतं. त्याला कळतं.
आई उगाचच ‘नाही म्हणत नाही.
त्यामागे कारणं असतात आणि मूलही मनात विचार करू लागेल.

'पालकत्वाची सत्ता' ही न वापरण्यासाठी असते.
ती चांगल्यासाठी जरूर वापरावी.
...पण मारण्यासाठी, अपमान करण्यासाठी, अडवणूक करण्यासाठी कधीही वापरू नये.

पटतंय ना?

Be the CEO of your own Life ...


अप्रतिम लेख .........परत परत वाचा  नक्की वाचा......

 Be the CEO of your own Life ...


बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात... 
प्रत्येकाने वाचावा असा अप्रतिम लेख...
 दोन दिवसांपूर्वीची गोष्ट..
कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो.
मुलगाप्ले झोन मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसी ची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो.
पेपर खरं तर, नांवाला.
माणसं वाचत बसलो होतो.
विविध चेहऱ्यांची, आकारांची
माणसं जणूआज जगाचा शेवटचा दिवस असावा असे भाव आणून शॉपिंग करत होती.
(एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो. असो.)

माझंमाणसं-वाचन चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला.
जेमतेम चाळीशीचा असावा.
जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट.
अंगावर ब्रुट.
हातात मराठी पुस्तक.
खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला.
रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले.  ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं.
राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली..

पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला, ’वाचन आवडतं?’

प्रचंड. रीडिंग इज मायफर्स्ट लव्ह.
आजूबाजूलासौ नाही हे बघत मी म्हटलं.

किती वाचता रोज?’
रोज असं नाहीअं.. अंकाही खास ठरवलेलं नाही.
इच्छा झाली की वाचतो.’
अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.

खायला आवडतं?’
 कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.

प्रचंड. इटिंग इज मायसेकंड लव्ह.’

हो?  मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा.?’

नाही नाहीरोज दोन वेळा..
आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच..
हिट विकेट !

तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण.. तसंच वाचन !’

बरा वेळ मिळतो तुम्हाला.’
दयनीय चेहरा करत मी म्हटलं..

वेळ मिळत नाही. मी काढतो.
वेळ ही जगातली सगळ्यातटेकन फॉर ग्रान्टेड गोष्ट आहे असं मी मानतो..

फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना !
फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला !
मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणार आहे' असं कोणी म्हटलं नां! की माझी खात्री होते, नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तोयम त्याला हंसत असेल !’

मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’

मी आणखी हसू लागलो. ‘आय ऍम प्रीटी सिरीयस.. तुम्ही पाहिलंय यमाला ?

हो, मी पाहिलंय. दोन वर्षांपूर्वी.
रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरधाव गाडी आली. त्या दिव्यांच्या प्रकाश झोतातही मी अंधार पाहिला. त्या दोन सेकंदात मलामृत्यूने दर्शन दिलं. त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच.
गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो..

हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन..
मीदेव पाहिला नव्हता पणमृत्यू पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो.

माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनहीमी अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस !

तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’

अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात..
मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं..

साफ चूक' !  माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतरउद्या नसतो !’

मी समजलो नाही.’

प्रत्येक काम आपल्यालाउद्यावर टाकायची संवय असते..
वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे
गंमत म्हणजे, आहेत ते पैसे देखील आपणआज उपभोगत नाही..
ते कुठेतरी गुंतवतो.....  भविष्यातडबल होऊन येतील म्हणून !

याउद्या वर आपला फार भरवसा असतो..
मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो..

आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हाउद्या बघायची संधी देत नाही !

मृत्यू म्हणजेआहोत तिथे,
आहोत त्या क्षणी फुल स्टॉप !

खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो.

तुमच्यावरील याअन्याया विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..

माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडकाउद्या पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो..

म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं, यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं..

इतके दिवस जेवण नुसतंचगिळलं.
या पुढे एकेका घासाची मजा घ्यायची..
आयुष्याचीचव घेत जगायचं. ’

म्हणजे नक्की काय केलं?’
माझी उत्सुकता आता वाढली होती.

माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली..

मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’

कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचासीईओ वगैरे जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.

वेल तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही..

आयुष्य कसं जगायचं याचे नियम मीमाझ्यापुरते केलेत त्यामुळे…’
मग..तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.

म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.

मला कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला..
मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो..

दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.

माझ्या बोर्डवर विविध माणसे डायरेक्टर आहेत..

फरहान अख्तर,
शिवाजी महाराज,
अब्दुल कलाम,
डॉ.बी आर आंबेडकर
चार्ली चॅप्लीन,
महात्मा गांधीजी,
अमिताभ,
हेलन केलर,
जे आर डी टाटा
इत्यादि इत्यादि....

माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.

या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं.
या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे.
काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात.

मी काय करतो अंउदाहरण देतो
समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझेएथिक्स डायरेक्टर गांधीजींना विचारतो, काय करू?

मग ते सांगतील ते करतो.

व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझेहेल्थ डायरेक्टर फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो.

कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं.

मग माझ्याइन्स्पीरेशन डायरेक्टर हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात.

कधी दुःखी झालो तरइंटरटेनमेंट डायरेक्टर चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’

माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..
मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल'.
पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचासीलॅबस बनवावा हे उत्तम !
आपण अनेकदाइतरांप्रमाणे आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो..

जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत.

हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय..

गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light..

मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’

मी त्या तरुणाला नांव विचारलं, त्याने लगेच सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं.

मी एका ऍक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो.

तुम्हीप्लीज..कुठल्या ऍक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.

अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे?
ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की !

घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं..
वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली..

मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता..

त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.

मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असेबोर्ड ऑफ डायरेक्टर्स नेमले, तर त्यातत्याचा बाप असेल का?’

परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.

कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्यचवीने जगत राहायची उर्जा देत राहील !

प्रत्येकाने वाचावा असा हा अप्रतिम लेख ....
.....परत परत वाचा 
नक्की वाचा......

Be the CEO of your own Life



A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा